शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

मोबाईलने ‘मेमरी’ घालवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:32 IST

सांगली : मोबाईलवरील परावलंबित्व इतके वाढले आहे की, आता बाहेरच्या लोकांचेच काय घरातील मोबाईल क्रमांकही आठवत नाहीत, अशी स्थिती ...

सांगली : मोबाईलवरील परावलंबित्व इतके वाढले आहे की, आता बाहेरच्या लोकांचेच काय घरातील मोबाईल क्रमांकही आठवत नाहीत, अशी स्थिती झाली आहे. बहुतांश घरांमध्ये ही समस्या निर्माण झाली आहे.

पूर्वी तोंडी आकडेमोड करणे, लँडलाईन व मोबाईल क्रमांक लक्षात ठेवून ते डायलपॅडवर डायल करून कॉल करणे अशा गोष्टी अंगवळणी पडल्या होत्या. साध्या फोनची जागा स्मार्टफोनने घेतल्यानंतर कॉल करणे सोपे झाले. त्यामुळे मोबाईल क्रमांक लक्षात ठेवण्याची गरज कमी झाली. मोबाईलवरील अवलंबित्व अधिक वाढत गेले. त्यामुळे आता फार कमी लोकांनाच कुटुंबातील मोबाईल क्रमांक तोंडपाठ आहेत, अन्यथा क्रमांक लक्षात ठेवण्याची सर्व जबाबदारी लोकांनी मोबाईलवर सोपविली आहे.

चौकट

असे का होते?

आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन करणाऱ्या कॅस्परस्काय लॅबने या प्रकारास डिजिटल स्मृतीभंश असे म्हटले आहे.

मेंदूचा वापर कमी करून मोबाईल मेमरीचा वापर अधिक केल्याने नंबर व अन्य माहिती आपल्यास आठवत नाही

पूर्वी क्रमांक, आकडेमोड मेंदूच्या साहाय्याने करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे स्मृती चांगली होती.

चौकट

हे टाळण्यासाठी काय करावे?

किमान घरच्या लोकांचे मोबाईल क्रमांक लक्षात ठेवावेत.

घरच्या लोकांना पॅडवर क्रमांक डायल करून कॉल करावा

एटीएम पीन, खाते क्रमांकही लक्षात ठेवावेत

कोट

मोबाईल क्रमांक लक्षात नसणे ही समस्या नाही. पूर्वी कॅल्क्युलेटर्स नव्हते, त्यामुळे तोंडी आकडेमोड करावी लागत होती. आता त्याच्या वापरास परवानगी आहे. मोबाईलवर अवलंबित्व वाढल्याने आता क्रमांक लक्षात ठेवण्याची गरजही घटली आहे. तरीही ऐनवेळी घरच्यांशी संपर्क करण्यासाठी मोजके क्रमांक लक्षात ठेवावेत.

- डॉ. चारुदत्त कुलकर्णी, मानसोपचारतज्ज्ञ, सांगली

कोट

पूर्वी सर्व क्रमांक आठवत होते. आता मोबाईलचा वापर होत असला तरी अद्याप घरच्या लोकांचे सर्व क्रमांक पाठ आहेत.

- गणपती जाधव, आजोबा

कोट

मम्मी, पप्पांचे मोबाईल नंबर माझ्या लक्षात आहेत. मोबाईलवर नंबर कसे शोधायचे माहीत नाहीत, पण मी नंबर लक्षात असल्याने कॉल करू शकतो. - ऋषी जाधव, बालक

कोट

सध्या मोबाईलमध्ये लगेच नंबर सापडत असल्याने ते लक्षात ठेवत नाही. मुलांच्या मात्र नंबर लक्षात आहेत. - ज्ञानेश्वर जाधव, पालक