शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
4
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
7
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
8
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
9
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
10
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
11
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
12
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
13
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
14
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
15
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
16
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
17
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
18
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
19
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
20
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल

मोहरम : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:31 IST

उस हुसैन इब्ने हैदर पे लाखों सलाम जो दहकती आग के शोलौं पर सोया वे हुसैन जिसने अपने खून ...

उस हुसैन इब्ने हैदर पे लाखों सलाम

जो दहकती आग के शोलौं पर सोया वे हुसैन

जिसने अपने खून से आलम को धोया वो हुसैन

जिसने सब कुछ खो के फिर भी न कुछ खोया वो हुसैन

इस्लामिक वर्षाची सुरुवात मोहरम या महिन्याने होते. मोहरमला इस्लाममध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण आजपासून १३४१ वर्षांपूर्वी मोहरमच्या १० तारखेला हजरत महंमद पैगंबर (स.स.) यांचे नातू इमाम हुसैन यांनी इस्लाम वाचवण्यासाठी स्वत: व आपल्या ७२ अनुयायांचे बलिदान दिले होते. त्या बलिदानाची आठवण म्हणून हजरत इमाम हुसैन (रह.) यांना मानणारे फक्त मुस्लिमच नव्हे, तर हिंदू लोकसुद्धा पूर्ण भक्तिभावाने मोहरम साजरा करतात. यामुळे या सणाला हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून पाहिले जाते.

इराकपासून १२० किलोमीटर अंतरावर करबला नामक एक ठिकाण आहे. मुस्लिम विद्वानांच्या मते, हे एक ठिकाण्याचे नाव नसून येथील माती साक्ष आहे ती म्हणजे इस्लामिक वर्षातील सर्वांत मोठ्या युद्धाची. जिथे अत्याचारांनी सीमा गाठली, तेथील हवा साक्षी आहे त्या यजीदच्या निर्दयी क्रूर निर्णयांची जिथे सहा महिन्यांच्या अलीअजगर (र.ह.) यांना पिण्यासाठी पाणी दिले नाही.

मुस्लिम विद्वानांच्या मते, महंमद पैगंबरांच्या (स.स.) नंतर शत्रूंनी पैगंबरांच्या संपूर्ण परिवाराला संपवण्याचा इरादा केला होता. हजरत अली (रह.) व हजरत इमाम हसन (रह.) यांच्या शहादत नंतर शत्रूंनी आपला मोर्चा हजरत इमाम हुसैन (रह.) यांच्याकडे वळवला.

पैगंबरांच्या परिवाराला संपवण्याचा कट मक्का मदिन्यामधून कर्बलापर्यंत पोहोचला. यजीद जो स्वत:ला खलिफा समजत होता त्याने हजरत इमाम हुसैन (रह.) यांच्यावर दबाव तंत्राचा वापर करण्यास सुरुवात केली. त्याचं म्हणणं होतं की, जर इमाम हुसैन त्याला खलिफा स्वीकारतील तर इस्लाममध्ये त्याचा पगडा निर्माण होईल व त्यामुळे इस्लाममध्ये त्याला पाहिजे तसे तो बदल करू शकेल; परंतु या यजीदच्या विचाराला हजरत इमाम हुसैन (रह.) यांनी नकार देऊन त्याला खलिफा मानण्यास मनाई केली.

इमाम हुसैन (रह.) यांना कुफा येथे तेथील लोकांच्या विनंतीनुसार व हजारो पत्राद्वारे विनंती करून हजरत इमाम हुसैन (रह.) यांना कुफा येथे बोलवले होते. जेव्हा हजरत इमाम हुसैन (रह.) करबला पोहोचले तेव्हा त्यांच्या परिवाराबरोबर काही लोक होते. त्यावेळी त्यांना करबला या ठिकाणी रोखण्यात आले व त्यांच्यावर दबाव वाढवण्यासाठी यजीदच्या हजारोच्या संखेने असलेल्या लष्कराने तिथे असणाऱ्या पाण्यावर पहारा बसवण्यात आला व त्यांना यजीदला खलिफा माना अन्यथा युद्धाला तयार राहण्याचे आव्हान देण्यात आले. हजरत इमाम हुसैन (रह.) यांना माहीत होते की, यजीदचे लष्कर सर्व हत्यारांसहीत लाखोंच्या संख्येने आहे. त्या तुलनेत त्यांच्याकडे कमी लोक आहेत, पण यजीद नावाच्या आतंकवाद्याचा दबाव झुगारुन त्यांनी आपल्या दिनवर कायम राहणे पसंद केले जो दिन त्यांच्या आजोबा (नाना) हजरत महंमद पैगंबर (स.स.) यांनी प्रस्थापित केला होता.

याचबरोबर यजीदचे अत्याचार वाढत गेले; परंतु हजरत इमाम हुसैन (रह.) यांच्या काफिलाचा आपल्या इराद्यावर कायम राहिला व मोहरमच्या ९ तारखेला हजरत इमाम हुसैन (रह.) यांनी आपल्या समूहातील लोकांना सांगितले की, शत्रूकडे मोठी ताकद आहे. जर आपल्यातील कोणी समूह सोडून जाणार आहे त्यांनी जावे, पण समूह हजरत इमाम हुसैन (रह.) यांच्याबरोबर ठाम राहिले.

एक एक करत हजरत इमाम हुसैन (रह.) यांच्या कुटुंबातील लोक शहीद होत गेले. हजरत इमाम हुसैन (रह.) युद्धासाठी गेले. त्यावेळी मोहरमची दहा तारीख व शुक्रवार होता. इमाम हुसैन (रह.) आपल्या युद्धामध्ये जुमानत नाही हे पाहून यजीद सैनिकांनी ते ज्यावेळी नमाज पढत असताना त्यांना शहीद केले. त्यांच्या स्मृतीत आजही लोक ताजिया, ताबूत, पीर बसवतात. ही हजरत इमाम हुसैन यांची निशाणी मानली जाते.