शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींचा कारभार निष्कलंक

By admin | Updated: June 6, 2016 00:46 IST

विनय सहस्रबुध्दे: ‘विकासपर्व’चे सांगलीत आयोजन

सांगली : आपल्याच विचारधारेला कॉँग्रेसने दिलेली तिलांजली आणि सर्वच पातळीवर घोटाळ्यांची मालिका सुरू करणाऱ्या कॉँग्रेस सरकारपासून जनतेला हवा असलेला समर्थ पर्याय पंतप्रधान नरेंद्र मोदींद्वारे मिळाला. मोदी सरकारचा गेल्या दोन वर्षातील कारभार ‘बेदाग’, निष्कलंक असल्याचा विश्वास भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, खा. विनय सहस्रबुध्दे यांनी रविवारी व्यक्त केला. येथील सांगली अर्बन बँकेच्या सभागृहात विद्यार्थी विकास प्रतिष्ठानच्यावतीने मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या ‘विकासपर्व’ या कार्यक्रमात सहस्रबुध्दे बोलत होते. सहस्रबुध्दे म्हणाले की, देशात एका प्रबळ शासकाचा दुष्काळ अनेक दशके पडला होता. राजकीय पक्षांकडे असलेली विचारधारा विकासाचे प्रतिमान गाठण्यात अपयशी ठरत असताना, देशभक्ती, राष्ट्रभक्तीचा आणि संतुलित विकास साधण्याचा प्रयत्न जनसंघापासून भाजपपर्यंत केला. याउलट सत्तेवर असलेल्या कॉँग्रेसने विचारधारेचे नातेच संपवून टाकले. एकीकडे समाजवादाबद्दल निष्ठा व्यक्त करायची आणि दुसरीकडे भांडवलदारांचे स्वागत करायचे, या सर्वांतूनच कॉँग्रेसने विचारधारेला तिलांजली दिली होती.जनतेची सुशासनाची तहान मोदी सरकारने भागविली तर आहेच, शिवाय जनताभिमुख कामकाजावर भर दिला आहे. निष्कलंक व्यवहार, गरीब, वंचित, शोषित वर्गाला न्याय, लोकहित, अंमलबजावणीला सर्वोच्च प्राधान्य, अशी काही वैशिष्ट्ये मोदी सरकारची सांगता येतील. सुगम्य भारत, पीक विमा योजना, मुद्रा योजना, स्टार्टअप्, स्टॅण्डअप् योजना आदी अनेक योजनांतून जनतेला प्राधान्य दिल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आ. सुरेश खाडे, संभाजीराव भिडे, सांगली अर्बन बॅँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ, शेखर इनामदार, संजय परमणे, डॉ. रवींद्र आरळी, श्रीकांत पटवर्धन, धनंजय खाडिलकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘फाईव्ह इन वन’ संस्कृतीआजच्या तरूणांना सरकारकडून काय पाहिजे, याचा ज्यावेळी अभ्यास केला, त्यावेळी पाच आकडी पगार, चारचाकी गाडी, तीन बीएचके फ्लॅट, दोन मुले आणि एक बायको असे सांगितले. आजच्या तरूणांना या संस्कृतीचा ध्यास लागल्याचे सहस्रबुध्दे म्हणाले