शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

नांदेडच्या अभिनंदनला सावलीने दिला कौटुंबिक जिव्हाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:34 IST

सांगलीत सावली केंद्रातील वृद्धांसोबत अभिनंदन महिनाभर रमला होता. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : लॉकडाऊनमध्ये कामावरून काढून टाकल्याने भरकटत आलेल्या ...

सांगलीत सावली केंद्रातील वृद्धांसोबत अभिनंदन महिनाभर रमला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : लॉकडाऊनमध्ये कामावरून काढून टाकल्याने भरकटत आलेल्या तरुणाला येथील सावली आधार केंद्राने आश्रय दिला. महिनाभर प्रेमाची ऊब दिल्यानंतर त्याला मूळ गावी नांदेडला पाठवले. केंद्राचे संचालक मुस्तफा मुजावर यांच्या पुढाकारातून त्याला हक्काचा निवारा मिळाला.

अभिनंदन अशोक ऐनापुरे, असे या तिशीतील पदवीधारक तरुणाचे नाव. विजयपूर येथे एका हॉटेलमध्ये तो व्यवस्थापकाची नोकरी करत होता. लॉकडाऊनमध्ये नोकरी गमवावी लागली. थोडेफार पैसे घेऊन गावाकडे निघाला. प्रवासात पैसेही संपले. दुकाने आणि हॉटेल्स बंद असल्याने रस्त्याकडेच्या झाडांवरील फळे खाऊन भूक भागवण्याची वेळ त्याच्यावर आली.

तब्बल ३५४ किलोमीटर चालत तो सांगलीत पोहोचला. ही घटना महिनाभरापूर्वीची. विश्रामबाग पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याची नजर त्याच्यावर पडली. त्याच्या माणुसकीमुळे तब्बल सात दिवसांनी अभिनंदनच्या पोटात अन्न पडले. पोलिसांनी सावली केंद्रामध्ये त्याला पाठवले. मुस्तफा मुजावर यांनी आश्रय दिला, नांदेडला कुटुंबीयांशी संपर्कही साधला.

नांदेड जिल्ह्यात मानमाड हे त्याचे गाव होते. लॉकडाऊनमुळे प्रवास शक्य नसल्याने महिनाभर तो केंद्रातच राहिला. त्याच्याशी संपर्क झाल्याने कुटुंबीय खुश होते. लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता मिळाल्यानंतर त्याला नांदेडला पाठविण्याची व्यवस्था झाली. सख्ख्या भावाप्रमाणे सावलीतील रहिवाशांनी अभिनंदनला निरोप दिला. महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांनी प्रवास खर्च आणि खाद्यपदार्थ दिले. मंगळवारी गावी पोहोचल्यानंतर त्याने ख्यालीखुशाली कळवली.