शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
4
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
5
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
6
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
7
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
8
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
9
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
10
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
11
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
12
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
13
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
14
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
15
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
16
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
17
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
18
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
19
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
20
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?

नागनाथअण्णांचे विचार समाजासाठी प्रेरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाळवा : क्रांतिवीर डाॅ. नागनाथअण्णांच्या खोलीत गेल्यावर मला माझ्या माहेरी आल्यासारखे वाटते. त्यांचे विचार समाजासाठी नेहमी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वाळवा : क्रांतिवीर डाॅ. नागनाथअण्णांच्या खोलीत गेल्यावर मला माझ्या माहेरी आल्यासारखे वाटते. त्यांचे विचार समाजासाठी नेहमी प्रेरणादायी राहतील, असे प्रतिपादन सांगलीच्या संपदा ग्रामीण महिला संस्थेच्या (संग्राम) सचिव मीना सरस्वती शेषू यांनी बुधवारी केले.

येथे ‘स्व. अरुणभैय्या नायकवडी स्मृती राज्यस्तरीय पुरस्कारा’ने मीना शेषू यांचा हुतात्मा उद्योग समूहाचे प्रमुख वैभव नायकवडी यांच्याहस्ते गाैरव करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. मानपत्र, स्मृतिचिन्ह व रोख २५ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी दापाेली कृषी विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावलेल्या श्वेता मयेकर या विद्यार्थिनीचा ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांच्याहस्ते गौरव करण्यात आला.

मीना शेषू म्हणाल्या की, नागनाथअण्णांच्या विचारांचा आदर्श घेऊन ‘संग्राम संस्था’ गेली २७ वर्षे कार्यरत आहे. या संस्थेने एचआयव्ही जनजागृतीबाबत केलेल्या कामाची दखल सरकारी पातळीवर घेण्यात आली. नागनाथअण्णांनी दाखविलेल्या वाटेवर संग्राम संस्थेची वाटचाल यापुढेही सुरू राहील.

वसंत भोसले म्हणाले की, सातारच्या प्रतिसरकारचे महाराष्ट्रात स्मारक हवे होते; परंतु ते झाले नाही. महाराष्ट्राच्या इतिहासातून प्रतिसरकारचे पानच गळून गेले आहे. राज्य सरकारनेसुद्धा प्रतिसरकारचा अमृतमहोत्सव साजरा केला नाही, याची खंत वाटते. डाॅ. नागनाथअण्णांबरोबर वडिलकीचे नाते हाेते. ते केव्हाही संपणार नाही.

वैभव नायकवडी म्हणाले, मीनाताईंना पुरस्कार देण्याचा समितीचा निर्णय कौतुकास्पद आहे. सामाजिक क्षेत्रात संग्राम संस्थेने दिलेल्या याेगदानाचा गाैरव यानिमित्ताने करता आल्याचा आनंद आहे.

प्रा. के. बी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. मानपत्राचे वाचन प्रा. राजा माळगी यांनी केले.

प्राचार्या डाॅ. सुषमा नायकवडी, सरपंच डाॅ. शुभांगी माळी, गौरव नायकवडी, नंदिनी नायकवडी, महादेव कांबळे, भगवान पाटील, दिनकर बाबर, यशवंत बाबर, कार्यकारी संचालक धीरजकुमार माने, आनंदराव शिंदे, विश्वास मुळीक उपस्थित होते. मुख्याध्यापक मधुकर वायदंडे यांनी आभार मानले.

चाैकट

पुरस्काराची रक्कम सम्यक विद्राेही प्रबाेधन संस्थेला

‘अरुणभैय्या नायकवडी स्मृती पुरस्कारा’च्या मानकरी मीना शेषू यांनी पुरस्काराची २५ हजार रुपयांची रक्कम सम्यक विद्रोही प्रबोधन संस्थेला देणगी म्हणून दिली.

चौकट

झारीतील शुक्राचार्यांमुळे सहकाराला घरघर

वैभव नायकवडी म्हणाले की, सहकारामधील झारीतील शुक्राचार्यांमुळे उसाची एफआरपी वाढते, पण साखरेची एमआरपी वाढत नाही. त्यामुळे एफआरपी देण्यासाठी हुतात्मा साखर कारखान्यास शंभर कोटींहून अधिक कर्ज घ्यावे लागते. सहकार संपविण्याचे काम चालले आहे.