शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

अतिवृष्टीच्या भरपाईसाठी जनावरांसह आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:41 IST

संजयनगर : ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. ...

संजयनगर : ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. हाता-तोंडाला आलेली पिके गेल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भरीव मदतीसह जनावरांच्या चाऱ्यासाठी अनुदान देण्याच्या मागणीसाठी अन्याय निर्मूलन समितीच्यावतीने मंगळवारी जनावरांसह जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कार्याध्यक्ष धर्मेंद्र कोळी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांची पिके गेली. शेतकऱ्यांना भीषण आर्थिक टंचाईला समोरे जावे लागत आहे. त्यातच जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे जनावरांची उपासमार होत आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने फसवी आश्वासने देऊन सामान्य जनतेचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे कंबरडे मोडले. आता मुक्या जनावरांचेही कंबरडे हे शासन मोडणार काय? अशी भीती जनतेच्या मनात बसली आहे. सरकारने मुक्या जनावरांच्या चारा-पाण्याची व्यवस्था करण्यासाठी अनुदान दिले पाहिजे, या मागणीसाठी अन्याय निर्मूलन समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मुक्या जनावरांसह आंदोजन करण्यात आले. शासनाने जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था युध्दपातळीवर केलीच पाहिजे, अन्यथा मंत्रालयासमोर जनावरे बांधून अन्याय निर्मूलन समितीच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

यावेळी जिल्हाध्यक्ष अरुण चव्हाण, महिला आघाडीच्या आशाताई पवार, तालुकाध्यक्ष हासन मुजावर, असिफ मुलाणी, लक्ष्मी आठवले यांच्यासह शेतकरी व पदाधिकारी आदी उपस्थित होते.

फोटो : १५ दुपटे ३

ओळ :

सांगलीत मंगळवारी अन्याय निर्मूलन समितीच्यावतीने जनावरांसह जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले.

छाया : सुरेंद्र दुपटे