शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

मिरज पाणी योजना ‘एमजीपी’कडे?

By admin | Updated: July 7, 2017 23:24 IST

मिरज पाणी योजना ‘एमजीपी’कडे?

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : वादग्रस्त मिरज पाणीपुरवठा योजनेची १०३ कोटीची निविदा महासभेने रद्द केली आहे. त्यात स्थायी समितीने निविदा रद्दला विरोध केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या वादात योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनीही तसे संकेत देत, राज्य शासन सर्वोच्च असून, ते असा निर्णय घेऊ शकतात, असे सांगत महासभेला धक्का दिला आहे. अमृत योजनेतून मिरज पाणीपुरवठा योजनेसाठी १०३ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी ८७ कोटीची निविदाही प्रशासनाने प्रसिद्ध केली होती. या निविदेवरून महासभा विरूद्ध स्थायी समिती असा वाद निर्माण झाला आहे. निविदा दर मान्यतेसाठी स्थायी समितीकडे असतानाच महासभेने निविदा रद्द करण्याचा ठराव केला आहे. महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवकांच्या वादात या योजनेचे काम रखडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर योजनेचे काम महापालिकेकडून काढून घेऊन ते एमजीपीकडे देण्यात येणार असल्याचीही जोरदार चर्चाही सुरू होती. त्याबाबत आयुक्त खेबूडकर यांना विचारता ते म्हणाले की, राज्य शासन हे सर्वोच्च आहे. ते कोणताही निर्णय घेऊ शकते. जीवन प्राधिकरणकडे योजना वर्ग करतील अथवा अन्य त्रयस्थ विभागाकडून काम करून घेतील. शासन जो निर्णय देईल, त्याची प्रशासन अंमलबजावणी करेल. महासभेचा निविदा रद्दचा ठरावही आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून देऊ. स्थायी समितीचा ठराव शासनाकडे पाठविला आहे. पण त्यावर अद्याप उत्तर आलेले नाही. या योजनेत लोकहित महत्त्वाचे आहे. कोल्हापूर महापालिकेने सहावेळा निविदा काढूनही त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. खेबूडकर इथे आहेत, म्हणून योजना मंजूर झालेली नाही. महापालिकेवरील बोजा कसा कमी होईल हे आम्ही पाहणार. इचलकरंजीची निविदा कमी दराने आली, त्याचाही अभ्यास करू, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. २५ हजार वृक्ष लागवडसांगली, मिरज व कुपवाड महापालिका क्षेत्रात २५ हजार वृक्षारोपणाचे उद्दिष्ट पूर्ण केले असून अजूनही ४ हजार झाले लावली जाणार आहेत. ही झाडे जगविण्यासाठी विविध उपाययोजनाही आखण्यात आल्या आहेत. रस्त्यावरील झाडांना एक हजार ट्री गार्ड देणार आहोत. तसेच झाडांना पाणी घालण्यासाठी नवीन टँकरही खरेदी करणार असल्याचे खेबूडकर यांनी सांगितले.