शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अवैध धंद्यांविरोधात आंदोलन

By admin | Updated: January 22, 2016 00:51 IST

सुप्रिया सुळे : तासगावात कार्यकर्त्यांशी संवाद

तासगाव : आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात अवैध धंदे बंद होते. मात्र भाजप सरकारच्या काळात दारू, मटका यांसारखे अवैध धंदे राज्यभर फोफावले आहेत. येत्या १६ फेब्रुवारीपर्यंत राज्य सरकारने ठोस निर्णय घेतला नाही, तर राज्यभरात आंदोलन उभारले जाईल, असा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. गुरुवारी तासगाव येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी खासदार सुळे यांनी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या.तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात ‘कॉफी वुईथ खासदार सुप्रिया सुळे’ असा कार्यक्रम झाला. यावेळी आमदार सुमनताई पाटील, स्मिता पाटील, बाजार समितीचे सभापती अविनाश पाटील, पंचायत समितीच्या सभापती सुनीता पाटील, उपसभापती अशोक घाईल, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंत देसाई, आर. आर. पाटील खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष अमोल पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील जाधव उपस्थित होते.खासदार सुळे म्हणाल्या, आर. आर. आबांनी राज्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. आघाडी सरकारच्या काळात राज्यात कोठेच अवैध धंदे सुरु नव्हते. मात्र या सरकारच्या काळात राज्यात सर्वत्र अवैध धंदे जोरात सुरु आहेत. आमदार सुमनताई पाटील यांनीही, अशा धंद्यांमुळे महिलांना त्रास सहन करावा लागत असल्याची खंत व्यक्त केली होती. त्यामुळे येत्या १६ फेब्रुवारीपर्यंत अवैध धंदे बंद करावेत, अशी मागणी करून, धंदे बंद झाले नाहीत, तर त्याविरोधात राष्ट्रवादीच्यावतीने राज्यभरात आंदोलन छेडले जाईल, असे त्यांनी सांगितले.आबांनी मतदानाद्वारे दारुबंदीचा निर्णय घेतला. त्यांच्या काळातच देशात महाराष्ट्राच्या पोलीस दलात सर्वाधिक महिलांची भरती केली. आताच्या पंतप्रधानांनी स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. सरकारने चुकीचे काम असेल तर सरकारला सळो की पळो करुन सोडू, असा इशाराही सुळे यांनी दिला. (वार्ताहर)स्मिताने राज्याची जबाबदारी घ्यावी कर्तृत्ववान बापाची कर्तृत्ववान मुलगी, अशी स्मिता पाटील यांची ओळख आहे. राज्यात महिला, मुलींच्या अनेक समस्या आहेत. त्यामुळे स्मितानेही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून राज्याची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन खासदार सुळे यांनी यावेळी केले. सप्टेंबरपर्यंत गोडच बोला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना, तिळगूळ घ्या आणि सप्टेंबरपर्यंत निवडणुका नसल्यामुळे सर्वांशी गोडच बोला, असे त्यांनी सांगितले. सप्टेंबरमध्ये नगरपालिकेची निवडणूक असल्याने त्याबाबतचा सूचक इशाराच खासदार सुळे यांनी दिला.