शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

मिरजेतील मिशन हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सोडल्या नोकऱ्या, कर्मचाऱ्यांच्या अन्यत्र चाकऱ्या

By अविनाश कोळी | Updated: August 22, 2023 17:17 IST

व्यस्थापनातील उपचार चुकल्याने ‘मिशन’ भकास

अविनाश कोळीसांगली : रुग्णावरील उपचार जेवढे महत्त्वाचे असतात, तितकेच ते रुग्णालयाच्या व्यवस्थापनातही असतात. मिशन हॉस्पिटलचे व्यवस्थापन एकेकाळी अत्यंत निरोगी होते. व्यवस्थापन करणाऱ्या काही लोकांच्या हलगर्जीपणामुळे, स्वार्थी वृत्तीमुळे येथील व्यवस्थापनाचे आरोग्य ढासळले. त्यामुळे अनेक डॉक्टरांनी थकीत पगाराचा विचार न करता नोकऱ्या सोडल्या. दुसरीकडे हताश कर्मचारी व्यवस्थापनाकडे आता विचारणा करताहेत, कुणी पगार देता का पगार?गैरव्यवस्थापनामुळे वैद्यकीय क्षेत्रातला हा मोठा डोंगर खचला. तज्ज्ञ डॉक्टरांनी, कर्मचाऱ्यांनी सोडलेली साथ, माफक दरातील उपचारापासून वंचित राहिलेले रुग्ण, धूळ खात असलेल्या इमारती, यंत्रसामग्री यामुळे झालेले नुकसान कधीही भरून न निघणारे आहे. ज्यांनी गैरव्यवस्थापन करून हात धुवून घेतले ते आता नामानिराळे झाले आहेत. गैरव्यवस्थापनाबाबत ना कोणाला जाब विचारला गेला, ना कोणाची चौकशी करण्यात आली. त्यामुळे पडझड रोखण्याऐवजी ती जितकी मोठ्या प्रमाणावर होईल तितकी होऊ दिली गेली.

डॉक्टरांचे पगार अडीच वर्षांपासून थकीतडॉक्टरांचे पगार गेल्या अडीच वर्षांपासून तर द्वितीय, तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे पगार वर्षभरापासून थकीत आहेत. कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीचा हप्ताही भरण्यात आलेला नाही. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या कर्मचाऱ्यांचे मोठे खच्चीकरण झाले आहे.

रुग्णसंख्या वीस-पंचवीसवरकधीकाळी येथील पाचशे खाट रुग्णांनी भरूनही नित्य उपचार (फॉलोअप)साठी येणाऱ्या रुग्णांची संख्याही दोनशेच्या वर होती. केवळ मेंदुविकार विभागातच दररोजची ओपीडी ९० रुग्णांची होती. आता या रुग्णालयात केवळ २० ते २५ रुग्ण तपासणीसाठी येत असतात.

अनेक विभागांना टाळेडॉक्टर, कर्मचाऱ्यांअभावी अनेक विभागांना सध्या टाळे लागले आहेत. कधीकाळी गजबजलेल्या रुग्णालयातील यंत्रणा आता धूळ खात असल्यामुळे रुग्णालय भकास वाटू लागले आहे.

कपडे धुवायचे तरी कोठून?रुग्णांचे कपडे, बेडशिट्स, पडदे आदी कापडी साहित्य धुण्यासाठी रुग्णालयात एक स्वतंत्र विभाग आहे. या ठिकाणी सुमारे २० अजस्त्र यंत्रे आहेत. अमेरिकेतून ही यंत्रे आणली आहेत. पूर्वी दिवसभर या यंत्रांचा आवाज घुमायचा. आता रुग्णसंख्याच तुरळक असल्याने यंत्रे शांत झाली आहेत. धुवायलाही आता कपडे नाहीत.

औषध दुकाने ओस

पूर्वी येथील दोन औषध दुकानांतून औषध घेण्यासाठी मोठ्या रांगा लागलेल्या असत. दररोज अडीच ते तीन लाखांची उलाढाल व्हायची. आता महिन्यालाही तेवढी उलाढाल होणे मुश्कील झाले आहे.

टॅग्स :Sangliसांगलीhospitalहॉस्पिटलmiraj-acमिरज