शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पालिकेच्या निधीत आमदार, खासदारांचा हस्तक्षेप

By admin | Updated: December 3, 2015 23:55 IST

‘नियोजन’चा निधी रोखला : सभापतींसह नगरसेवक मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार

सांगली : महापालिकेला शासनाकडून मिळणाऱ्या विविध निधीत आता भाजपच्या आमदार, खासदारांनी हस्तक्षेप करण्यास सुरूवात केली आहे. महापालिकेकडून दर्जेदार कामे होत नसल्याचे सांगत पालिकेच्या निधीतील कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करवून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण त्यासाठी महापालिकेच्या ठरावाची गरज आहे. बांधकाम विभागाकडूनच कामे करणार असाल, तर आमच्या ठरावाची गरजच काय?, असा सवाल स्थायी समिती सभापती संतोष पाटील यांनी केला आहे. त्यासाठी येत्या मंगळवारी सभापती पाटील यांच्यासह नगरसेवक जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांची भेट घेणार आहेत. शहरातील विकासकामे महापालिकेमार्फत केली जातात. आजअखेर या विकास कामांत लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप केलेला नाही. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात जिल्हा नियोजन समितीतून महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला. या निधीत पालिकेचा हिस्सा घालून विकासकामे करण्यात आली. ही सर्व कामे पालिकेच्या बांधकाम विभागामार्फत झाली. त्यात कधीच वाद झाला नाही. पण आता राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर महापालिकेला नव्या नियमांना तोंड द्यावे लागत आहेत. त्यात पालिकेत काँग्रेसची सत्ता असल्याने भाजपचे आमदार व खासदारांचा विकास कामांतील हस्तक्षेप वाढला आहे. जिल्हा नियोजन समितीतून मागासवर्गीय व दलित वस्तीसाठी पाच कोटीचा निधी आला आहे. या निधीतून करावयाची कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केली जाणार आहेत. तसे आमदार व खासदारांनी सुचविले आहे. त्यासाठी महापालिकेचा ठराव देण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यास पालिकेचीही हरकत नाही. पण कामाचे प्राधान्य कोण ठरविणार? हा प्रश्न आहे. आमदार, खासदार व त्यांच्या समर्थकांना वाटणारी कामे या निधीतून करावयाची, की नगरसेवकांनी सुचविलेली कामे करायची, यावर वाद निर्माण झाला आहे. महापालिकेच्या नगरसेवकांची कामे होणारच नसतील, तर आमचा ठराव कशासाठी हवा? तुम्हीच कामे निश्चित करा व निधी खर्च करा, असा पवित्रा सभापती संतोष पाटील व नगरसेवकांनी घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामे करून घेण्यासही सभापतींनी हरकत घेतलेली नाही. पण महापालिका सुचवेल ती कामे होणार असतील, तर आक्षेप नाही, असा मुद्दाही त्यांनी बोलताना मांडला. यासाठी मंगळवारी सभापती पाटील, नगरसेवक जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. (प्रतिनिधी)निधी पालिकेचा : कामे बांधकामकडेमहापालिकेकडून दर्जेदार कामे होत नसल्याचे सांगत पालिकेच्या निधीतील कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करवून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण त्यासाठी महापालिकेच्या ठरावाची गरज आहे. बांधकाम विभागाकडूनच कामे करणार असाल, तर आमच्या ठरावाची गरजच काय?, असा सवाल स्थायी समिती सभापती संतोष पाटील यांनी केला आहे. निधी महापालिकेचा आणि कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्याचा आमदार, खासदारांचा अटास कशासाठी, असाही त्यांनी सवाल केला आहे.