शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

आणखी ४० बोगस परवाने ‘रडार’वर

By admin | Updated: April 11, 2017 00:22 IST

महापालिकेचा कारभार चर्चेत : कर्मचारी, अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले

सांगली : महापालिकेच्या बोगस बांधकाम परवाना प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याप्रकरणी आणखी ४० हून अधिक बांधकाम परवाने बोगस असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. या प्रकरणाची चौकशी नगररचना विभागाने सुरू केल्याचे समजते. उशिरा जाग आलेल्या नगररचना विभागाच्या एकूणच कारभारावर बोगस बांधकाम परवाना प्रकरणामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महापालिकेचा बनावट शिक्का वापरून तसेच बनावट सही करून बांधकाम परवान्यांद्वारे बँकेकडून कर्जे उचलली जात होती. याप्रकरणी बँकेच्या तक्रारीनुसार चौकशीअंती हा बोगस प्रकार चव्हाट्यावर आला होता. यापैकी नऊ प्रकरणांच्या छाननीनंतर सहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा सुधार समितीचे अध्यक्ष आर्किटेक्ट रवींद्र चव्हाण यांनी यासंदर्भात आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. चव्हाण यांनी केलेल्या तक्रारीनुसार त्यांच्याच नावे बोगस सह्या करुन नगररचना विभागातून बांधकाम परवाना आणि परिपूर्ती प्रमाणपत्र घेतल्याचे निदर्शनास आणून दिले होते. तरीही प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. अखेर चव्हाण यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. आयुक्त खेबूडकर यांनी याची चौकशी करुन संबंधितांवर फौजदारीची कारवाई केली होती. बोगस बांधकाम परवाने देताना यावर काही इंजिनिअर, आर्किटेक्टचे शिक्केही वापरले गेले आहेत. त्यामुळे शहरातील काही इंजिनिअर्स आणि आर्किटेक्ट लोकांचा सहभाग असावा का, की त्यांच्या नावाचे बोगस शिक्के वापरले गेले असावेत, याविषयी शंका आहे. बोगस बांधकाम परवान्याच्या नऊपैकी चार प्रकरणात महापालिकेने पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. नऊपैकी तीन प्रकरणातील बांधकाम परवान्यावर एकाच इंजिनिअरच्या सह्या आहेत. आयुक्त खेबूडकर यांनी याची गंभीर दखल घेतली असून, यासंदर्भात जिल्हा पोलिसप्रमुखांची भेट घेऊन चर्चा केली. बोगस परवान्यामुळे नगररचना विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला असून, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. (प्रतिनिधी)सहा महिन्यांपूर्वी तक्रारीबोगस बांधकाम परवान्यासंदर्भात आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये महापालिकेकडे तक्रारी आल्या होत्या. परंतु सहा महिने होऊनही नगररचना विभागाकडून याबाबत गांभीर्याने लक्ष दिले नाही. बँकांनी महापालिकेकडे परवाने तपासणीसाठी दिले होते. तरीही नगररचना विभागाकडून त्याची साधी दखलही घेतली गेली नाही. या विलंबामागील कारणांचा शोध घेतल्यास, नगररचना विभागातील अनेकजण अडचणीत येऊ शकतात. पण तशी तयारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिसत नाही.