शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

आचारसंहितेनंतर महापौर बदलाच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 00:01 IST

सांगली : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर महापालिकेत महापौर बदलाच्या हालचालींना वेग येणार आहे. सत्ताधारी भाजप नेत्यांनी अडीच वर्षात तीन ...

सांगली : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर महापालिकेत महापौर बदलाच्या हालचालींना वेग येणार आहे. सत्ताधारी भाजप नेत्यांनी अडीच वर्षात तीन महापौर करण्याची घोषणा केली होती. त्यातच विद्यमान महापौरांचा दहा महिन्यांचा कालावधी जूनमध्ये संपणार आहे. त्यामुळे महापौर पदासाठी इच्छुक असलेल्या नगरसेविकांनी आतापासूनच फिल्डिंग लावण्यास सुरूवात केली आहे.महापालिकेत काँग्रेसची दीर्घकालीन सत्ता उलथवून पहिल्यांदाच भाजपने सत्ता काबीज केली होती. गेल्या आॅगस्ट महिन्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे ४१ नगरसेवक निवडून आले, तर दोन अपक्ष नगरसेवकांनीही भाजपला पाठिंबा दिला आहे. सध्या महापालिकेत काँग्रेस व राष्ट्रवादीचे ३५ नगरसेवक आहेत. भाजपने पहिल्यांदाच सत्तेत आल्याने महापौर, उपमहापौर, गटनेता या प्रमुख पदांवर अनुभवी नगरसेवकांना संधी दिली. महापौर पदासाठी भाजपमध्ये मोठी चुरस होती. गेली २० वर्षे नगरसेविका म्हणून काम करणाऱ्या संगीता खोत यांच्यासह नव्याने निवडून आलेल्या सविता मदने, कल्पना कोळेकर, अस्मिता सलगर, उर्मिला बेलवलकर, नसीमा नाईक, गीता सुतार यांचा इच्छुकांमध्ये समावेश होता, तर अनारकली कुरणे सर्वसाधारण महिला गटातून विजयी झाल्या असल्या तरी, त्यांच्याकडे ओबीसीचा दाखला असल्याने त्यांच्या नावाचीही चर्चा होती. अखेर अनुभवी संगीता खोत यांनी महापौर पदावर बाजी मारली.महापौर निवडीवेळी भाजपच्या नेत्यांनी अडीच वर्षाच्या कालावधीत तीन महापौर करणार असल्याची घोषणा केली होती. प्रत्येक महापौरास दहा महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार विद्यमान महापौर संगीता खोत यांचा कार्यकाल जूनअखेरीस संपणार आहे. त्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने महापालिकेत सामसूम आहे. आचारसंहिता संपल्यानंतर महापौर बदलाच्या हालचालींना वेग येणार आहे. इच्छुकांनीही मोर्चेबांधणीला सुरुवातकेली आहे. जुलै महिन्यात नव्या महापौरांची निवड व्हावी, यासाठी इच्छुक सरसावले आहेत.सांगलीला संधी मिळण्याची शक्यतासध्या महापौरपद मिरज शहराकडे आहे. आगामी विधानसभा निवडणूक पाहता, पुढील महापौर सांगलीचा होईल, असा अंदाज आहे. सांगलीतून महापौर पदासाठी गीता सुतार, अनारकली कुरणे, सविता मदने यांची नावे चर्चेत येणार आहेत. यापैकी कुरणे या अनुभवी नगरसेविका आहेत, तर सुतार व मदने या पहिल्यांदाच निवडून आल्या असल्या तरी, भाजपच्या राजकीय गणितात त्यांची नावे आघाडीवर राहण्याची शक्यता आहे.