शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

म्हैसाळचे पाणी आठवड्यात मिळणार

By admin | Updated: March 28, 2015 00:03 IST

मिरज पूर्व भाग : लाभार्थी क्षेत्रातील ७० टक्के शेतकऱ्यांचे मागणी अर्ज हवेत

प्रवीण जगताप - लिंगनूर मिरज पूर्व भाग व कवठेमहांकाळ तालुक्याला म्हैसाळ योजनेच्या पाण्याची प्रतीक्षा लागून राहिली असून, थकबाकी आणि तोडलेल्या वीज कनेक्शनला लागलेल्या ग्रहणामुळे यंदाचे उन्हाळी आवर्तन अडचणीत आले होते. परंतु आयुक्त कार्यालयाकडून १ कोटी ६२ लाख रुपये भरल्याने विद्युत मंडळाने वीज जोडणी केली. आता लाभार्थी क्षेत्राच्या किमान ७० टक्के क्षेत्रातून पाण्याचे मागणी अर्ज केल्यास आठवडाभरात म्हैसाळच्या कालव्यातून पाणी खळाळू शकेल, अशी आशा निर्माण झाली आहे.याबाबत शासनदरबारी मुंबईतही वरिष्ठ अधिकाऱ्यांची सोमवारी दुपारी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मिरज पूर्व भागातील कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांपुढे पुन्हा पाणी सोडण्याची मागणी केली. दरम्यान, शासनाच्या आयुक्त कार्यालयाकडून यापूर्वीच भरलेल्या १ कोटी ६२ लाख रुपयांच्या रकमेमुळे ५ कोटी ६९ लाख रुपयांच्या थकित वीज बिलाचा आकडा कमी झाल्याने विद्युत मंडळाने तोडलेली वीज सध्या जोडली आहे. त्यामुळे आता केवळ थकित पाणीपट्टी आणि अपुऱ्या मागणी अर्जांमुळे पाणी सोडण्यात बंधने येत आहेत. मात्र लोकप्रतिनिधींचे प्रयत्न आणि शासनाकडून मिळालेले मार्गदर्शन यातून तूर्तास खात्याने तोडगा काढला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाणीपट्टी भरावीच लागणार आहे, पण तूर्तास किमान ७० टक्के मागणी अर्ज आठवडाभरात वेगाने जमा केल्यास पाणी सोडण्यात येईल. शिवाय थकित पाणीपट्टीत तशीच पुढे वाढ होणार आहे. तथापि शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान यंदाच्या आवर्तनाअभावी होऊ नये, म्हणून पुरेसे मागणी अर्ज आल्यानंतर पाणी लगेच सोडण्यात येणार आहे. याबाबत पूर्व भागातील पदाधिकाऱ्यांशी चर्चाही झाली असून मागणी अर्ज जमा करण्यासाठी गावा-गावातील पदाधिकारी तसेच पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही सहकार्य करण्याचे ठरविले आहे.थकबाकी भरल्याने वीज पुरवठा सुरळीतशासनाच्या आयुक्त कार्यालयाकडून यापूर्वीच भरलेल्या १ कोटी ६२ लाख रुपयांच्या रकमेमुळे ५ कोटी ६९ लाख रुपयांच्या थकित वीज बिलाचा आकडा कमी झाल्याने विद्युत मंडळाने तोडलेली वीज सध्या जोडली आहे.