शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

मुख्यमंत्र्यांच्या शाबासकीसाठी आंदोलन मोडण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 23:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यात गुंड, गुन्हेगार, तडीपार मोकाट आणि आंदोलनकर्ते तुरुंगात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री व भाजपच्या नेत्यांची शाबासकी मिळविण्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुखांकडून शेतकºयांचे आंदोलन मोडीत काढण्याची सुपारी घेतल्याचा आरोप शेतकरी सुकाणू समितीने बुधवारी पत्रकार बैठकीत केला. जिल्हा पोलिस प्रमुखांच्या बदलीसाठी जिल्हाधिकारी व विशेष पोलिस महानिरीक्षकांना निवेदन ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यात गुंड, गुन्हेगार, तडीपार मोकाट आणि आंदोलनकर्ते तुरुंगात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री व भाजपच्या नेत्यांची शाबासकी मिळविण्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुखांकडून शेतकºयांचे आंदोलन मोडीत काढण्याची सुपारी घेतल्याचा आरोप शेतकरी सुकाणू समितीने बुधवारी पत्रकार बैठकीत केला. जिल्हा पोलिस प्रमुखांच्या बदलीसाठी जिल्हाधिकारी व विशेष पोलिस महानिरीक्षकांना निवेदन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.चक्का जाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दडपशाही करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्याचे सुकाणू समितीतील महेश खराडे, उमेश देशमुख, विकास मगदूम यांनी सांगितले.ते म्हणाले की, शेतकºयांच्या कर्जमाफीबाबत गत आंदोलनावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन अज्ञातस्थळी नेले. तेव्हाही मोठा दंगा करून आंदोलकांना मारहाण केली. आताही १४ आॅगस्टरोजी सुकाणू समितीने राज्यभर चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर, आंदोलकांना आदल्यादिवशीच ताब्यात घेण्यात आले. पोलिस आंदोलकांच्या घरांभोवती चकरा मारत होते. आंदोलन करण्यापूर्वीच त्यांना अटक करण्याचे षड्यंत्र पोलिसांनी सुरू केले आहे.पोलिसांची दहशत गुंड, गुन्हेगार, तस्करांवर असावी, लोकशाही मार्गाने आंदोलन करणाºयांवर नव्हे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. दिवसाढवळ्या खून होत आहेत. पोलिसच दरोडे टाकत आहेत. ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात कित्येक पोलिस अडकले आहेत. खुद्द पोलिस प्रमुखांच्या बंगल्याच्या आवारातील चंदनाची झाडे चोरीस गेली आहेत. अशी परिस्थिती असताना, पोलिस मात्र शेतकºयांसाठी कार्य करणाºया आंदोलकांच्या मागे हात धुऊन लागल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री व सत्ताधारी भाजपची शाबासकी मिळविण्यासाठीच हा खटाटोप सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.जिल्हा पोलिस प्रमुखांनी बंधारे बांधले, निर्भया पथके तयार केली, त्यांचे निश्चितच कौतुक आहे. पण शेतकरी आंदोलकांवर गुन्हेगारांप्रमाणे होणारी कारवाई कदापीही खपवून घेणार नाही. जिल्ह्यात आंदोलनेच होऊ नयेत असे वाटत असेल, तर मुख्यमंत्र्यांना सांगून सांगली जिल्ह्यापुरती सरसकट कर्जमाफी मिळवून द्यावी, असे आव्हान देत, पोलिस प्रमुखांच्या बदलीसाठी विशेष पोलिस महानिरीक्षकांना निवेदन देणार आहे, असेही ते म्हणाले.पाठलाग करून अटकमहेश खराडे म्हणाले की, चक्का जाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी माझ्यासह उमेश देशमुख, विकास मगदूम व इतरांच्या घरावर पाळत ठेवली होती. आंदोलनापूर्वीच अटक होण्याची कुणकुण लागताच मी शंभरफुटी रस्त्यावरील मित्राच्या फ्लॅटमध्ये रात्रभर थांबून होतो. रात्री मी मोबाईलही बंद केला होता. सकाळी देशमुख यांच्याशी संपर्कासाठी मोबाईल सुरू केला. त्याच्या लोकेशनवरून पोलिसांनी माझ्या अटकेसाठी बंदोबस्त पाठविला. पोलिसांना चुकवून मी दुसºया रस्त्याने निघून गेलो, तर पोलिसांनी माझा चित्रपटाला शोभेल असा पाठलाग करून अटक केली.