शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

म्युकरमायकोसिसने पंधरा जणांच्या आयुष्यात केला अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : म्युकरमायकोसिसच्या हल्ल्यात जिल्ह्यात १५ रुग्णांना दृष्टी गमवावी लागली आहे. यापैकी १४ जणांनी एक डोळा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : म्युकरमायकोसिसच्या हल्ल्यात जिल्ह्यात १५ रुग्णांना दृष्टी गमवावी लागली आहे. यापैकी १४ जणांनी एक डोळा गमावला असून, एका रुग्णाच्या दोन्ही डोळ्यांना अंधत्व आले आहे.

म्युकरमायकोसिस तथा काळी बुरशी सायनसमधून डोळ्यांच्या नसांपर्यंत व तेथून मेंदूपर्यंत पसरते. ती पूर्णत: खरडून काढावी लागते. योग्यवेळी योग्य उपचार घेतले नाहीत, तर प्रसंगी जिवावरही बेतते. सध्या जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे २२९ रुग्ण आहेत, त्यापैकी १५ रुग्णांना दृष्टी गमवावी लागली आहे. सायनसमधून पसरत गेलेल्या बुरशीने डोळ्यांच्या नसांवर हल्ला केल्याने त्या काढून टाकाव्या लागल्या. १५ पैकी १४ रुग्णांच्या एका डोळ्याची नस काढावी लागली. त्यामुळे त्यांना अंशत: अंधत्व आले. एका रुग्णाच्या दोन्ही डोळ्यांमागील नसांवर बुरशीने हल्ला केला. त्यामुळे दोन्ही नसा काढून टाकण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्याला पूर्ण अंधत्व आले. या रुग्णांची दृष्टी गेली असली तरी बुबुळे शाबूत आहेत, त्यामुळे चेहरा सुदृढ दिसतो; पण त्यांच्या आयुष्यात मात्र अंधार पसरला आहे.

म्युकरमायकोसिस झालेल्या अनेक रुग्णांवर मोठ्या शस्त्रक्रियाही कराव्या लागल्या आहेत.

चौकट

...असा आहे काळ्या बुरशीचा फैलाव

- जिल्ह्यात बुधवारअखेरचे रुग्ण २२९

- म्युकरमायकोसिसमुळे झालेले मृत्यू १४

- म्युकरमायकोसिसमुळे अंशत: दृष्टी गमावलेले १५

- म्युकरमायकोसिसमुळे दोन्ही डोळे गमावले १

कोट

या सर्व रुग्णांना म्युकरमायकोसिसमुळे दृष्टी गमवावी लागली, असे म्हणता येत नाही. काही रुग्णांना पूर्वीपासून डोळ्यांचे विकार होते, ते म्युकरमायकोसिसमुळे बळावले. काही रुग्णांना मधुमेह होता, म्युकरमायकोसिस झाल्यावर मधुमेहामुळे गंभीर स्थिती झाली. अनेक रुग्णांना कोरोना झाल्यावरच आपल्याला मधुमेहासह अन्य विकार असल्याचे समजले. आरोग्यविषयी दुर्लक्ष केल्याचा त्यांना फटका बसला.

-डॉ. संजय पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक

कोट

म्युकरमायकोसिसची रुग्णसंख्या सध्या कमी होत आहे. योग्य व वेळेत उपचारांनी डोळे गमावण्यापासून बचाव करता येतो. पहिल्याच टप्प्यात लक्षणे दिसल्यानंतर त्वरित उपचार घ्यायला हवेत. विशेषत: मधुमेहींनी अधिक काळजी घ्यायला हवी. कोरोनाबाधितांनी डोळे, नाक व दातांच्या वेदनांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.

-डॉ. सुधीर कदम, नाक, कान, घसातज्ज्ञ व म्युकरमायकोसिस टास्क फोर्सचे सदस्य