शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

मुंबई गुजरातशी जोडण्याचा मोदींचा घाट

By admin | Updated: October 9, 2014 00:18 IST

जयंत पाटील : भाजपवर टीकास्त्र-- आमदारकीसाठी पक्षातून बाहेर पडले

सांगली : मुंबईवर गुजरातचा पहिल्यापासूनच डोळा होता. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर विकासात्मक कामाऐवजी ते मुंबई गुजरातला जोडण्याच्या प्रयत्नात आहेत. याचाच एक भाग म्हणून त्यांनी मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू केली आहे. आता तर भाजपला स्वबळावर महाराष्ट्राची सत्ता पाहिजे, ती केवळ महाराष्ट्राचे तुकडे करण्यासाठीच, अशी टीका माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली. काँग्रेसमध्ये ताळमेळ नसल्याने महाराष्ट्रात राष्ट्रवादीलाच स्पष्ट बहुमत मिळणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.ते म्हणाले की, मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. या राजधानीवर नरेंद्र मोदींचा डोळा असल्यामुळेच त्यांनी देशाचा कारभार बाजूला ठेवून महाराष्ट्रात प्रचारासाठी तळ ठोकला आहे. ते देशाचे पंतप्रधान आहेत की गुजरातचे, हेच कळत नाही. महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा डाव भाजपच्या नेत्यांचा आहे. त्यांचा हा हेतू महाराष्ट्रातील जनतेच्यादृष्टीने धोक्याचा असल्यामुळे मतदार त्यांना त्यांची जागा दाखवतील. महाराष्ट्रात अन्य पक्षांपेक्षा राष्ट्रवादीची शक्ती जास्त असल्यामुळे नरेंद्र मोदी प्रत्येक सभेत शरद पवार यांच्यावर आरोप करीत आहेत. त्यांच्या टीकेने आम्हाला काही फरक पडत नाही. राज्यातील ग्रामीण भागामधील शेतकऱ्यांचे प्रश्न राष्ट्रवादीनेच सोडविले असल्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळेल. जिल्ह्यातील पाच ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी होणार आहेत, असा दावाही पाटील यांनी केला. (प्रतिनिधी)आमदारकीसाठी पक्षातून बाहेर पडलेराष्ट्रवादीतून जे बाहेर पडले, ते केवळ स्वार्थासाठी आणि आमदारकीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाहेर पडले आहेत. राष्ट्रवादीतून बाहेर पडल्याचा त्यांना पश्चाताप होईल. पक्षातून नेते बाहेर पडले असले तरी, कार्यकर्ते पक्षाशी एकनिष्ठ आहेत, अशी टीका त्यांनी दिनकर पाटील यांच्यावर केली.