शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळात जिल्ह्यात दीडशेहून अधिक अल्पवयीन मुले बेपत्ता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:26 IST

सांगली : कोरोनाने सर्वसामान्यांचे जीवन पुरते उद्ध्वस्त करून टाकले. मात्र, याच तणावाच्या वातावरणात कुटुंबाची घडीही विस्कटण्यास सुरुवात झाली. कोरोनाच्या ...

सांगली : कोरोनाने सर्वसामान्यांचे जीवन पुरते उद्ध्वस्त करून टाकले. मात्र, याच तणावाच्या वातावरणात कुटुंबाची घडीही विस्कटण्यास सुरुवात झाली. कोरोनाच्या याच कालावधीत अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्याही प्रमाणातील वाढ कायम आहे. काेरोनामुळे सर्व व्यवहार बंद असतानाही बेपत्ता होण्याचे प्रमाण कायम आहे. २०२० मध्ये १७६ प्रकरणे घडली असून, आमिष आणि अजाणत्या वयातील मोह यासाठी घातक ठरत आहे.

अल्पवयीन मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण कायम असले, तरी यातील अनेक मुलींना पोलिसांनी शोधून त्यांना पालकांच्या स्वाधीनही केले आहे. तर काही मुली मात्र आपल्या कुटुंबाकडे परतल्याच नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे.

चौकट

२०२० मध्ये १७६ प्रकरणे

राष्ट्रीय पातळीवरील गुन्हेगारीचा आढावा घेणाऱ्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील १७६ मुली बेपत्ता झाल्या. यातील बहुतांश मुलींना फूस लावून पळवून नेण्यात आल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. याशिवाय पोलिसांच्या बालकल्याणविषयक शाखेकडून अशा प्रकरणे तडीस लावण्यातही आली आहेत.

चौकट

८० टक्के मुलींचा लागला शोध

पोलिसांकडून दर वर्षी ऑपरेशन मुस्कान मोहीम राबविण्यात येते. राज्य पातळीवरील या मोहिमेत घरातून पलायन केलेल्या, बेपत्ता झालेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन केले जाते. पालकांकडून पुन्हा त्रास होईल या भीतीने न जाणाऱ्या मुलांना बालसुधारगृहात ठेवण्यात येते. तर विचलित झालेल्या मुलांचे समुपदेशनही करण्यात येते.

चौकट

गुन्हेगारीचीही वाट

घरातून पलायन केलेल्या मुलांमध्ये बदल व्हावा यासाठी प्रयत्न होत असतात. मात्र, यातील काही मुले मात्र गुन्हेगारीत प्रवेश करतात. कुटुंबाचा हरवलेला आधार आणि मिळालेल्या मोकळीकतेमुळे अनेक मुले गु्न्हेगारीत शिरतात. जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या गुन्हेगारीतील प्रमाण कमी आहे.