शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली ठाकरे बंधूंची खिल्ली
2
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
3
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
4
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
5
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
6
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
7
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
8
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
9
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
10
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
11
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
12
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
13
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
14
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
15
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
16
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
17
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
18
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
19
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
20
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?

जत पालिकेचा कारभार पंचायतीसारखा

By admin | Updated: June 17, 2016 23:32 IST

नागरिकांचा अपेक्षाभंग : अपुरे-अप्रशिक्षित कर्मचारी; शहरातील महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित

जयवंत आदाटे-- जत --नगरपालिकेची स्थापना होऊन ८ जून २०१६ रोजी चार वर्षे पूर्ण झाली. परंतु येथे अपुरा व अप्रशिक्षित कर्मचारी वर्ग कार्यरत असल्यामुळे नगरपालिका असूनही कारभार ग्रामपंचायतीसारखा सुरू आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था, पार्किंग, मटण मार्केट, भाजी मार्केट आदी महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. नगराध्यक्ष इकबाल गवंडी व उपनगराध्यक्ष श्रीकांत शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले की, विरोधक विकास कामाला राजकीय द्वेषातून विरोध क रत आहेत. त्यामुळे शहरातील विकास कामांना खीळ बसत आहे.जत नगरपालिकेक डे सध्या एकूण ४४ कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. शासनाकडे आणखी २६ कर्मचाऱ्यांची नव्याने मागणी करण्यात आली आहे. राज्यात नव्यानेच स्थापन झालेल्या १०१ नगरपालिकांत दोन हजार ७७८ कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामध्ये जत पालिकेचाही समावेश आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात नव्याने कर्मचारी भरती होणे अपेक्षित आहे.नगरपालिकेसाठी सुसज्ज इमारत नाही. तत्कालीन ग्रामपंचायतीच्या एका छोट्या इमारतीत सध्या कारभार कसा तरी सुरू आहे. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे. त्याला अद्याप मान्यता मिळालेली नाही. नगरपालिकेत अपुरी जागा असल्यामुळे विषय समिती सभापती, शाखा अभियंता, विरोधी गटनेते, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांना बसण्यासाठी स्वतंत्र जागा अथवा कक्ष नाही. दोन मोठ्या आरसीसी खोल्यांच्या इमारतीमधून पालिकेचा कारभार केला जात आहे. दैनंदिन कामासाठी नागरिक पालिके त आले, तर त्याना ताटकळत दाटीवाटीने उभे राहून आपले काम करुन घ्यावे लागते आहे. या इमारतीत एकच शौचालय, तेही अरुंद जागेत आहे. येथे येणाऱ्या नागरिकांसाठी व महिलांसाठी येथे स्वतंत्र शौचालय सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे जत नगरपालिकेतच स्वच्छता अभियानाचा बोजवारा उडाला आहे. नगरपालिकेत पूर्णवेळ कायम स्वरुपात शाखा अभियंता नाहीत. हंगामी शाखा अभियंता आहेत. त्यांच्याकडून जत शहराच्या विकासात भर घालणारे काम झालेले नाही. गंधर्व ओढापात्राचे सुशोभिकरण करताना त्यांनी मनमानी केली आहे. त्यामुळे नगरसेवक त्यांना शिव्यांची लाखोली वाहत आहेत. मुख्याधिकारी म्हणून पंडित पाटील काम पाहत आहेत. त्यांच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयातील अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. त्यामुळे एक-दोन दिवस नगरपालिकेत व इतर दिवस ते जिल्हाधिकारी कार्यालयात काम करत आहेत. त्याचा विपरित परिणाम शहरातील विकास कामांवर होत आहे.अग्निशामक दल येथे मंजूर झाले आहे. परंतु त्याची पूर्णता अद्याप झालेली नाही. काही अनुचित प्रकार घडल्यास विजापूर, तासगाव, सांगोला येथून अग्निशामक यंत्रणा मागवावी लागते. नगरपालिकेत सत्ताधारी कोण आहेत व विरोधक कोण आहेत, हेच समजून येत नाही. नगरसेवकांसमोर विकास कामांचे आव्हान आहे. येणाऱ्या काही दिवसात त्याची पूर्तता त्यांच्याकडून व्हावी, अशी जत शहरातील नागरिकांची अपेक्षा आहे. यामुळे शहराच्या विकासाल खीळ बसत असल्याने नागरिकांनी मग नगरपालिके ला सर्व कर तर का भरायचे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.भम्रनिरास : शहराचा कायापालट नाहीचजत पालिकेची स्थापना ८ जून २०१२ रोजी झाली. पाच प्रभाग असून नगरसेवकांची संख्या सोळा आहे. पालिकेची स्थापना झाल्यानंतर जत शहराचा कायापालट होईल, संपूर्ण चेहरामोहरा बदलून जाईल, अशी आशा नागरिकांना होती. परंतु अपुरा व अप्रशिक्षित कर्मचारी वर्ग असल्यामुळे ही आशा फोल ठरली आहे. यामुळे शहराच्या विकासाला खीळ बसली असल्याचे नागरिकांची भावना आहे.