शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

मिरजेत बाबासाहेबांच्या पाऊलखुणा...

By admin | Updated: April 13, 2016 23:35 IST

कळंबीशीही नाते : महारवतन प्रश्नाबाबत केले होते मिरजेत मार्गदर्शन

सांगली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मिरजेशी नाते राहिले. महारवतन जमिनी आणि दलितांवर तत्कालीन व्यवस्थांकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात त्यांनी संघर्ष करताना, मिरजेतील दलितांमध्ये जागृतीचे काम केले. २ नोव्हेंबर १९४१ रोजी त्यांनी मिरजेतील तक्का (नदीवेस) येथे यासंदर्भात सभा घेतली होती. त्यानंतरही रेल्वे प्रवासादरम्यान मिरज स्थानकावर अनेकदा कार्यकर्त्यांना ते भेटले होते. बाबासाहेब आंबेडकर यांचा जिल्ह्याशी असलेला संबंध मिरज आणि परिसरापुरता मर्यादित होता. कळंबी येथील दादासाहेब इनामदार यांच्याही ते संपर्कात होते. इनामदार व बाबासाहेबांमध्ये अनेकदा पत्रव्यवहारही झालेले आहेत. पुणे येथील सिम्बॉयसिसच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती संग्रहालयात असलेल्या पत्रांमध्ये यासुद्धा पत्रांचा समावेश आहे. दलित चळवळ आणि परिसरातील कामांबाबत इनामदार यांच्याशी ते संपर्कात होते. मिरज इतिहास संशोधन मंडळाकडील माहितीनुसार, नोव्हेंबर १९४१ मध्ये ते सांगलीला वकील म्हणून एका केससंदर्भात आले होते. फौजदारीची ही केस होती. सांगलीतील काम आटोपल्यानंतर ते मिरजेला आले. मिरजेतील तक्का परिसरात त्यांनी सभा घेतली. या सभेत त्यांनी ‘महारवतन’ या विषयावर भाषण केले होते. दलितांमध्ये यासंदर्भात जागृती होण्यासाठी त्यांनी जी चळवळ हाती घेतली होती, त्या चळवळीला मिरजेतील या सभेचाही स्पर्श झाला होता. तत्कालीन संस्थानांशीही बाबासाहेबांनी वतन जमिनींबाबतच्या अडचणींबाबत पत्रव्यवहार केला होता. मात्र यासंदर्भातील कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे इतिहास संशोधक मंडळाने सांगितले. बाबासाहेब यांनी ज्यावेळी स्वतंत्र कामगार पक्ष (इंडिपेंडंट लेबर पार्टी) ची स्थापना केली होती. त्यावेळी निवडणुका लढविताना ते महाराष्ट्रासह कर्नाटकातील काही गावांमध्येही सभांसाठी गेले होते. निपाणी व परिसरात तसेच सीमेवरील कर्नाटकमधील काही गावांमध्ये ते गेले होते. अशावेळी रेल्वे प्रवासादरम्यान ते नेहमी येथील स्थानकावर कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी थांबत असत. त्यामुळे यानिमित्तानेही सातत्याने अनेकदा मिरजेशी त्यांचा संपर्क झाला. याठिकाणच्या पाऊलखुणा आजही सर्वच घटकांना प्रेरणादायी ठरत आहेत. मिरजेतील शास्त्री चौक व तक्का परिसरात आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त अनेक कार्यक्रम होतात. हा परिसर बाबासाहेबांच्या पाऊलखुणांनी ऐतिहासिक बनला आहे. नव्या पिढीतील अनेकांना याची कल्पना नसली तरी, निश्चितच संपूर्ण शहराला पुढील अनेक काळ हे स्थान पे्ररणा देत राहील. (प्रतिनिधी)