शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जत पालिकेचा कारभार पंचायतीसारखा

By admin | Updated: June 17, 2016 23:32 IST

नागरिकांचा अपेक्षाभंग : अपुरे-अप्रशिक्षित कर्मचारी; शहरातील महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित

जयवंत आदाटे-- जत --नगरपालिकेची स्थापना होऊन ८ जून २०१६ रोजी चार वर्षे पूर्ण झाली. परंतु येथे अपुरा व अप्रशिक्षित कर्मचारी वर्ग कार्यरत असल्यामुळे नगरपालिका असूनही कारभार ग्रामपंचायतीसारखा सुरू आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था, पार्किंग, मटण मार्केट, भाजी मार्केट आदी महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. नगराध्यक्ष इकबाल गवंडी व उपनगराध्यक्ष श्रीकांत शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले की, विरोधक विकास कामाला राजकीय द्वेषातून विरोध क रत आहेत. त्यामुळे शहरातील विकास कामांना खीळ बसत आहे.जत नगरपालिकेक डे सध्या एकूण ४४ कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. शासनाकडे आणखी २६ कर्मचाऱ्यांची नव्याने मागणी करण्यात आली आहे. राज्यात नव्यानेच स्थापन झालेल्या १०१ नगरपालिकांत दोन हजार ७७८ कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामध्ये जत पालिकेचाही समावेश आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात नव्याने कर्मचारी भरती होणे अपेक्षित आहे.नगरपालिकेसाठी सुसज्ज इमारत नाही. तत्कालीन ग्रामपंचायतीच्या एका छोट्या इमारतीत सध्या कारभार कसा तरी सुरू आहे. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे. त्याला अद्याप मान्यता मिळालेली नाही. नगरपालिकेत अपुरी जागा असल्यामुळे विषय समिती सभापती, शाखा अभियंता, विरोधी गटनेते, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांना बसण्यासाठी स्वतंत्र जागा अथवा कक्ष नाही. दोन मोठ्या आरसीसी खोल्यांच्या इमारतीमधून पालिकेचा कारभार केला जात आहे. दैनंदिन कामासाठी नागरिक पालिके त आले, तर त्याना ताटकळत दाटीवाटीने उभे राहून आपले काम करुन घ्यावे लागते आहे. या इमारतीत एकच शौचालय, तेही अरुंद जागेत आहे. येथे येणाऱ्या नागरिकांसाठी व महिलांसाठी येथे स्वतंत्र शौचालय सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे जत नगरपालिकेतच स्वच्छता अभियानाचा बोजवारा उडाला आहे. नगरपालिकेत पूर्णवेळ कायम स्वरुपात शाखा अभियंता नाहीत. हंगामी शाखा अभियंता आहेत. त्यांच्याकडून जत शहराच्या विकासात भर घालणारे काम झालेले नाही. गंधर्व ओढापात्राचे सुशोभिकरण करताना त्यांनी मनमानी केली आहे. त्यामुळे नगरसेवक त्यांना शिव्यांची लाखोली वाहत आहेत. मुख्याधिकारी म्हणून पंडित पाटील काम पाहत आहेत. त्यांच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयातील अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. त्यामुळे एक-दोन दिवस नगरपालिकेत व इतर दिवस ते जिल्हाधिकारी कार्यालयात काम करत आहेत. त्याचा विपरित परिणाम शहरातील विकास कामांवर होत आहे.अग्निशामक दल येथे मंजूर झाले आहे. परंतु त्याची पूर्णता अद्याप झालेली नाही. काही अनुचित प्रकार घडल्यास विजापूर, तासगाव, सांगोला येथून अग्निशामक यंत्रणा मागवावी लागते. नगरपालिकेत सत्ताधारी कोण आहेत व विरोधक कोण आहेत, हेच समजून येत नाही. नगरसेवकांसमोर विकास कामांचे आव्हान आहे. येणाऱ्या काही दिवसात त्याची पूर्तता त्यांच्याकडून व्हावी, अशी जत शहरातील नागरिकांची अपेक्षा आहे. यामुळे शहराच्या विकासाल खीळ बसत असल्याने नागरिकांनी मग नगरपालिके ला सर्व कर तर का भरायचे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.भम्रनिरास : शहराचा कायापालट नाहीचजत पालिकेची स्थापना ८ जून २०१२ रोजी झाली. पाच प्रभाग असून नगरसेवकांची संख्या सोळा आहे. पालिकेची स्थापना झाल्यानंतर जत शहराचा कायापालट होईल, संपूर्ण चेहरामोहरा बदलून जाईल, अशी आशा नागरिकांना होती. परंतु अपुरा व अप्रशिक्षित कर्मचारी वर्ग असल्यामुळे ही आशा फोल ठरली आहे. यामुळे शहराच्या विकासाला खीळ बसली असल्याचे नागरिकांची भावना आहे.