शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत बाबासाहेबांच्या पाऊलखुणा...

By admin | Updated: April 13, 2016 23:35 IST

कळंबीशीही नाते : महारवतन प्रश्नाबाबत केले होते मिरजेत मार्गदर्शन

सांगली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मिरजेशी नाते राहिले. महारवतन जमिनी आणि दलितांवर तत्कालीन व्यवस्थांकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात त्यांनी संघर्ष करताना, मिरजेतील दलितांमध्ये जागृतीचे काम केले. २ नोव्हेंबर १९४१ रोजी त्यांनी मिरजेतील तक्का (नदीवेस) येथे यासंदर्भात सभा घेतली होती. त्यानंतरही रेल्वे प्रवासादरम्यान मिरज स्थानकावर अनेकदा कार्यकर्त्यांना ते भेटले होते. बाबासाहेब आंबेडकर यांचा जिल्ह्याशी असलेला संबंध मिरज आणि परिसरापुरता मर्यादित होता. कळंबी येथील दादासाहेब इनामदार यांच्याही ते संपर्कात होते. इनामदार व बाबासाहेबांमध्ये अनेकदा पत्रव्यवहारही झालेले आहेत. पुणे येथील सिम्बॉयसिसच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती संग्रहालयात असलेल्या पत्रांमध्ये यासुद्धा पत्रांचा समावेश आहे. दलित चळवळ आणि परिसरातील कामांबाबत इनामदार यांच्याशी ते संपर्कात होते. मिरज इतिहास संशोधन मंडळाकडील माहितीनुसार, नोव्हेंबर १९४१ मध्ये ते सांगलीला वकील म्हणून एका केससंदर्भात आले होते. फौजदारीची ही केस होती. सांगलीतील काम आटोपल्यानंतर ते मिरजेला आले. मिरजेतील तक्का परिसरात त्यांनी सभा घेतली. या सभेत त्यांनी ‘महारवतन’ या विषयावर भाषण केले होते. दलितांमध्ये यासंदर्भात जागृती होण्यासाठी त्यांनी जी चळवळ हाती घेतली होती, त्या चळवळीला मिरजेतील या सभेचाही स्पर्श झाला होता. तत्कालीन संस्थानांशीही बाबासाहेबांनी वतन जमिनींबाबतच्या अडचणींबाबत पत्रव्यवहार केला होता. मात्र यासंदर्भातील कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे इतिहास संशोधक मंडळाने सांगितले. बाबासाहेब यांनी ज्यावेळी स्वतंत्र कामगार पक्ष (इंडिपेंडंट लेबर पार्टी) ची स्थापना केली होती. त्यावेळी निवडणुका लढविताना ते महाराष्ट्रासह कर्नाटकातील काही गावांमध्येही सभांसाठी गेले होते. निपाणी व परिसरात तसेच सीमेवरील कर्नाटकमधील काही गावांमध्ये ते गेले होते. अशावेळी रेल्वे प्रवासादरम्यान ते नेहमी येथील स्थानकावर कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी थांबत असत. त्यामुळे यानिमित्तानेही सातत्याने अनेकदा मिरजेशी त्यांचा संपर्क झाला. याठिकाणच्या पाऊलखुणा आजही सर्वच घटकांना प्रेरणादायी ठरत आहेत. मिरजेतील शास्त्री चौक व तक्का परिसरात आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त अनेक कार्यक्रम होतात. हा परिसर बाबासाहेबांच्या पाऊलखुणांनी ऐतिहासिक बनला आहे. नव्या पिढीतील अनेकांना याची कल्पना नसली तरी, निश्चितच संपूर्ण शहराला पुढील अनेक काळ हे स्थान पे्ररणा देत राहील. (प्रतिनिधी)