शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

सांगलीत शेतकऱ्यांचा ऊस, भाजीपाल्यासह मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापुरात झालेल्या शेतीच्या नुकसानीबद्दल शासनाकडून अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर सरकार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महापुरात झालेल्या शेतीच्या नुकसानीबद्दल शासनाकडून अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर सरकार जागे होणार का, असा सवाल सर्वोदय कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी केला. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सांगलीत मोर्चा काढण्यात आला होता.

पृथ्वीराज पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. येथील स्टेशन चौकातून काँग्रेस भवनपर्यंत जळालेला ऊस, कुजलेला भाजीपाला घेऊन शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी हवेत घोषणा करण्यापेक्षा प्रत्यक्ष मदत द्यावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.

पृथ्वीराज पवार म्हणाले, सरकार निव्वळ नव्या घोषणांचे रतीब घालत आहे. शेतकऱ्यांना प्रतिगुंठा ६५ रुपयांची मदत जाहीर करून थट्टा केली होती. त्यानंतर शेतकऱ्यांचा रोष पाहून २०१९ प्रमाणे मदत जाहीर केली. प्रत्यक्ष एक रुपयासुद्धा शेतकऱ्यांना मिळालेला नाही. आधीच कोरोनामुळे शेतकरी कोलमडून गेला आहे. नागठाणेतील तरुण शेतकरी, अंकलखोपला दोन तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. सरकारच याला जबाबदार आहे. मुंबई, पुणे, हैद्राबाद, दिल्लीसारख्या बाजारपेठांत भाजीपाला गेला नाही. महापुराने तर पिके कुजून गेली आहेत. आंदोलनात महावीर चव्हाण, दादा तामगावे, नातगोंड पाटील, माणिक आवटी, शीतल पाटील, बंडू शेटे, सतीश पवार, रेखा पाटील, अभिमन्यू भोसले, रवींद्र वादवणे, गोपाल पवार, विशाल पवार आदी उपस्थित होते.

चौकट

पतंगराव कदमांची उणीव

पृथ्वीराज पवार म्हणाले, उसाचे एकरी दीड लाख, सोयाबीनचे एक लाखावर, ढबू मिरचीचे ३ लाखांवर, वांगी, टोमॅटोचे एक ते दीड लाख रुपयांचे प्रतिएकरी नुकसान झाले आहे. दिवंगत नेते पतंगराव कदम हे मदत व पुनर्वसन मंत्री होते तेव्हा इकडे घोषणा व्हायची आणि पैसे काही दिवसांत मिळायचे. या सरकारमध्ये असे नेते राहिले नाहीत.