शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

आमदार, खासदार आमचे; तरीही हाल जनतेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:27 IST

दत्ता पाटील तासगाव : गेल्या काही वर्षांत तासगावच्या राजकारणाचा ट्रेंड बदलला. त्यानुसार तासगावातील जनतेने ‘आमदारही आमचा आणि खासदारही आमचा’ ...

दत्ता पाटील

तासगाव : गेल्या काही वर्षांत तासगावच्या राजकारणाचा ट्रेंड बदलला. त्यानुसार तासगावातील जनतेने ‘आमदारही आमचा आणि खासदारही आमचा’ अशी घोषणा देत आमदार आणि खासदारांच्या झोळीत मतांचे झुकते माप टाकले. मात्र, कोरोनोच्या जीवघेण्या संकटात नेत्यांनी केलेल्या उपाययोजना तोकड्या असल्याचे चव्हाट्यावर आले आहे.

दोन्ही नेत्यांनी सूतगिरणी, साखर कारखान्यांसह संस्थांच्या माध्यमातून कोरोनो रुग्णांसाठी रुग्णालय उभारुन ठोस उपाययोजनांसाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

तासगाव तालुक्यात अनेक नेत्यांनी नावीन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून स्वतंत्र ठसा उमटवला. राज्याच्या पटलावर वेगळी ओळख निर्माण केली होती. हा इतिहास असताना कोरोनोच्या संकटात मात्र तालुक्याची वाताहत होत आहे.

कोरोनोच्या दोन्ही लाटेत खासदार संजयकाका पाटील व आमदार सुमनताई पाटील यांनी पुढाकार घेत काही प्रमाणात उपाययोजना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ग्रामीण रुग्णालय आणि नगरपालिकेच्या माध्यमातून कोविड रुग्णालयांद्वारे काही प्रमाणात रुग्णांना दिलासा मिळाला. मात्र, रुग्णवाढीच्या तुलनेत या उपाययोजना तोकड्या आहेत. वेळेत उपचार मिळत नसल्याने तालुक्यातील मृत्यूदराचे प्रमाण चिंताजनक झाले आहे.

तालुक्याने परंपरागत राजकीय संघर्षाला छेद देत ‘आमदार आमचा आणि खासदारही आमचा’ अशी भूमिका घेतली. अर्थात नेत्यांचे ‘अंडरस्टॅन्डिंग’चे राजकारणही याला कारणीभूत होते. लोकांनी पक्ष, गट तट बाजूला सारुन खासदार पाटील आणि आमदार सुमनताई पाटील यांच्या झोळीत भरघोस मताचे दान टाकले.

एकाच तालुक्यात आमदार आणि खासदार असल्यामुळे तालुक्याला कशाची उणीव भासणार नाही, अशी अपेक्षा होती. मात्र, या अपेक्षा कोरोनोच्या लाटेत फोल ठरल्या आहेत. खासदार पाटील यांच्या ताब्यात साखर कारखाना, तर आमदार पाटील यांच्या ताब्यात सूतगिरणी, खरेदी-विक्री संघ आहे. या माध्यमातून कोविडसाठी स्वतंत्र रुग्णालये उभा करणे सहज शक्य होते. मात्र, याबाबत दोन्ही नेत्यांकडून कोणतेचे प्रयत्न होताना दिसून येत नाहीत. दोघांनी तालुक्यात तातडीने पाचशे, हजार बेडचे रुग्णालय सुुरू करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

चौकट

नेत्यांकडून भ्रमनिरास

रुग्ण वाढत असताना, केवळ पन्नास, शंभर बेड तेही नगरपालिका आणि शासकीय रुग्णालयाच्या सहकार्याने चालवून सुरू असलेला दिखावा भ्रमनिरास करणारा आहे. नेत्यांना साकडे घालूनदेखील बेड उपलब्ध न झाल्यामुळे झालेले मृत्यू राजकीय उदासीनतेचे बळी आहेत.