शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

साखर सम्राटांपुढे चळवळ गारद-- शेट्टी-खोत यांच्या भूमिकेने ऊस उत्पादकांत अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 23:26 IST

इस्लामपूर : खासदार राजू शेट्टी यांनी आघाडीतून बाहेर पडून शेतकरी चळवळीशी आपली नाळ पुन्हा भक्कम केली आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायतींसाठी कंबर कसली

अशोक पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : खासदार राजू शेट्टी यांनी आघाडीतून बाहेर पडून शेतकरी चळवळीशी आपली नाळ पुन्हा भक्कम केली आहे. शेतकरी चळवळीतून खासदार शेट्टी यांची हवा काढून टाकण्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे पर्यायी संघटना उभी करत आहेत. मात्र या दोघांच्या भूमिकेबद्दल ऊस उत्पादकांतून नाराजी व्यक्त होत आहे. याचाच फायदा आता साखरसम्राटांनी उठविला आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत या सम्राटांनी बाजी मारण्यासाठी कंबर कसली आहे.शेट्टी—खोत यांनी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यासह राज्यात ऊस उत्पादकांची मोळी बांधून साखर सम्राटांना पुरते आव्हान दिले होते. त्यांचे विरोधक म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील साखर सम्राटांचे नेते जयंत पाटील यांचे नाव प्रामुख्याने घेतले जात होते. संघटना फोडण्यासाठी जयंतनीतीचा वापरही करण्यात आला. परंतु याचा कसलाही परिणाम झाला नाही.

शेतकºयांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदार शेट्टी हे महाआघाडीत सामील झाले. त्यातच भाजपने सदाभाऊ खोत यांना कृषी राज्यमंत्रीपद देऊन शेतकºयांच्या आशा पल्लवित केल्या. परंतु मंत्रीपद मिळाल्यानंतर खोत हे शेतकºयांपासून दुरावून भाजपमय झाले. त्यांच्याकडून शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न केला. येथूनच खोत आणि शेट्टी यांच्यात वादाची ठिणगी पडली.

घराणेशाहीच्या मुद्यावर भाषणबाजी करणाºया मंत्री खोत यांनी, मध्यंतरी झालेल्या जि. प. निवडणुकीत चिरंजीव सागर खोत यांना उमेदवारी दिली. त्यामुळेही खा. शेट्टी चांगलेच नाराज झाले. या वादात दोघांनीही शेतकºयांच्या प्रश्नाकडे पूर्णपणे पाठ फिरवली. त्यामुळे शेतकºयांना शासनाने ठरवून दिलेली एफ.आर.पी. तर सोडाच, पहिला हप्ता देण्यासही विलंब लावला.

या दोघांमध्ये सुरु असलेल्या वादाचा फायदा साखर सम्राटांनी उठविला आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णयही काही साखर सम्राटांनी घेतला आहे. त्यांच्या ताकदीपुढे आता शेतकरी चळवळ गारद झाली आहे. याचा फटका मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर मंत्री सदाभाऊ खोत यांच्या नवीन होणाºया संघटनेलाही बसणार आहे, हे मात्र निश्चित.शेतकरी दुरावू लागलेपश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी सक्षम कारखान्यांनी शासनाच्या एफ.आर.पी.पेक्षाही जादा दर देऊन ऊस उत्पादकांना खूष केले आहे, तर काही कारखान्यांनी पहिले बिल काढतानाही मोठा विलंब लावला. वास्तविक पाहता ऊस दराच्या आंदोलनासाठी प्रसिध्द असलेल्या शेट्टी—खोत यांच्या संघटनेने यावेळी आंदोलन करणे गरजेचे होते. परंतु त्यांनी कसलाही हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे ऊस दर मिळालेले आणि न मिळालेले शेतकरीही आता संघटनेपासून दुरावले आहेत.

ऊस उत्पादकांच्या ताकदीवर शेट्टी—खोत यांनी स्वत:चा स्वार्थ साधून घेतला. आंदोलनाच्यारूपाने ताकद दाखवून, साखर सम्राटांच्या अँटी चेंबरमध्ये जाऊन तोडी करण्याचा उद्योगच सुरु केला आहे. यातूनच या दोघांमध्ये संघर्ष उफाळला आहे. आता शेट्टी—खोत यांनी शेतकºयांबद्दल कितीही कळवळा दाखवला तरी, बळीराजा त्यांना माफ करणार नाही.विश्वासराव पाटील,माजी उपाध्यक्ष, राजारामबापू सह. साखर कारखाना.