शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

मुख्यमंत्र्यांच्या शाबासकीसाठी आंदोलन मोडण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 23:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यात गुंड, गुन्हेगार, तडीपार मोकाट आणि आंदोलनकर्ते तुरुंगात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री व भाजपच्या नेत्यांची शाबासकी मिळविण्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुखांकडून शेतकºयांचे आंदोलन मोडीत काढण्याची सुपारी घेतल्याचा आरोप शेतकरी सुकाणू समितीने बुधवारी पत्रकार बैठकीत केला. जिल्हा पोलिस प्रमुखांच्या बदलीसाठी जिल्हाधिकारी व विशेष पोलिस महानिरीक्षकांना निवेदन ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यात गुंड, गुन्हेगार, तडीपार मोकाट आणि आंदोलनकर्ते तुरुंगात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री व भाजपच्या नेत्यांची शाबासकी मिळविण्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुखांकडून शेतकºयांचे आंदोलन मोडीत काढण्याची सुपारी घेतल्याचा आरोप शेतकरी सुकाणू समितीने बुधवारी पत्रकार बैठकीत केला. जिल्हा पोलिस प्रमुखांच्या बदलीसाठी जिल्हाधिकारी व विशेष पोलिस महानिरीक्षकांना निवेदन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.चक्का जाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दडपशाही करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्याचे सुकाणू समितीतील महेश खराडे, उमेश देशमुख, विकास मगदूम यांनी सांगितले.ते म्हणाले की, शेतकºयांच्या कर्जमाफीबाबत गत आंदोलनावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन अज्ञातस्थळी नेले. तेव्हाही मोठा दंगा करून आंदोलकांना मारहाण केली. आताही १४ आॅगस्टरोजी सुकाणू समितीने राज्यभर चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर, आंदोलकांना आदल्यादिवशीच ताब्यात घेण्यात आले. पोलिस आंदोलकांच्या घरांभोवती चकरा मारत होते. आंदोलन करण्यापूर्वीच त्यांना अटक करण्याचे षड्यंत्र पोलिसांनी सुरू केले आहे.पोलिसांची दहशत गुंड, गुन्हेगार, तस्करांवर असावी, लोकशाही मार्गाने आंदोलन करणाºयांवर नव्हे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. दिवसाढवळ्या खून होत आहेत. पोलिसच दरोडे टाकत आहेत. ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात कित्येक पोलिस अडकले आहेत. खुद्द पोलिस प्रमुखांच्या बंगल्याच्या आवारातील चंदनाची झाडे चोरीस गेली आहेत. अशी परिस्थिती असताना, पोलिस मात्र शेतकºयांसाठी कार्य करणाºया आंदोलकांच्या मागे हात धुऊन लागल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री व सत्ताधारी भाजपची शाबासकी मिळविण्यासाठीच हा खटाटोप सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.जिल्हा पोलिस प्रमुखांनी बंधारे बांधले, निर्भया पथके तयार केली, त्यांचे निश्चितच कौतुक आहे. पण शेतकरी आंदोलकांवर गुन्हेगारांप्रमाणे होणारी कारवाई कदापीही खपवून घेणार नाही. जिल्ह्यात आंदोलनेच होऊ नयेत असे वाटत असेल, तर मुख्यमंत्र्यांना सांगून सांगली जिल्ह्यापुरती सरसकट कर्जमाफी मिळवून द्यावी, असे आव्हान देत, पोलिस प्रमुखांच्या बदलीसाठी विशेष पोलिस महानिरीक्षकांना निवेदन देणार आहे, असेही ते म्हणाले.पाठलाग करून अटकमहेश खराडे म्हणाले की, चक्का जाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी माझ्यासह उमेश देशमुख, विकास मगदूम व इतरांच्या घरावर पाळत ठेवली होती. आंदोलनापूर्वीच अटक होण्याची कुणकुण लागताच मी शंभरफुटी रस्त्यावरील मित्राच्या फ्लॅटमध्ये रात्रभर थांबून होतो. रात्री मी मोबाईलही बंद केला होता. सकाळी देशमुख यांच्याशी संपर्कासाठी मोबाईल सुरू केला. त्याच्या लोकेशनवरून पोलिसांनी माझ्या अटकेसाठी बंदोबस्त पाठविला. पोलिसांना चुकवून मी दुसºया रस्त्याने निघून गेलो, तर पोलिसांनी माझा चित्रपटाला शोभेल असा पाठलाग करून अटक केली.