शहरं
Join us  
Trending Stories
1
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
2
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
3
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
4
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
5
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
6
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
7
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
8
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
9
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
10
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
11
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
12
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
13
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
14
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
15
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
16
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
17
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
18
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
19
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
20
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?

साखर सम्राटांपुढे चळवळ गारद-- शेट्टी-खोत यांच्या भूमिकेने ऊस उत्पादकांत अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 23:26 IST

इस्लामपूर : खासदार राजू शेट्टी यांनी आघाडीतून बाहेर पडून शेतकरी चळवळीशी आपली नाळ पुन्हा भक्कम केली आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायतींसाठी कंबर कसली

अशोक पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : खासदार राजू शेट्टी यांनी आघाडीतून बाहेर पडून शेतकरी चळवळीशी आपली नाळ पुन्हा भक्कम केली आहे. शेतकरी चळवळीतून खासदार शेट्टी यांची हवा काढून टाकण्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे पर्यायी संघटना उभी करत आहेत. मात्र या दोघांच्या भूमिकेबद्दल ऊस उत्पादकांतून नाराजी व्यक्त होत आहे. याचाच फायदा आता साखरसम्राटांनी उठविला आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत या सम्राटांनी बाजी मारण्यासाठी कंबर कसली आहे.शेट्टी—खोत यांनी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यासह राज्यात ऊस उत्पादकांची मोळी बांधून साखर सम्राटांना पुरते आव्हान दिले होते. त्यांचे विरोधक म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील साखर सम्राटांचे नेते जयंत पाटील यांचे नाव प्रामुख्याने घेतले जात होते. संघटना फोडण्यासाठी जयंतनीतीचा वापरही करण्यात आला. परंतु याचा कसलाही परिणाम झाला नाही.

शेतकºयांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदार शेट्टी हे महाआघाडीत सामील झाले. त्यातच भाजपने सदाभाऊ खोत यांना कृषी राज्यमंत्रीपद देऊन शेतकºयांच्या आशा पल्लवित केल्या. परंतु मंत्रीपद मिळाल्यानंतर खोत हे शेतकºयांपासून दुरावून भाजपमय झाले. त्यांच्याकडून शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न केला. येथूनच खोत आणि शेट्टी यांच्यात वादाची ठिणगी पडली.

घराणेशाहीच्या मुद्यावर भाषणबाजी करणाºया मंत्री खोत यांनी, मध्यंतरी झालेल्या जि. प. निवडणुकीत चिरंजीव सागर खोत यांना उमेदवारी दिली. त्यामुळेही खा. शेट्टी चांगलेच नाराज झाले. या वादात दोघांनीही शेतकºयांच्या प्रश्नाकडे पूर्णपणे पाठ फिरवली. त्यामुळे शेतकºयांना शासनाने ठरवून दिलेली एफ.आर.पी. तर सोडाच, पहिला हप्ता देण्यासही विलंब लावला.

या दोघांमध्ये सुरु असलेल्या वादाचा फायदा साखर सम्राटांनी उठविला आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णयही काही साखर सम्राटांनी घेतला आहे. त्यांच्या ताकदीपुढे आता शेतकरी चळवळ गारद झाली आहे. याचा फटका मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर मंत्री सदाभाऊ खोत यांच्या नवीन होणाºया संघटनेलाही बसणार आहे, हे मात्र निश्चित.शेतकरी दुरावू लागलेपश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी सक्षम कारखान्यांनी शासनाच्या एफ.आर.पी.पेक्षाही जादा दर देऊन ऊस उत्पादकांना खूष केले आहे, तर काही कारखान्यांनी पहिले बिल काढतानाही मोठा विलंब लावला. वास्तविक पाहता ऊस दराच्या आंदोलनासाठी प्रसिध्द असलेल्या शेट्टी—खोत यांच्या संघटनेने यावेळी आंदोलन करणे गरजेचे होते. परंतु त्यांनी कसलाही हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे ऊस दर मिळालेले आणि न मिळालेले शेतकरीही आता संघटनेपासून दुरावले आहेत.

ऊस उत्पादकांच्या ताकदीवर शेट्टी—खोत यांनी स्वत:चा स्वार्थ साधून घेतला. आंदोलनाच्यारूपाने ताकद दाखवून, साखर सम्राटांच्या अँटी चेंबरमध्ये जाऊन तोडी करण्याचा उद्योगच सुरु केला आहे. यातूनच या दोघांमध्ये संघर्ष उफाळला आहे. आता शेट्टी—खोत यांनी शेतकºयांबद्दल कितीही कळवळा दाखवला तरी, बळीराजा त्यांना माफ करणार नाही.विश्वासराव पाटील,माजी उपाध्यक्ष, राजारामबापू सह. साखर कारखाना.