शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
5
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
6
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
7
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
8
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
9
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
11
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
12
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
13
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
14
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
15
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
16
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
17
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
18
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
19
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
20
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार

महापालिकेची विकासकामे होणार ठप्प

By admin | Updated: October 18, 2016 22:57 IST

आचारसंहितेचा परिणाम : प्रशासनाला आयतेच कोलित; नगरसेवकांचा हिरमोड

सांगली : जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठीची आचारसंहिता पहिल्यांदाच संपूर्ण जिल्ह्यासाठी लागू झाली आहे. यापूर्वी या आचारसंहितेतून महापालिकेला वगळले जात होते, पण नव्या आदेशामुळे आता महापालिकेलाही आचारसंहिता लागू झाल्याने सर्व विकास कामांना ब्रेक लागला आहे. या निवडणुकीपाठोपाठ विधानपरिषदेची आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे आता महापालिकेची नवीन विकासकामे ठप्प होणार आहेत. त्यात गेल्या दोन महिन्यांपासून विकास कामांवरून प्रशासन व नगरसेवकांत छुपा संघर्ष सुरू झाला आहे. आता तर प्रशासनाच्या हाती आचारसंहितेचे कोलितच मिळाल्याने नगरसेवकांचा हिरमोड झाला आहे. राज्यातील नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता सोमवारी लागू झाली. त्यात ज्या जिल्ह्यांमध्ये चारपेक्षा जास्त नगरपालिका, नगरपंचायती असतील, तेथे संपूर्ण जिल्ह्यासाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यात पाच नगरपरिषदा व चार नगरपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. त्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. यापूर्वी जिल्ह्यात आष्टा, इस्लामपूर, तासगाव व विटा या चारच नगरपालिका होत्या. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याला आचारसंहिता लागू होत नव्हती. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात नव्याने एक नगरपरिषद व चार नगरपंचायती अस्तित्वात आल्या आहेत. त्यामुळे नगरपरिषद व नगरपंचायतींची संख्या नऊवर पोहोचली आहे. आचारसंहितेच्या नव्या नियमांबाबत महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवकांसह प्रशासनही अनभिज्ञ होते. नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या, तरी महापालिकेला आचारसंहिता लागू नाही, असे समजून विकास कामांबाबत प्रशासनाशी दोनहात केले जात होते. नुकत्याच झालेल्या महासभेतही विकास कामांवरून नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. महापौर व आयुक्तांनी लवकरात लवकर विकास कामांच्या फायली मंजूर करण्याची ग्वाहीही दिली होती, पण आता आचारसंहितेमुळे अनेक नव्याने सुरू होणाऱ्या विकास कामांना ब्रेक लावावा लागणार आहे. (प्रतिनिधी)३८ कोटींची कामे थांबणार गेल्या चार महिन्यांत रस्ते, गटारी, ड्रेनेजसह तब्बल ३८ कोटींची कामे प्रलंबित आहेत. ही कामे मंजुरीसाठी आयुक्तांच्या टेबलावर आहेत. महासभेत विकास कामांवरून प्रशासनावर टीका झाली होती. आता निवडणूक आचारसंहितेमुळे ही कामे थांबणार आहेत. स्थायी समिती सभापती पदाबाबत संभ्रमस्थायी समिती सभापती पदाच्या निवडीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. येत्या २५ अथवा २६ रोजी निवडीची शक्यता आहे. पण त्यातच आचारसंहिता लागू झाल्याने, सभापती निवड होणार, की पुन्हा लांबणीवर पडणार, याबाबत प्रशासकीय स्तरावर संभ्रम कायम आहे.