शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

आमदारांनी दुष्काळप्रश्नी नेतृत्व करावे

By admin | Updated: October 24, 2015 00:22 IST

मानसिंगराव नाईक : विश्वास कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ

शिराळा : शिराळा तालुक्यात यावर्षी मोठा दुष्काळ आहे. मात्र शासनाने दुष्काळ जाहीर केलेला नाही. आता शेतकरी वर्गासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन दुष्काळाचे सर्व निकष येथे लावावेत. यासाठी लढा उभा करण्याची वेळ आली आहे. विद्यमान आमदारांनी या लढ्याचे नेतृत्व करावे. शिवाजीराव देशमुख यांच्यासह मी स्वत: या लढ्यात उतरेन, असे प्रतिपादन माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक साखर कारखान्याच्या गळीत हंगाम प्रारंभावेळी ते बोलत होते. उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्याहस्ते काटापूजन व गव्हाणीत ऊस मोळी टाकून गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला.अध्यक्ष नाईक म्हणाले, तालुक्याच्या इतिहासात एवढा मोठा दुष्काळ प्रथमच पडला आहे. याअगोदर या तालुक्याने कधीही दुष्काळासाठी मदत मागितली नाही. त्यामुळे आपला पहिला हक्क आहे. चुकीची आणेवारी व शासनाचे धोरण यामुळे दुष्काळाचे निकष या तालुक्यास मिळाले नाहीत. चांदोली धरणातही पाणीसाठा पुरेसा नाही. तरीही वाकुर्डे योजना कार्यान्वित करुन तलाव, धरणे भरून घ्यावीत.विश्वास साखर कारखान्याचे खासगीकरण करण्याचा कोणताही पापदायक विचार आपल्या मनात आलेला नव्हता आणि येणारही नाही. त्यामुळे या कारखान्याच्या विकासाला बाधा येईल असे कृत्य कोणीही करु नये, असेही नाईक यांनी स्पष्ट केले.याप्रसंगी सर्जेरावदादा बँकेचे अध्यक्ष हंबीरराव नाईक, उदयसिंगराव नाईक, शिवाजीराव घोडे—पाटील, पं. स. उपसभापती सम्राटसिंह नाईक, रणजितसिंह नाईक, युवराज गायकवाड, दिनकरराव पाटील, बाबासाहेब पवार, कार्यकारी संचालक राम पाटील, भीमराव गायकवाड, विकास कदम, शंकरराव नांगरे, प्रमोद नाईक, अशोकराव पाटील उपस्थित होते.विजयराव नलवडे यांनी प्रास्ताविक केले. अशोकराव कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले. हंबीरराव पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)दुष्काळी मदत : पहिला हक्क आमचायावेळी मानसिंगराव नाईक म्हणाले की, आजवर शिराळा तालुक्यातील जनतेने कोणत्याही शासकीय मदतीची अपेक्षा केलेली नव्हती, त्याची गरजही कधी भासली नाही. पण यंदा स्थिती गंभीर आहे. शेतकऱ्यांना खरोखर मदतीची गरज आहे. आजवर आम्ही कधीही मदत घेतली नाही, त्यामुळे दुष्काळासाठीच्या मदतीवर पहिला हक्क आमचा आहे.‘आंदोलकांनी’ स्वत: किती दर दिला?विश्वास कारखान्याने गेल्या १0 ते १२ वर्षात सतत चांगला दर देण्याचा प्रयत्न केला आहे. सहवीज निर्मिती, डिस्टिलरी, कार्बनडाय आॅक्साईड फिलिंग या प्रकल्पांमुळे या कारखान्याचा विकास दर चढता आहे. नामांकित कारखान्यांपेक्षाही जादा ऊस दर दिला आहे. येथील विरोधक शेतकरी संघटनेचा झेंडा घेऊन ऊस दरासाठी आंदोलन करीत होते. त्यांनी स्वत:च्या कारखान्याकडून किती ऊस दर दिला आहे? कामगार, वाहतूक कंत्राटदार, तोडणी कामगार यांचेही पैसे दिलेले नाहीत, अशी टीका नाईक यांनी केली.