शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेच्या सभापती राजीनामा देणार

By admin | Updated: September 4, 2016 00:27 IST

पंचायत समिती : कर्नाळचे एडके सभापतिपदाचे दावेदार

मिरज : मिरज पंचायत समितीच्या सभापती जयश्री पाटील या राजीनामा देणार, हे निश्चित झाले आहे. नेत्यांच्या आदेशानुसार त्यांनी शनिवारी जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहल पाटील यांची भेट घेत आपला राजीनामा सादर केला. मात्र, कार्यालयीन वेळ संपल्याने त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नाही. आता मंगळवार, दि. ६ सप्टेंबरला त्या आपला राजीनामा सादर करणार आहेत. पाटील यांच्या राजीनाम्यामुळे सभापतिपदासाठी कर्नाळचे प्रवीण एडके एकमेव दावेदार राहणार आहेत. पंचायत समितीच्या सभापतीपदी जयश्री पाटील यांची चुरशीने निवड झाली होती. पश्चिम भागाला हे पद मिळण्याची अपेक्षा असताना काँग्रेस नेत्यांनी प्रवीण एडके यांना थांबवून जयश्री पाटील यांच्या माध्यमातून तिसऱ्यांदा पूर्व भागाला सभापतिपदाची संधी दिली. पाटील यांना सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. सहा महिन्यानंतर पूर्व-पश्चिम समतोल साधण्यासाठी पश्चिम भागाला पर्यायाने प्रवीण एडके यांनाच संधी देण्याचा काँग्रेस नेत्यांनी शब्द दिला आहे. जयश्री पाटील यांच्या निवडीवेळी एडके यांना डावलल्याने पश्चिम भागात नाराजीचा सूर होता. काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील व विशाल पाटील यांनी राजीनामा देण्याचे आदेश दिल्याने सभापती पाटील यांनी शनिवारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्रेहल पाटील यांच्याकडे सायंकाळी उशिराने राजीनामा सादर केला. या राजीनाम्याची प्रक्रिया मंगळवार, दि. ६ रोजी पूर्ण करण्यात येणार आहे. जयश्री पाटील यांच्या राजीनाम्यामुळे पंचायत समितीत सभापती निवडीसाठी हालचाली सुरू असल्या तरी, कर्नाळचे प्रवीण एडके यांच्या माध्यमातून पश्चिम भागाला न्याय देण्याचा काँग्रेस नेत्यांनी निर्णय घेतल्याने एडके सभापतीपदाचे एकमेव दावेदार आहेत. पश्चिम भागाला न्याय देण्यात यावा, यासाठी एडके यांना बहुतांश काँग्रेस सदस्यांचे समर्थन आहे. दरम्यान, सभापती पाटील यांच्या राजीनाम्यामुळे नवीन सभापती निवडीत विरोधी राष्ट्रवादीच्या सदस्यांची भूमिका काय राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. (वार्ताहर)समतोल साधणारपंचायत समितीमध्ये पदाधिकाऱ्यांची निवड करताना नेहमीच पूर्व व पश्चिम भागाचा समतोल साधण्यात येतो. मात्र, या सदस्यांच्या कार्यकालात अशोक मोहिते वगळता तीनवेळा पूर्वभागाला संधी देण्यात आली होती. आता सभापतिपदासाठी प्रवीण एडके यांच्या रूपाने पुन्हा एकदा पश्चिम भागाला संधी देत समतोल साधला जाणार आहे.