शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

मिरज तालुक्यामधील ‘रोहयो’ कामास खो!

By admin | Updated: September 5, 2014 23:28 IST

अपुरे कर्मचारी : चौघांवर कामाचा प्रचंड ताण

मालगाव : मिरज तालुक्यात अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे रोजगार हमी योजनेंतर्गत राबविण्यात येत असलेल्या कामांवर परिणाम झाला आहे. योजनेच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांसह चार कर्मचाऱ्यांवर कामाचा वाढता बोजा पडत असल्याने कामे रखडू लागली आहेत. रोजगार हमी योजनेच्या कामांचा निपटारा करण्यासाठी दोन जादा कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे.महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत राबविण्यात येणाऱ्या वृक्ष लागवडीसह ४७ प्रकारच्या कामांचा समावेश आहे. मिरज तालुक्यात १२ प्रकारची कामे राबविली जात आहेत. रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी गटविकास अधिकारी उत्तमराव वाघमोडे यांनी प्रयत्न सुरू केले असले, तरी अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे त्यांच्यावर मर्यादा येत आहेत. कामे रखडण्यावरही कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येचा परिणाम होऊ लागला आहे. तालुक्यात सध्या रोजगार हमी योजनेतंर्गत राबविण्यात येत असलेल्या कामांमध्ये विहीर खुदाई व जनावरांचा गोठा बांधकामाला जादा मागणी आहे. विहीर खुदाईच्या १०० कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी ४७ कामे सुरूकेली आहेत. विहीर खुदाईपेक्षा जनावरांच्या गोठा बांधकाम कामांसाठी ७०० मागणी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. पैकी ३०० कामांना मंजुरी देण्यात आली आहे. अद्यापही अर्ज दाखल होत आहेत. मागणी व मंजुरीचा आलेख पाहिल्यास त्या तुलनेत कामे सुरू झालेली नाहीत. याला प्रामुख्याने अपुरे कर्मचाऱ्यांचे ठळक कारण असल्याचे स्पष्ट होत आहे. जनावरांच्या तीनशे प्रकरणांना मंजुरी दिली असताना १० कामे सुरू आहेत. कामांच्या वाढत्या मागणीचा चार कर्मचाऱ्यांवर बोजा पडल्याने त्याचा परिणाम कामे रखडण्यावर होत आहे.रोजगार हमी योजनेची कामे राबविताना गावभेट, जागांची पाहणी करणे, कामांची मोजमापे देणे, मजुरांच्या कामांची नोंद करणे, कामांचे मूल्यांकन करणे, बिले काढणे, खर्चाचा हिशेब ठेवणे ही जबाबदारीची कामे पार पाडावी लागतात. यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग असणे आवश्यक आहे. मात्र तालुक्यात योजनेच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांसह चार कर्मचाऱ्यांना ही कामे करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वाढीव कामांचा निपटारा करताना विलंब लागत आहे. कामांचे नेटके नियोजन असले तरी अपुऱ्या कर्मचाऱ्यांची समस्या भेडसावू लागली आहे. तालुक्यासाठी अधिकाधिक कामे राबविण्यासाठी दोन जादा संगणकीय ज्ञान असणाऱ्या कर्मचाऱ्यांची गरज असल्याने जि. प. प्रशासनाने याची दखल घेऊन मिरज पंचायत समितीच्या रोजगार हमी योजनेच्या विभागाकडे दोन कर्मचाऱ्यांची तातडीने नमणूक करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)मिरज तालुक्याचे प्रामुख्याने पूर्व व पश्चिम असे दोन भाग येतात. या दोन भागासाठी वेगवेगळ्या तांत्रिक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक गावात रोजगार हमी योजनेच्या पाचहून अधिक कामांना मंजुरी देण्यात आली आहे. सुरुवात करण्यासाठी या तांत्रिक अधिकाऱ्यांची गरज असते. ‘कामे अनेक, मात्र अधिकारी एक’ या परिस्थितीमुळे सर्वच कामांचे वेळेत नियोजन करणे शक्य नसल्याने कामांच्या वाढत्या बोजामुळे या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे.