शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

महापालिकेची सूत्रे जयश्रीतार्इंकडे येणार!

By admin | Updated: October 20, 2015 00:18 IST

पक्षबैठकीत शिक्कामोर्तब : काँग्रेसचे नगरसेवक आज घालणार साकडे; पदाधिकाऱ्यांनी दिले संकेत

सांगली : गेली पस्तीस वर्षे तत्कालीन सांगली नगरपालिका व सध्याच्या महापालिकेवर एकहाती अधिराज्य गाजविणाऱ्या माजी मंत्री मदन पाटील यांच्या पश्चात महापालिकेचे नेतृत्व त्यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे. मदनभाऊ निष्ठावंत नगरसेवकांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून, महापालिकेतील काँग्रेस पक्षाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यापुढे महापालिकेत जयश्रीतार्इंचाच शब्द अंतिम राहील, असे एका पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले. काँग्रेसचे नेते माजी मंत्री मदन पाटील यांचे शुक्रवारी निधन झाले. मदन पाटील यांनी सांगली नगरपालिकेचे नगरसेवकपद, नगराध्यक्षपद भूषविले. १९९८ मध्ये महापालिकेची स्थापना झाली. पहिल्याच निवडणुकीत मदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन झाली होती. त्यानंतर दुसरी निवडणूकही त्यांनी निर्विवादपणे जिंकली. २००८ मध्ये मात्र त्यांच्या नेतृत्वाला धक्का बसला होता. पण २०१३ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत मदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने एकहाती सत्ता हस्तगत केली होती. गेली पस्तीस वर्षे मदन पाटील यांनी नगरपालिका व सध्याच्या महापालिकेचे नेतृत्व केले. महापालिकेचा कारभार सांभाळणे तसे कसरतीचे काम आहे. नाना तऱ्हेच्या नगरसेवकांना एकाच छताखाली ठेवण्याची धमक मदनभाऊंकडे होती. त्यांच्या नजरेतच जरब होती. त्यामुळे भाऊंचा आदेश आला की सारे नगरसेवक एक होत. त्यांच्या पश्चात महापालिकेची सूत्रे कोणाकडे जाणार, याची चर्चा सुरू होती. आता त्याला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न सत्ताधारी गटातून केला जात आहे. महापालिकेत काँग्रेसच्या चिन्हावर ४२ नगरसेवक निवडून आले आहेत. तीन नगरसेवक स्वीकृत आहेत. त्यापैकी २५ नगरसेवक मदनभाऊनिष्ठ मानले जातात. या नगरसेवकांनी मदनभाऊंच्या पश्चात त्यांच्या पत्नी जयश्रीताई यांच्याकडे महापालिकेची सूत्रे सोपविण्यावर चर्चा केली. सोमवारी काँग्रेसच्या पक्षबैठकीत त्याला बहुतांश नगरसेवकांनी सहमती दर्शविली आहे. त्यामुळे महापालिकेचे नेतृत्व जयश्रीताई करणार, हे स्पष्ट झाले आहे. पण अद्याप जयश्रीतार्इंनी राजकारणात सक्रिय होणार की नाही, याविषयी कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यासाठी मंगळवारी महासभेनंतर सर्व नगरसेवक जयश्रीतार्इंची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यांना भेटून मदनभाऊ गटाचे नेतृत्व त्यांनी करावे, असे साकडेही त्यांना घातले जाणार आहे. महापालिकेसह विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांनीही जयश्रीतार्इंच्या नावासाठी आग्रह धरला आहे. रक्षाविसर्जनावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी, जयश्रीतार्इंना ताकद देण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. आता महापालिकेतील नगरसेवकांनीही जयश्रीतार्इंवर विश्वास दाखविला आहे. मंगळवारी महासभेचे कामकाज संपल्यानंतर नगरसेवक जयश्रीतार्इंची भेट घेऊन साकडे घालणार आहेत. या पक्षबैठकीला गटनेते किशोर जामदार, महापौर विवेक कांबळे, स्थायी समिती सभापती संतोष पाटील, सुरेश आवटी, संजय मेंढे यांच्यासह बहुतांश नगरसेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)मदनभाऊंचे स्मारक : पुतळाही उभारणारमहापालिकेच्यावतीने मदन पाटील यांचा पुतळा व स्मारक उभारण्यावरही बैठकीत चर्चा झाली. सुरेश आवटी यांनी मदनभाऊंच्या जयंतीपूर्वी म्हणजे २ डिसेंबरपर्यंत पुतळ्याचे काम गतीने करण्याची सूचना मांडली. वसंतदादा स्फूर्ती स्थळावर मदनभाऊंचे स्मारक उभारले जाणार आहे. तसेच शहरातील महापालिकेच्या खुल्या जागेवर मदनभाऊंचा पुतळा व उद्यान उभे करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्यासाठी लवकरच जागांची निश्चिती केली जाईल. सध्या माधवनगर रस्त्यावरील टीव्हीएससमोरील भूखंड, विजयनगर येथील खुला भूखंड अशा दोन ते तीन जागांचा विचार सुरू आहे. महासभा झाली रद्दमहापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी होत आहे. मदन पाटील यांच्या निधनाने ही सभा रद्द करण्याचा निर्णय सत्ताधारी गटाने घेतला आहे. सभेची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर महापालिकेच्यावतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मदनभाऊंना आदरांजली वाहण्यात येणार आहे.