शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलने ‘मेमरी’ घालवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:32 IST

सांगली : मोबाईलवरील परावलंबित्व इतके वाढले आहे की, आता बाहेरच्या लोकांचेच काय घरातील मोबाईल क्रमांकही आठवत नाहीत, अशी स्थिती ...

सांगली : मोबाईलवरील परावलंबित्व इतके वाढले आहे की, आता बाहेरच्या लोकांचेच काय घरातील मोबाईल क्रमांकही आठवत नाहीत, अशी स्थिती झाली आहे. बहुतांश घरांमध्ये ही समस्या निर्माण झाली आहे.

पूर्वी तोंडी आकडेमोड करणे, लँडलाईन व मोबाईल क्रमांक लक्षात ठेवून ते डायलपॅडवर डायल करून कॉल करणे अशा गोष्टी अंगवळणी पडल्या होत्या. साध्या फोनची जागा स्मार्टफोनने घेतल्यानंतर कॉल करणे सोपे झाले. त्यामुळे मोबाईल क्रमांक लक्षात ठेवण्याची गरज कमी झाली. मोबाईलवरील अवलंबित्व अधिक वाढत गेले. त्यामुळे आता फार कमी लोकांनाच कुटुंबातील मोबाईल क्रमांक तोंडपाठ आहेत, अन्यथा क्रमांक लक्षात ठेवण्याची सर्व जबाबदारी लोकांनी मोबाईलवर सोपविली आहे.

चौकट

असे का होते?

आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन करणाऱ्या कॅस्परस्काय लॅबने या प्रकारास डिजिटल स्मृतीभंश असे म्हटले आहे.

मेंदूचा वापर कमी करून मोबाईल मेमरीचा वापर अधिक केल्याने नंबर व अन्य माहिती आपल्यास आठवत नाही

पूर्वी क्रमांक, आकडेमोड मेंदूच्या साहाय्याने करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे स्मृती चांगली होती.

चौकट

हे टाळण्यासाठी काय करावे?

किमान घरच्या लोकांचे मोबाईल क्रमांक लक्षात ठेवावेत.

घरच्या लोकांना पॅडवर क्रमांक डायल करून कॉल करावा

एटीएम पीन, खाते क्रमांकही लक्षात ठेवावेत

कोट

मोबाईल क्रमांक लक्षात नसणे ही समस्या नाही. पूर्वी कॅल्क्युलेटर्स नव्हते, त्यामुळे तोंडी आकडेमोड करावी लागत होती. आता त्याच्या वापरास परवानगी आहे. मोबाईलवर अवलंबित्व वाढल्याने आता क्रमांक लक्षात ठेवण्याची गरजही घटली आहे. तरीही ऐनवेळी घरच्यांशी संपर्क करण्यासाठी मोजके क्रमांक लक्षात ठेवावेत.

- डॉ. चारुदत्त कुलकर्णी, मानसोपचारतज्ज्ञ, सांगली

कोट

पूर्वी सर्व क्रमांक आठवत होते. आता मोबाईलचा वापर होत असला तरी अद्याप घरच्या लोकांचे सर्व क्रमांक पाठ आहेत.

- गणपती जाधव, आजोबा

कोट

मम्मी, पप्पांचे मोबाईल नंबर माझ्या लक्षात आहेत. मोबाईलवर नंबर कसे शोधायचे माहीत नाहीत, पण मी नंबर लक्षात असल्याने कॉल करू शकतो. - ऋषी जाधव, बालक

कोट

सध्या मोबाईलमध्ये लगेच नंबर सापडत असल्याने ते लक्षात ठेवत नाही. मुलांच्या मात्र नंबर लक्षात आहेत. - ज्ञानेश्वर जाधव, पालक