शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

म्हैसाळचे पाणी आठवड्यात मिळणार

By admin | Updated: March 28, 2015 00:03 IST

मिरज पूर्व भाग : लाभार्थी क्षेत्रातील ७० टक्के शेतकऱ्यांचे मागणी अर्ज हवेत

प्रवीण जगताप - लिंगनूर मिरज पूर्व भाग व कवठेमहांकाळ तालुक्याला म्हैसाळ योजनेच्या पाण्याची प्रतीक्षा लागून राहिली असून, थकबाकी आणि तोडलेल्या वीज कनेक्शनला लागलेल्या ग्रहणामुळे यंदाचे उन्हाळी आवर्तन अडचणीत आले होते. परंतु आयुक्त कार्यालयाकडून १ कोटी ६२ लाख रुपये भरल्याने विद्युत मंडळाने वीज जोडणी केली. आता लाभार्थी क्षेत्राच्या किमान ७० टक्के क्षेत्रातून पाण्याचे मागणी अर्ज केल्यास आठवडाभरात म्हैसाळच्या कालव्यातून पाणी खळाळू शकेल, अशी आशा निर्माण झाली आहे.याबाबत शासनदरबारी मुंबईतही वरिष्ठ अधिकाऱ्यांची सोमवारी दुपारी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मिरज पूर्व भागातील कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांपुढे पुन्हा पाणी सोडण्याची मागणी केली. दरम्यान, शासनाच्या आयुक्त कार्यालयाकडून यापूर्वीच भरलेल्या १ कोटी ६२ लाख रुपयांच्या रकमेमुळे ५ कोटी ६९ लाख रुपयांच्या थकित वीज बिलाचा आकडा कमी झाल्याने विद्युत मंडळाने तोडलेली वीज सध्या जोडली आहे. त्यामुळे आता केवळ थकित पाणीपट्टी आणि अपुऱ्या मागणी अर्जांमुळे पाणी सोडण्यात बंधने येत आहेत. मात्र लोकप्रतिनिधींचे प्रयत्न आणि शासनाकडून मिळालेले मार्गदर्शन यातून तूर्तास खात्याने तोडगा काढला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाणीपट्टी भरावीच लागणार आहे, पण तूर्तास किमान ७० टक्के मागणी अर्ज आठवडाभरात वेगाने जमा केल्यास पाणी सोडण्यात येईल. शिवाय थकित पाणीपट्टीत तशीच पुढे वाढ होणार आहे. तथापि शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान यंदाच्या आवर्तनाअभावी होऊ नये, म्हणून पुरेसे मागणी अर्ज आल्यानंतर पाणी लगेच सोडण्यात येणार आहे. याबाबत पूर्व भागातील पदाधिकाऱ्यांशी चर्चाही झाली असून मागणी अर्ज जमा करण्यासाठी गावा-गावातील पदाधिकारी तसेच पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही सहकार्य करण्याचे ठरविले आहे.थकबाकी भरल्याने वीज पुरवठा सुरळीतशासनाच्या आयुक्त कार्यालयाकडून यापूर्वीच भरलेल्या १ कोटी ६२ लाख रुपयांच्या रकमेमुळे ५ कोटी ६९ लाख रुपयांच्या थकित वीज बिलाचा आकडा कमी झाल्याने विद्युत मंडळाने तोडलेली वीज सध्या जोडली आहे.