शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

नरेंद्र मोदींचा कारभार निष्कलंक

By admin | Updated: June 6, 2016 00:46 IST

विनय सहस्रबुध्दे: ‘विकासपर्व’चे सांगलीत आयोजन

सांगली : आपल्याच विचारधारेला कॉँग्रेसने दिलेली तिलांजली आणि सर्वच पातळीवर घोटाळ्यांची मालिका सुरू करणाऱ्या कॉँग्रेस सरकारपासून जनतेला हवा असलेला समर्थ पर्याय पंतप्रधान नरेंद्र मोदींद्वारे मिळाला. मोदी सरकारचा गेल्या दोन वर्षातील कारभार ‘बेदाग’, निष्कलंक असल्याचा विश्वास भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, खा. विनय सहस्रबुध्दे यांनी रविवारी व्यक्त केला. येथील सांगली अर्बन बँकेच्या सभागृहात विद्यार्थी विकास प्रतिष्ठानच्यावतीने मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या ‘विकासपर्व’ या कार्यक्रमात सहस्रबुध्दे बोलत होते. सहस्रबुध्दे म्हणाले की, देशात एका प्रबळ शासकाचा दुष्काळ अनेक दशके पडला होता. राजकीय पक्षांकडे असलेली विचारधारा विकासाचे प्रतिमान गाठण्यात अपयशी ठरत असताना, देशभक्ती, राष्ट्रभक्तीचा आणि संतुलित विकास साधण्याचा प्रयत्न जनसंघापासून भाजपपर्यंत केला. याउलट सत्तेवर असलेल्या कॉँग्रेसने विचारधारेचे नातेच संपवून टाकले. एकीकडे समाजवादाबद्दल निष्ठा व्यक्त करायची आणि दुसरीकडे भांडवलदारांचे स्वागत करायचे, या सर्वांतूनच कॉँग्रेसने विचारधारेला तिलांजली दिली होती.जनतेची सुशासनाची तहान मोदी सरकारने भागविली तर आहेच, शिवाय जनताभिमुख कामकाजावर भर दिला आहे. निष्कलंक व्यवहार, गरीब, वंचित, शोषित वर्गाला न्याय, लोकहित, अंमलबजावणीला सर्वोच्च प्राधान्य, अशी काही वैशिष्ट्ये मोदी सरकारची सांगता येतील. सुगम्य भारत, पीक विमा योजना, मुद्रा योजना, स्टार्टअप्, स्टॅण्डअप् योजना आदी अनेक योजनांतून जनतेला प्राधान्य दिल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आ. सुरेश खाडे, संभाजीराव भिडे, सांगली अर्बन बॅँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ, शेखर इनामदार, संजय परमणे, डॉ. रवींद्र आरळी, श्रीकांत पटवर्धन, धनंजय खाडिलकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘फाईव्ह इन वन’ संस्कृतीआजच्या तरूणांना सरकारकडून काय पाहिजे, याचा ज्यावेळी अभ्यास केला, त्यावेळी पाच आकडी पगार, चारचाकी गाडी, तीन बीएचके फ्लॅट, दोन मुले आणि एक बायको असे सांगितले. आजच्या तरूणांना या संस्कृतीचा ध्यास लागल्याचे सहस्रबुध्दे म्हणाले