शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

भाजपकडून सिंचनापेक्षा बुलेट ट्रेनवर अधिक खर्च

By admin | Updated: May 11, 2016 00:52 IST

धनंजय मुंडे : जतमध्ये राष्ट्रवादीचा विविध मागण्यांसाठी मोर्चा

जत : जत तालुक्यातील म्हैसाळ जलसिंचन योजनेची कामे पूर्ण करण्यासाठी सातशे कोटींची गरज असताना शासन एक किलोमीटर बुलेट ट्रेन कामासाठी आठशे कोटी रुपये खर्च करत आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे यांनी जत येथील सभेत केली. जत तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्यावतीने विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयासमोरील पोलिस कवायत मैदानावर मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाल्यानंतर धनंजय मुंडे बोलत होते. ते म्हणाले की, दुष्काळाची जाणीव मला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बातमध्ये शेतकरी आत्महत्या व शेतकऱ्यांचे आर्थिक संकट हे विषय घेतले जात नाहीत. पंतप्रधान व भारतीय जनता पार्टी देशातील जनतेला फसवत आहे. सलग चार वर्षे दुष्काळ आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवलत मिळावी म्हणून आम्ही सतत संघर्ष करत आहे. आतापर्यंत पाच अधिवेशने झाली आहेत, परंतु कर्जमाफी झाली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.दुष्काळ हे नैसर्गिक संकट असले तरी, त्यावर मात करून राज्य शासन उपाय योजना करू शकते, परंतु राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे शासनाने झोपेचे सोंग घेतले आहे. आमच्या दबावामुळे शासनाने टंचाई व त्यानंतर दुष्काळ जाहीर केला आहे. अन्यथा शासनाला दुष्काळ दाबायचा होता. त्यांना कामच करायचे नव्हते, असा आरोप त्यांनी केला. यापुढील काळात जत तालुक्याच्या विकासासाठी निर्णायक संघर्ष असणार आहे. तालुक्यातील प्रलंबित मागण्या येथील शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी आ. जयंत पाटील म्हणाले की, शासन रोज एक नवीन घोषणा करत आहे. परंतु याची अंमलबजावणी करत नाही. पाण्याचा अपुरा पुरवठा होत आहे. त्यामुळे प्रति घागर तीन रुपये असे विकत पाणी घेऊन जनतेला प्यावे लागत आहे. मजुरांना काम व दाम देण्याची ताकद सरकारमध्ये राहिली नाही. अस्वच्छ पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आघाडी शासन काळात छावणीतील शेणात भ्रष्टाचार झाला म्हणून शासन आमच्यावर आरोप करत आहे. बुद्धिभेद करून आरोप होत आहेत. जाचक अटींमुळे छावणी सुरू करण्यासाठी एकही संस्था पुढाकार घेत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट आले आहे, असेही त्यांनी सांगितले.पक्षाचे तालुका अध्यक्ष अ‍ॅड. बी. ए. धोडमणी यांनी स्वागत केले. यानंतर जि. प. अध्यक्षा रेशमाक्का होर्तीकर, आ. सुमनताई पाटील, माजी आमदार प्रकाश शेंडगे, राजेंद्रअण्णा देशमुख, अण्णासाहेब गडदे, रमेश पाटील, ऋषिकेश देशमुख, संजयकुमार सावंत, उत्तम चव्हाण, सुकुमार कांबळे, अ‍ॅड. चन्नाप्पा होर्तीकर, शरद लाड यांनी मनोगत व्यक्त केले.जत नगर परिषद उपनगराध्यक्ष श्रीकांत शिंदे, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, विजय सगरे, आर. के. पाटील, अविनाश वाघमारे, सिद्धाप्पा क्षीरसाड, अ‍ॅड्. बाबासाहेब मुळीक, जि. प. सभापती सुनंदा पाटील आदी उपस्थित होते. महादेव पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)सत्ताधाऱ्यांना : शेतकरी संपवायचा आहे!शेतकऱ्यांच्या व्यथा आणि दु:ख समजून घेणारा एकही मंत्री अथवा शेतकरी कुटुंबातील मंत्री या मंत्रिमंडळात नाही. त्यामुळे जनतेवर मोठे संकट आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नरेंद्र फडणवीस यांना संपूर्ण शेतकरी वर्ग संपवायचा आहे. त्यामुळे ते शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत नाहीत, असा आरोप मुंडे यांनी केला.