शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

समविचारी संघटनांनी एकत्र यावे: मेधा पाटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 23:18 IST

आळसंद : देशात ३१ टक्के मतांच्याआधारे आपल्यावर अगडबंब राजकीय सत्ता थोपवली आहे. या सत्तेला आव्हान द्यायचे असेल, तर समविचारी संघटनांनी हातात हात घालून एकत्र येण्याची गरज आहे, असे मत नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केले.बलवडी (भा., ता. खानापूर) येथील क्रांती स्मृती वनात भाई संपतराव पवार यांच्या ‘आत्मचरित्र ...

आळसंद : देशात ३१ टक्के मतांच्याआधारे आपल्यावर अगडबंब राजकीय सत्ता थोपवली आहे. या सत्तेला आव्हान द्यायचे असेल, तर समविचारी संघटनांनी हातात हात घालून एकत्र येण्याची गरज आहे, असे मत नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केले.बलवडी (भा., ता. खानापूर) येथील क्रांती स्मृती वनात भाई संपतराव पवार यांच्या ‘आत्मचरित्र मी लोकांचा सांगाती’ या आत्मचरित्र पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पेणचे आमदार भाई धैर्यशील पाटील होते. यावेळी डॉ. राजन गवस, ललित बाबर, भाई संपतराव पवार, सौ. विजया पवार, आनंद अवधानी उपस्थित होते.पाटकर म्हणाल्या, चळवळीला पूरक असे काम संपतराव पवार व त्यांच्या विचारकांनी केले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबरोबरच राजकीय, सामाजिक, आर्थिक यावर भाष्य करणारे आत्मचरित्र आहे. याचा अनुभव लोेकलढ्याशी नाळ जोडणारा आहे. धरणामुळे विकास संपत असेल, विकासाचा तंत्र-मंत्र किती विकृत झाला आहे. विकृतीचा आधार घेत राजकारण करत आपल्या मतांच्या बॅँका भरून घेतल्या जात आहेत. आज वाटचाल अराजकतेकडे चालू आहे. शेतकऱ्यांपेक्षा शेतमजुरांच्या सर्वात जास्त आत्महत्या झालेल्या आहेत. जो कष्टकरी व श्रमिक आहे, त्याला स्थानही नाही व दामही नाही. त्यामुळे असे घडत आहे. हा देश विचारशील, संवेदनशील असूनही, आत्महत्यांनी असंवेदनशील बनला आहे. महाराष्टÑातील एकूण धरणांपैकी मोठी धरणे आठ टक्क्यांपेक्षाही जास्त भरली नाहीत, हे वास्तव आहे.राजन गवस म्हणाले, या पुस्तकात समाजाचे मानसशास्त्र मांडले आहे. मराठी माणसाच्या अंतरंगातील गुंते आणि पेच, डाव्या चळवळीच्या अपयशाचे तर्क शास्त्र, आधुनिकता व द्वंद्वनिष्ठता, जगण्याची तत्त्वनिष्ठता सांगितली आहे.आमदार धैर्यशील पाटील म्हणाले, चळवळी या राज्याला दिशा देण्याचे काम करतात. कायदे हे संसदेत होत नाहीत, ते रस्त्यावरील चळवळीतूनच होतात. सेझ धोरण किती फसवे आहे, हे रायगडमध्ये शेकापने केलेल्या आंदोलनामुळे दिसून येते. सेझ धोरण स्वीकारले असते, तर देशाचे वाटोळे झाले असते.अ‍ॅड. संदेश पवार यांनी स्वागत केले. यावेळी राजारामबापू बॅँकेचे अध्यक्ष शामराव पाटील, महिला राष्टÑवादीच्या अध्यक्षा छाया पाटील, ‘क्रांती’चे अध्यक्ष अरूण लाड, अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक, डॉ. बाबूराव गुरव, डॉ. इंद्रजित मोहिते, सरपंच प्रवीण पवार, डी. के. गायकवाड, व्ही. वाय. पाटील, रवींद्र बर्डे, डॉ. अमोल पवार, मानसिंग बॅँकेचे संस्थापक जे. के. (बापू) जाधव, पापा पाटील उपस्थित होते. अनिल पाटील यांनी आभार मानले, तर प्रा. प्रशांत पवार यांनी सूत्रसंचालन केले.पारंपरिक स्वागताने उपस्थित भारावले..क्रांती स्मृती वनात आयोजित करण्यात आलेल्या ‘मी लोकांचा सांगाती’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी उपस्थितांना शेंगा व गूळ देऊन त्यांचे स्वागत केले. त्यामुळे उपस्थितांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.