शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
2
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
3
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
4
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
5
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
6
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
7
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
8
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
9
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
10
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
11
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
12
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
13
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
14
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
15
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
16
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
17
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
18
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
19
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
20
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 

आमदारांनी दुष्काळप्रश्नी नेतृत्व करावे

By admin | Updated: October 24, 2015 00:22 IST

मानसिंगराव नाईक : विश्वास कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ

शिराळा : शिराळा तालुक्यात यावर्षी मोठा दुष्काळ आहे. मात्र शासनाने दुष्काळ जाहीर केलेला नाही. आता शेतकरी वर्गासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन दुष्काळाचे सर्व निकष येथे लावावेत. यासाठी लढा उभा करण्याची वेळ आली आहे. विद्यमान आमदारांनी या लढ्याचे नेतृत्व करावे. शिवाजीराव देशमुख यांच्यासह मी स्वत: या लढ्यात उतरेन, असे प्रतिपादन माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक साखर कारखान्याच्या गळीत हंगाम प्रारंभावेळी ते बोलत होते. उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्याहस्ते काटापूजन व गव्हाणीत ऊस मोळी टाकून गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला.अध्यक्ष नाईक म्हणाले, तालुक्याच्या इतिहासात एवढा मोठा दुष्काळ प्रथमच पडला आहे. याअगोदर या तालुक्याने कधीही दुष्काळासाठी मदत मागितली नाही. त्यामुळे आपला पहिला हक्क आहे. चुकीची आणेवारी व शासनाचे धोरण यामुळे दुष्काळाचे निकष या तालुक्यास मिळाले नाहीत. चांदोली धरणातही पाणीसाठा पुरेसा नाही. तरीही वाकुर्डे योजना कार्यान्वित करुन तलाव, धरणे भरून घ्यावीत.विश्वास साखर कारखान्याचे खासगीकरण करण्याचा कोणताही पापदायक विचार आपल्या मनात आलेला नव्हता आणि येणारही नाही. त्यामुळे या कारखान्याच्या विकासाला बाधा येईल असे कृत्य कोणीही करु नये, असेही नाईक यांनी स्पष्ट केले.याप्रसंगी सर्जेरावदादा बँकेचे अध्यक्ष हंबीरराव नाईक, उदयसिंगराव नाईक, शिवाजीराव घोडे—पाटील, पं. स. उपसभापती सम्राटसिंह नाईक, रणजितसिंह नाईक, युवराज गायकवाड, दिनकरराव पाटील, बाबासाहेब पवार, कार्यकारी संचालक राम पाटील, भीमराव गायकवाड, विकास कदम, शंकरराव नांगरे, प्रमोद नाईक, अशोकराव पाटील उपस्थित होते.विजयराव नलवडे यांनी प्रास्ताविक केले. अशोकराव कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले. हंबीरराव पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)दुष्काळी मदत : पहिला हक्क आमचायावेळी मानसिंगराव नाईक म्हणाले की, आजवर शिराळा तालुक्यातील जनतेने कोणत्याही शासकीय मदतीची अपेक्षा केलेली नव्हती, त्याची गरजही कधी भासली नाही. पण यंदा स्थिती गंभीर आहे. शेतकऱ्यांना खरोखर मदतीची गरज आहे. आजवर आम्ही कधीही मदत घेतली नाही, त्यामुळे दुष्काळासाठीच्या मदतीवर पहिला हक्क आमचा आहे.‘आंदोलकांनी’ स्वत: किती दर दिला?विश्वास कारखान्याने गेल्या १0 ते १२ वर्षात सतत चांगला दर देण्याचा प्रयत्न केला आहे. सहवीज निर्मिती, डिस्टिलरी, कार्बनडाय आॅक्साईड फिलिंग या प्रकल्पांमुळे या कारखान्याचा विकास दर चढता आहे. नामांकित कारखान्यांपेक्षाही जादा ऊस दर दिला आहे. येथील विरोधक शेतकरी संघटनेचा झेंडा घेऊन ऊस दरासाठी आंदोलन करीत होते. त्यांनी स्वत:च्या कारखान्याकडून किती ऊस दर दिला आहे? कामगार, वाहतूक कंत्राटदार, तोडणी कामगार यांचेही पैसे दिलेले नाहीत, अशी टीका नाईक यांनी केली.