शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वे हाय अलर्टवर; अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी
3
Operation Sindoor : राजनाथ सिंह घेणार मोठी बैठक, तिन्ही लष्करप्रमुख आणि सीडीएस राहणार उपस्थित!
4
India-Pakistan Conflict: बलुचिस्तान मुक्त झाला! भारताच्या कारवाईदरम्यान मोठा दावा; दिल्लीत दूतावास उघडण्याची मागणी
5
४१ वर्षीय मराठमोळा अभिनेता करतोय परिक्षेची तयारी, काही दिवसांनी आहेत पेपर, म्हणतो - "मला चांगलं करायचं आहे…"
6
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
7
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
8
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
9
Operation Sindoor: युद्धजन्य स्थिती, अस्वस्थ मनस्थिती; सैनिकांसाठी स्वामींना कळकळीने करा 'ही' प्रार्थना!
10
Mother's Day 2025: आईला द्या ५ स्कीममध्ये गुंतवणूक करुन गिफ्ट; लोकही म्हणतील, मुल असावं तर असं!
11
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
12
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
13
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
14
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
16
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
17
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
18
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
19
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
20
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त

इस्लामपुरात मुस्लिम नेत्यांची फिल्डिंग

By admin | Updated: August 17, 2016 23:12 IST

पालिका निवडणुकांवर डोळा : नेता निवडीसाठी समाजापुढे मोठे आव्हान, दोघांना संधी शक्य

अशोक पाटील -- इस्लामपूर  शहरातील मुस्लिम मतांची संख्या विचारात घेता, आगामी पालिका निवडणुकीत दोघांना संधी मिळणार आहे. इस्लामपुरात काही नेते माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांचे नेतृत्व मानतात, तर काही महाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून कार्यरत आहेत. आता या दोघांना शह देण्यासाठी एम.आय.एम.च्या शाकीर तांबोळी यांनी मुस्लिम संघटनेच्या माध्यमातून राजकारण सुरु केले आहे. त्यामुळे मुस्लिम समाजापुढे नेता निवडीचे आव्हान उभे राहणार आहे.इस्लामपूर शहर हिंदू—मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून परिचित आहे. या शहरात कधीच जातीय तेढ निर्माण झाली नाही. दिवंगत राजारामबापू पाटील, एम. डी. पवार यांच्यासह आमदार जयंत पाटील यांनी मुस्लिम समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली. परंतु सध्या जातीय राजकारणाचे पेव फुटले आहे. त्यामुळे सर्व जाती-समाजांमध्ये विविध संघटना निर्माण झाल्या आहेत. इस्लामपूर शहरात शाकीर तांबोळी यांच्या माध्यमातून मुस्लिम संघटना सक्रिय झाली आहे. त्यांनी आगामी पालिका निवडणुकीसाठी चाचपणी सुरु केली आहे. परंतु तांबोळी यांना विरोध करण्यासाठी याच समाजातील नेते सरसावले आहेत.शहरात जेथे मुस्लिम समाजाची व्होट बँक आहे, त्याच प्रभागातून या समाजातील नेते निवडणूक लढवतात. शहरात ९ ते १0 हजारांच्या आसपास मुस्लिम समाजाची मते आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी गटातून एक पुरुष आणि एका महिलेला नगरसेवक होण्याची संधी मिळणार आहे. शहरातील प्रभाग क्र. ६, ८, १0 व १२ मध्ये मुस्लिम समाजाची मते जास्त आहेत. त्यातही ८ क्रमांकाच्या प्रभागात मुस्लिम मतदान जादा आहे. त्यामुळे या प्रभागातच सत्ताधारी व विरोधी गटाकडून उमेदवारांची रेलचेल असणार आहे. पीरअल्ली पुणेकर, रोझा किणीकर, आयुब हावलदार, मिनाज मुल्ला यांच्यासह माजी नगराध्यक्ष मुनीर पटवेकर यांनी राष्ट्रवादीच्या ताकदीवर निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली आहे, तर महाडिक गटाकडून जलाल मुल्ला, अ‍ॅड. फिरोज मगदूम यांच्या नावाची चर्चा आहे. या दोन गटांच्या विरोधात एम.आय.एम. चे शाकीर तांबोळी यांनी निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली आहे. मुस्लिम समाजातून उमेदवारांची संख्या मोठी असल्याने, त्यातच एम.आय.एम. ची भर पडल्याने हा समाज नेमका कोणाकडे झुकणार, याबाबत तर्क—वितर्क लढवले जात आहेत.एमआयएम बॅकफूटवर एम.आय.एम.चे जिल्हाध्यक्ष शाकीर तांबोळी यांनी प्रारंभीच्या टप्प्यात आक्रमक भूमिका घेतली होती. परंतु त्यांची संघटना बॅकफूटवर पडत चालली आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत विरोधी महाडिक युवा शक्तीशी ते हातमिळवणी करुन निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.कोण काय म्हणाले?सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा, मुस्लिम समाजाच्या प्रश्नांची जाणीव असणारा उमेदवार निवडून देणे गरजेचे आहे. फक्त मुस्लिम समाज मानून राजकारण करणाऱ्या नेत्यांना आमचा समाज थारा देणार नाही.- अ‍ॅड. फिरोज मगदूम, इस्लामपूर.मुस्लिम समाजात जातीच्या नावाखाली कितीही भूछत्र उगवले तरीही, माजी मंत्री, आमदार जयंत पाटील हे या समाजाचे एकमेव वटवृक्ष आहेत. त्यांच्या छायेखाली आमचा समाज एकदिलाने कार्यरत आहे.- सौ. रोझा किणीकर, शहराध्यक्षा, महिला राष्ट्रवादी