शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

समविचारी संघटनांनी एकत्र यावे: मेधा पाटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 23:18 IST

आळसंद : देशात ३१ टक्के मतांच्याआधारे आपल्यावर अगडबंब राजकीय सत्ता थोपवली आहे. या सत्तेला आव्हान द्यायचे असेल, तर समविचारी संघटनांनी हातात हात घालून एकत्र येण्याची गरज आहे, असे मत नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केले.बलवडी (भा., ता. खानापूर) येथील क्रांती स्मृती वनात भाई संपतराव पवार यांच्या ‘आत्मचरित्र ...

आळसंद : देशात ३१ टक्के मतांच्याआधारे आपल्यावर अगडबंब राजकीय सत्ता थोपवली आहे. या सत्तेला आव्हान द्यायचे असेल, तर समविचारी संघटनांनी हातात हात घालून एकत्र येण्याची गरज आहे, असे मत नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केले.बलवडी (भा., ता. खानापूर) येथील क्रांती स्मृती वनात भाई संपतराव पवार यांच्या ‘आत्मचरित्र मी लोकांचा सांगाती’ या आत्मचरित्र पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पेणचे आमदार भाई धैर्यशील पाटील होते. यावेळी डॉ. राजन गवस, ललित बाबर, भाई संपतराव पवार, सौ. विजया पवार, आनंद अवधानी उपस्थित होते.पाटकर म्हणाल्या, चळवळीला पूरक असे काम संपतराव पवार व त्यांच्या विचारकांनी केले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबरोबरच राजकीय, सामाजिक, आर्थिक यावर भाष्य करणारे आत्मचरित्र आहे. याचा अनुभव लोेकलढ्याशी नाळ जोडणारा आहे. धरणामुळे विकास संपत असेल, विकासाचा तंत्र-मंत्र किती विकृत झाला आहे. विकृतीचा आधार घेत राजकारण करत आपल्या मतांच्या बॅँका भरून घेतल्या जात आहेत. आज वाटचाल अराजकतेकडे चालू आहे. शेतकऱ्यांपेक्षा शेतमजुरांच्या सर्वात जास्त आत्महत्या झालेल्या आहेत. जो कष्टकरी व श्रमिक आहे, त्याला स्थानही नाही व दामही नाही. त्यामुळे असे घडत आहे. हा देश विचारशील, संवेदनशील असूनही, आत्महत्यांनी असंवेदनशील बनला आहे. महाराष्टÑातील एकूण धरणांपैकी मोठी धरणे आठ टक्क्यांपेक्षाही जास्त भरली नाहीत, हे वास्तव आहे.राजन गवस म्हणाले, या पुस्तकात समाजाचे मानसशास्त्र मांडले आहे. मराठी माणसाच्या अंतरंगातील गुंते आणि पेच, डाव्या चळवळीच्या अपयशाचे तर्क शास्त्र, आधुनिकता व द्वंद्वनिष्ठता, जगण्याची तत्त्वनिष्ठता सांगितली आहे.आमदार धैर्यशील पाटील म्हणाले, चळवळी या राज्याला दिशा देण्याचे काम करतात. कायदे हे संसदेत होत नाहीत, ते रस्त्यावरील चळवळीतूनच होतात. सेझ धोरण किती फसवे आहे, हे रायगडमध्ये शेकापने केलेल्या आंदोलनामुळे दिसून येते. सेझ धोरण स्वीकारले असते, तर देशाचे वाटोळे झाले असते.अ‍ॅड. संदेश पवार यांनी स्वागत केले. यावेळी राजारामबापू बॅँकेचे अध्यक्ष शामराव पाटील, महिला राष्टÑवादीच्या अध्यक्षा छाया पाटील, ‘क्रांती’चे अध्यक्ष अरूण लाड, अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक, डॉ. बाबूराव गुरव, डॉ. इंद्रजित मोहिते, सरपंच प्रवीण पवार, डी. के. गायकवाड, व्ही. वाय. पाटील, रवींद्र बर्डे, डॉ. अमोल पवार, मानसिंग बॅँकेचे संस्थापक जे. के. (बापू) जाधव, पापा पाटील उपस्थित होते. अनिल पाटील यांनी आभार मानले, तर प्रा. प्रशांत पवार यांनी सूत्रसंचालन केले.पारंपरिक स्वागताने उपस्थित भारावले..क्रांती स्मृती वनात आयोजित करण्यात आलेल्या ‘मी लोकांचा सांगाती’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी उपस्थितांना शेंगा व गूळ देऊन त्यांचे स्वागत केले. त्यामुळे उपस्थितांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.