शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

मोदींचे इमान शेतकऱ्यांशी नव्हे, उद्योगपतींशी

By admin | Updated: May 11, 2015 00:40 IST

उल्का महाजन : भूमी अधिग्रहण कायदाविषयक चर्चासत्रातील मत

सांगली : ‘अच्छे दिन’ येण्याची स्वप्ने दाखवत सर्वसामान्यांची मते मिळवून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सत्ताधारी झाल्यावर मात्र आपले खरे रूप दाखविण्यास प्रारंभ केला आहे. भूमिअधिग्रहण कायद्यासाठी आग्रही असणाऱ्या मोदींचे इमान शेतकऱ्यांशी नव्हे, उद्योगपतींशी असल्याचे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी रविवारी व्यक्त केले. सांगली जिल्हा सुधार समितीच्यावतीने ‘भूमी अधिग्रहण कायदा’ या विषयावर पत्रकार संघ सभागृह येथे आयोजित चर्चासत्रात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर अ‍ॅड. के. डी. शिंदे, शंकर पुजारी, रमेश सहस्त्रबुद्धे, अ‍ॅड. अजित अभ्यंकर, अ‍ॅड. अमित शिंदे आदी उपस्थित होते. उल्का महाजन म्हणाल्या, आतापर्यंत सेझच्या नावाखाली सरकारने संपादित केलेल्या ५७ टक्के जमिनी या वापराविना पडून आहेत. नवीन कायदा करण्यापूर्वी प्रथम संबंधित जमिनींचा वापर आतापर्यंत का गेला नाही, याचे उत्तर द्यावे. संरक्षण, ग्रामीण पायाभूत सुविधा, औद्योगिक वसाहत आदीसाठी शेतकऱ्यांची संमती गरजेची नाही, असे धोरण सरकारने तयार केले आहे. देश व विदेशातील खासगी उद्योगपतींना जमिनीचे भांडवलात रूपांतर करून जागतिक साम्राज्यवाद निर्माण करावयाचे असल्याचेही महाजन यांनी सांगितले. यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)