शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत बाबासाहेबांच्या पाऊलखुणा...

By admin | Updated: April 13, 2016 23:35 IST

कळंबीशीही नाते : महारवतन प्रश्नाबाबत केले होते मिरजेत मार्गदर्शन

सांगली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मिरजेशी नाते राहिले. महारवतन जमिनी आणि दलितांवर तत्कालीन व्यवस्थांकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात त्यांनी संघर्ष करताना, मिरजेतील दलितांमध्ये जागृतीचे काम केले. २ नोव्हेंबर १९४१ रोजी त्यांनी मिरजेतील तक्का (नदीवेस) येथे यासंदर्भात सभा घेतली होती. त्यानंतरही रेल्वे प्रवासादरम्यान मिरज स्थानकावर अनेकदा कार्यकर्त्यांना ते भेटले होते. बाबासाहेब आंबेडकर यांचा जिल्ह्याशी असलेला संबंध मिरज आणि परिसरापुरता मर्यादित होता. कळंबी येथील दादासाहेब इनामदार यांच्याही ते संपर्कात होते. इनामदार व बाबासाहेबांमध्ये अनेकदा पत्रव्यवहारही झालेले आहेत. पुणे येथील सिम्बॉयसिसच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती संग्रहालयात असलेल्या पत्रांमध्ये यासुद्धा पत्रांचा समावेश आहे. दलित चळवळ आणि परिसरातील कामांबाबत इनामदार यांच्याशी ते संपर्कात होते. मिरज इतिहास संशोधन मंडळाकडील माहितीनुसार, नोव्हेंबर १९४१ मध्ये ते सांगलीला वकील म्हणून एका केससंदर्भात आले होते. फौजदारीची ही केस होती. सांगलीतील काम आटोपल्यानंतर ते मिरजेला आले. मिरजेतील तक्का परिसरात त्यांनी सभा घेतली. या सभेत त्यांनी ‘महारवतन’ या विषयावर भाषण केले होते. दलितांमध्ये यासंदर्भात जागृती होण्यासाठी त्यांनी जी चळवळ हाती घेतली होती, त्या चळवळीला मिरजेतील या सभेचाही स्पर्श झाला होता. तत्कालीन संस्थानांशीही बाबासाहेबांनी वतन जमिनींबाबतच्या अडचणींबाबत पत्रव्यवहार केला होता. मात्र यासंदर्भातील कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे इतिहास संशोधक मंडळाने सांगितले. बाबासाहेब यांनी ज्यावेळी स्वतंत्र कामगार पक्ष (इंडिपेंडंट लेबर पार्टी) ची स्थापना केली होती. त्यावेळी निवडणुका लढविताना ते महाराष्ट्रासह कर्नाटकातील काही गावांमध्येही सभांसाठी गेले होते. निपाणी व परिसरात तसेच सीमेवरील कर्नाटकमधील काही गावांमध्ये ते गेले होते. अशावेळी रेल्वे प्रवासादरम्यान ते नेहमी येथील स्थानकावर कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी थांबत असत. त्यामुळे यानिमित्तानेही सातत्याने अनेकदा मिरजेशी त्यांचा संपर्क झाला. याठिकाणच्या पाऊलखुणा आजही सर्वच घटकांना प्रेरणादायी ठरत आहेत. मिरजेतील शास्त्री चौक व तक्का परिसरात आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त अनेक कार्यक्रम होतात. हा परिसर बाबासाहेबांच्या पाऊलखुणांनी ऐतिहासिक बनला आहे. नव्या पिढीतील अनेकांना याची कल्पना नसली तरी, निश्चितच संपूर्ण शहराला पुढील अनेक काळ हे स्थान पे्ररणा देत राहील. (प्रतिनिधी)