शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
3
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
4
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
5
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
6
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
7
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
8
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
9
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
10
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
11
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
12
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
13
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
14
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
15
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
16
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
17
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
18
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
19
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
20
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई

तिहेरी तलाकविरुद्ध मुस्लिम महिलांचा एल्गार : सांगलीत मोर्चा, विधेयक मागे घेण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 18:57 IST

सांगली : केंद्र सरकारच्या प्रस्तावित तिहेरी तलाक विधेयकाविरुद्ध सांगलीत सोमवारी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डतर्फे मुस्लिम महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या प्रमाणात मोर्चा काढला.

सांगली : केंद्र सरकारच्या प्रस्तावित तिहेरी तलाक विधेयकाविरुद्ध सांगलीत सोमवारी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डतर्फे मुस्लिम महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या प्रमाणात मोर्चा काढला. हे विधेयक मागे न घेतल्यास संपूर्ण जिल्ह्यातील मुस्लिम महिला आंदोलनात उतरतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.

वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयापासून मोर्चास प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मोर्चा आल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले. महिलांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांना निवेदन दिले. तिहेरी तलाकबाबतचे विधेयक (विवाह विधेयक अधिकारी संरक्षण) मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड व धर्मगुरूंचे मत न घेता, तयार करण्यात आले आहे. यास मुुस्लिम महिलांचा विरोध आहे. या विधेयकामुळे मुस्लिम कुटुंबांचे नुकसान होणार आहे. विधेयक मागे न घेतल्यास आंदोलनाची व्याप्ती वाढविली जाईल. जिल्हास्तरावरुन सुरू झालेले हे आंदोलन देशव्यापी केले जाईल, असा इशारा महिलांनी दिला.

अ‍ॅड. सना कुरेशी, कौसरजबीन ढाले, अ‍ॅड. हमिदा खान, डॉ. शम्मीन पटेल, नसरीन कुरेशी, फातिमा मुल्ला, डॉ. शबनम शोख, अ‍ॅड. शफिना मुल्ला, डॉ. फरजाना मुल्ला, डॉ. तस्मया बानदार, रफिया खान, अलिमा शेख, असिफा सय्यद, तबसूम शेख यांच्यासह सांगली, मिरजेतील महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. माजी महापौर मैनुद्दीन बागवान, असीफ बावा, उमर गवंडी, अय्याज नायकवडी, मुक्ती मुझम्मील, मुक्ती जबुरे, मुक्ती सादीक, मौलाना अब्दुल रौफ, मौलाना गुलास गौस बंदेनवाज, मौलाना जुबेर बेपारी यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.पाण्याची सोयउन्हाचा तडाखा वाढल्याने मुस्लिम समाजातर्फे मोर्चात सहभागी झालेल्या महिला व मुस्लिम बांधवांना पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. वालचंद महाविद्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर पाच ते सहा ठिकाणी पाण्याच्या बॉटलचे वाटप सुरू होते. 

स्वयंसेवक तैनातमोर्चाच्या पार्श्वभूमीवर वालचंद महाविद्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय हा मार्ग पोलिसांनी बंद केला होता. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू राहिल्याने वाहतूक विस्कळीत बनली होती. मुस्लिम समाजाने त्यांचे स्वयंसेवक नियुक्त केले होते. हे स्वयंसेवक वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना मदत करीत होते. तसेच वाहनांचे पार्किंग रस्त्याकडेला करण्यासही त्यांनी मदत केली. मोर्चा संपल्यानंतरही सहभागी महिला जाईपर्यंत स्वयंसेवक रस्त्यावर थांबून वाहतूक सुरळीत करीत होते.