शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

तासगाव बाजार समितीत राष्ट्रवादी-भाजप युती?

By admin | Updated: July 8, 2015 23:58 IST

तेरा-चारच्या फॉर्म्युल्यावर चर्चा : सूतगिरणीतील समझोत्याने शिक्कामोर्तब

दत्ता पाटील- तासगाव -तासगावसह तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या स्वामी रामानंद भारती सूतगिरणीची निवडणूक अखेर बिनविरोध झाली. भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, पक्षातील सर्व कार्यकर्त्यांचे अर्ज काढून घेतले. याचवेळी सूतगिरणीचा समझोता करीत असतानाच बाजार समितीच्या निवडणुकीतही भाजप आणि राष्ट्रवादीत समझोता होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी आणि भाजपच्या गोटात सध्या १३-४ या फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू आहे.तासगाव तालुक्यातील बाजार समिती आणि सूतगिरणी या दोन महत्त्वाच्या निवडणुकांसाठी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यापैकी सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध झाली असली तरी, तालुक्यासाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या बाजार समितीच्या निवडणुकीने राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. बाजार समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जोरदार चुरस आहे. या निवडणुकीत परंपरेप्रमाणे दोन प्रबळ गट एकत्र येणार, की दोन पक्षात सामना रंगणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. सूतगिरणीत राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादीला खिंंडीत गाठण्यासाठी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. ताकद नसतानादेखील खासदार पाटील यांनी बाजार समितीची समीकरणे जुळवून घेण्यासाठी खेळी खेळली होती. राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ, जिल्हाध्यक्ष विलासराव शिंंदे आणि आमदार जयंत पाटील यांनी खासदार पाटील यांच्याशी बिनविरोधबाबत चर्चा केली. त्यांनीही होकार देत सर्व अर्ज मागे घेतले. ही प्रक्रियाच बाजार समिती निवडणुकीची नांदी ठरणार आहे. दोन्ही पक्षांनी आघाडी करण्याबाबत होकार दिलेला नसला तरी, स्पष्ट नकारही दिलेला नाही. आघाडीबाबत चर्चा सुरू गत निवडणुकीत खासदार पाटील आणि माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यात झालेल्या तडजोडीनुसार १२-७ च्या फॉर्म्युल्यानुसार जागावाटप झाले होते. यावेळी खासदार पाटील भाजपमध्ये आहेत. बाजार समितीचे मतदार असणाऱ्या बहुतांश संस्थांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. त्यामुळे १२-७ ऐवजी राष्ट्रवादीला १३ आणि भाजपला ४ जागा, या फॉर्म्युल्यानुसार आघाडी करण्याबाबतदेखील सध्या चर्चा सुरु आहे.तह कोणता?सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी राष्ट्रवादीकडून विनंती केल्यानंतर भाजपकडून अर्ज काढण्यात आले. मात्र विनाअट, विनातह करता राजकारणात कोणतीच गोष्ट सहजपणे होत नाही, याची जाणीव तालुक्यातील दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांत झालेला तह कोणता? याची कार्यकर्त्यांना उत्सुकता लागून राहिली असली तरी, बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भातच तह झाला असून, ऐनवेळी याबाबत भूमिका स्पष्ट केली जाईल, असे बोलले जात आहे.