शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

समविचारी संघटनांनी एकत्र यावे: मेधा पाटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 23:18 IST

आळसंद : देशात ३१ टक्के मतांच्याआधारे आपल्यावर अगडबंब राजकीय सत्ता थोपवली आहे. या सत्तेला आव्हान द्यायचे असेल, तर समविचारी संघटनांनी हातात हात घालून एकत्र येण्याची गरज आहे, असे मत नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केले.बलवडी (भा., ता. खानापूर) येथील क्रांती स्मृती वनात भाई संपतराव पवार यांच्या ‘आत्मचरित्र ...

आळसंद : देशात ३१ टक्के मतांच्याआधारे आपल्यावर अगडबंब राजकीय सत्ता थोपवली आहे. या सत्तेला आव्हान द्यायचे असेल, तर समविचारी संघटनांनी हातात हात घालून एकत्र येण्याची गरज आहे, असे मत नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केले.बलवडी (भा., ता. खानापूर) येथील क्रांती स्मृती वनात भाई संपतराव पवार यांच्या ‘आत्मचरित्र मी लोकांचा सांगाती’ या आत्मचरित्र पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पेणचे आमदार भाई धैर्यशील पाटील होते. यावेळी डॉ. राजन गवस, ललित बाबर, भाई संपतराव पवार, सौ. विजया पवार, आनंद अवधानी उपस्थित होते.पाटकर म्हणाल्या, चळवळीला पूरक असे काम संपतराव पवार व त्यांच्या विचारकांनी केले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबरोबरच राजकीय, सामाजिक, आर्थिक यावर भाष्य करणारे आत्मचरित्र आहे. याचा अनुभव लोेकलढ्याशी नाळ जोडणारा आहे. धरणामुळे विकास संपत असेल, विकासाचा तंत्र-मंत्र किती विकृत झाला आहे. विकृतीचा आधार घेत राजकारण करत आपल्या मतांच्या बॅँका भरून घेतल्या जात आहेत. आज वाटचाल अराजकतेकडे चालू आहे. शेतकऱ्यांपेक्षा शेतमजुरांच्या सर्वात जास्त आत्महत्या झालेल्या आहेत. जो कष्टकरी व श्रमिक आहे, त्याला स्थानही नाही व दामही नाही. त्यामुळे असे घडत आहे. हा देश विचारशील, संवेदनशील असूनही, आत्महत्यांनी असंवेदनशील बनला आहे. महाराष्टÑातील एकूण धरणांपैकी मोठी धरणे आठ टक्क्यांपेक्षाही जास्त भरली नाहीत, हे वास्तव आहे.राजन गवस म्हणाले, या पुस्तकात समाजाचे मानसशास्त्र मांडले आहे. मराठी माणसाच्या अंतरंगातील गुंते आणि पेच, डाव्या चळवळीच्या अपयशाचे तर्क शास्त्र, आधुनिकता व द्वंद्वनिष्ठता, जगण्याची तत्त्वनिष्ठता सांगितली आहे.आमदार धैर्यशील पाटील म्हणाले, चळवळी या राज्याला दिशा देण्याचे काम करतात. कायदे हे संसदेत होत नाहीत, ते रस्त्यावरील चळवळीतूनच होतात. सेझ धोरण किती फसवे आहे, हे रायगडमध्ये शेकापने केलेल्या आंदोलनामुळे दिसून येते. सेझ धोरण स्वीकारले असते, तर देशाचे वाटोळे झाले असते.अ‍ॅड. संदेश पवार यांनी स्वागत केले. यावेळी राजारामबापू बॅँकेचे अध्यक्ष शामराव पाटील, महिला राष्टÑवादीच्या अध्यक्षा छाया पाटील, ‘क्रांती’चे अध्यक्ष अरूण लाड, अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक, डॉ. बाबूराव गुरव, डॉ. इंद्रजित मोहिते, सरपंच प्रवीण पवार, डी. के. गायकवाड, व्ही. वाय. पाटील, रवींद्र बर्डे, डॉ. अमोल पवार, मानसिंग बॅँकेचे संस्थापक जे. के. (बापू) जाधव, पापा पाटील उपस्थित होते. अनिल पाटील यांनी आभार मानले, तर प्रा. प्रशांत पवार यांनी सूत्रसंचालन केले.पारंपरिक स्वागताने उपस्थित भारावले..क्रांती स्मृती वनात आयोजित करण्यात आलेल्या ‘मी लोकांचा सांगाती’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी उपस्थितांना शेंगा व गूळ देऊन त्यांचे स्वागत केले. त्यामुळे उपस्थितांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.