शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपकडून सिंचनापेक्षा बुलेट ट्रेनवर अधिक खर्च

By admin | Updated: May 11, 2016 00:52 IST

धनंजय मुंडे : जतमध्ये राष्ट्रवादीचा विविध मागण्यांसाठी मोर्चा

जत : जत तालुक्यातील म्हैसाळ जलसिंचन योजनेची कामे पूर्ण करण्यासाठी सातशे कोटींची गरज असताना शासन एक किलोमीटर बुलेट ट्रेन कामासाठी आठशे कोटी रुपये खर्च करत आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे यांनी जत येथील सभेत केली. जत तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्यावतीने विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयासमोरील पोलिस कवायत मैदानावर मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाल्यानंतर धनंजय मुंडे बोलत होते. ते म्हणाले की, दुष्काळाची जाणीव मला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बातमध्ये शेतकरी आत्महत्या व शेतकऱ्यांचे आर्थिक संकट हे विषय घेतले जात नाहीत. पंतप्रधान व भारतीय जनता पार्टी देशातील जनतेला फसवत आहे. सलग चार वर्षे दुष्काळ आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवलत मिळावी म्हणून आम्ही सतत संघर्ष करत आहे. आतापर्यंत पाच अधिवेशने झाली आहेत, परंतु कर्जमाफी झाली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.दुष्काळ हे नैसर्गिक संकट असले तरी, त्यावर मात करून राज्य शासन उपाय योजना करू शकते, परंतु राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे शासनाने झोपेचे सोंग घेतले आहे. आमच्या दबावामुळे शासनाने टंचाई व त्यानंतर दुष्काळ जाहीर केला आहे. अन्यथा शासनाला दुष्काळ दाबायचा होता. त्यांना कामच करायचे नव्हते, असा आरोप त्यांनी केला. यापुढील काळात जत तालुक्याच्या विकासासाठी निर्णायक संघर्ष असणार आहे. तालुक्यातील प्रलंबित मागण्या येथील शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी आ. जयंत पाटील म्हणाले की, शासन रोज एक नवीन घोषणा करत आहे. परंतु याची अंमलबजावणी करत नाही. पाण्याचा अपुरा पुरवठा होत आहे. त्यामुळे प्रति घागर तीन रुपये असे विकत पाणी घेऊन जनतेला प्यावे लागत आहे. मजुरांना काम व दाम देण्याची ताकद सरकारमध्ये राहिली नाही. अस्वच्छ पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आघाडी शासन काळात छावणीतील शेणात भ्रष्टाचार झाला म्हणून शासन आमच्यावर आरोप करत आहे. बुद्धिभेद करून आरोप होत आहेत. जाचक अटींमुळे छावणी सुरू करण्यासाठी एकही संस्था पुढाकार घेत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट आले आहे, असेही त्यांनी सांगितले.पक्षाचे तालुका अध्यक्ष अ‍ॅड. बी. ए. धोडमणी यांनी स्वागत केले. यानंतर जि. प. अध्यक्षा रेशमाक्का होर्तीकर, आ. सुमनताई पाटील, माजी आमदार प्रकाश शेंडगे, राजेंद्रअण्णा देशमुख, अण्णासाहेब गडदे, रमेश पाटील, ऋषिकेश देशमुख, संजयकुमार सावंत, उत्तम चव्हाण, सुकुमार कांबळे, अ‍ॅड. चन्नाप्पा होर्तीकर, शरद लाड यांनी मनोगत व्यक्त केले.जत नगर परिषद उपनगराध्यक्ष श्रीकांत शिंदे, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, विजय सगरे, आर. के. पाटील, अविनाश वाघमारे, सिद्धाप्पा क्षीरसाड, अ‍ॅड्. बाबासाहेब मुळीक, जि. प. सभापती सुनंदा पाटील आदी उपस्थित होते. महादेव पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)सत्ताधाऱ्यांना : शेतकरी संपवायचा आहे!शेतकऱ्यांच्या व्यथा आणि दु:ख समजून घेणारा एकही मंत्री अथवा शेतकरी कुटुंबातील मंत्री या मंत्रिमंडळात नाही. त्यामुळे जनतेवर मोठे संकट आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नरेंद्र फडणवीस यांना संपूर्ण शेतकरी वर्ग संपवायचा आहे. त्यामुळे ते शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत नाहीत, असा आरोप मुंडे यांनी केला.