शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय पक्षांना गल्लीच्या राजकारणात रस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 00:58 IST

सांगली : जिल्ह्यातील ४५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहेत. दहा हजारांहून अधिक लोकसंख्येच्या गावांची संख्याही मोठी आहे. सरपंच थेट जनतेतून निवडून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यामुळे, गल्लीतील राजकारणात दबदबा टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांनी या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाकडे तशी मागणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे♦जिल्ह्यात ७३४ ग्रामपंचायती ♦ कोणत्या गटाला पक्षाचे चिन्ह द्यायचे, असा पेच पक्षांच्या नेत्यांसमोर निर्माण होणार♦४५४ गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी रंगणार ♦पलूस तालुक्यातील गावांमध्ये एकाच पक्षाचे दोन-दोन गट

अशोक डोंबाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यातील ४५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहेत. दहा हजारांहून अधिक लोकसंख्येच्या गावांची संख्याही मोठी आहे. सरपंच थेट जनतेतून निवडून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यामुळे, गल्लीतील राजकारणात दबदबा टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांनी या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाकडे तशी मागणी करण्यात आली आहे.असून, त्यापैकी सर्वाधिक ४५४ ग्रामपंचायतींमधील सरपंच आणि तेथील सदस्यांचा कार्यकाल आॅक्टोबर ते डिसेंबरपर्यंत संपत आहे. तत्पूर्वी तेथे नवीन सरपंच आणि सदस्यांच्या निवडी होणे अनिवार्य आहे. यासाठी आॅक्टोबर व नोव्हेंबरदरम्यान दोन टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. राज्य सरकारने थेट जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील पन्नासहून अधिक ग्रामपंचायतींची लोकसंख्या दहा हजारांहून अधिक आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून या ग्रामपंचायत निवडणुकीकडे पाहिले जात आहे. त्यामुळे सध्या गावागावांतील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांनी पक्षाच्या चिन्हावर या निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. पण, याला निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील अद्याप मिळालेला नाही. भाजपसह काही पक्षांनी राज्य निवडणूक आयोगाकडे ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाचे चिन्ह देण्याची मागणीही केली आहे. निवडणूक आयोगाने तशी कोणतीही परवानगी आतापर्यंत दिलेली नाही. पण, आयोग परवानगी नाकारेल, अशी शक्यता नाही.येत्या आॅक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात ४५४ गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे. राष्ट्रीय पक्षांनीही गल्लीतील निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे रंगत येणार आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत पक्षाची ताकद अजमावण्याची मोठी संधी सर्वच पक्षांना आली आहे. पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढविल्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांना काही प्रमाणात पक्षाची ताकद मिळणार आहे. पण, राष्ट्रीय पक्ष गल्लीपर्यंत गेल्याचा परिणाम गावाच्या विकास कामांवरही होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.राज्य, जिल्हा पातळीवर सत्तेवर असलेला पक्ष गावपातळीवर सत्तेत नसेल तर तो विरोधात गेलेल्या गावांना निधीतून डावलण्याची शक्यता आहे.

शिवाय वाळवा, आटपाडी, खानापूर, जत, मिरज, तासगाव, कडेगाव, पलूस तालुक्यातील काही गावांमध्ये एकाच पक्षाचे दोन-दोन गट कार्यरत आहेत. तेथे कोणत्या गटाला पक्षाचे चिन्ह द्यायचे, असा पेच पक्षांच्या नेत्यांसमोर निर्माण होणार आहे.