शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मिरजकरांनीच जपला माणुसकीचा खरा धर्म

By admin | Updated: July 4, 2016 00:16 IST

राजेंद्रसिंह राणा : लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा केल्याबद्दल प्रशंसा, जलदूत एक्स्प्रेसची, विहिरीची पाहणी

मिरज : जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी रविवारी मिरज रेल्वे यार्डास भेट देऊन लातूरला पाठविण्यात येणाऱ्या जलदूत एक्स्प्रेसची माहिती घेतली. पाण्यासाठी सर्वत्र कलह सुरू असताना, मिरजेतील लोक दुष्काळग्रस्त लातूरला पाणी देत असल्याबद्दल राणा यांनी प्रशंसा केली. खऱ्या अर्थाने मिरजकरांनी भारतीय संस्कृतीचे व माणुसकीच्या धर्माचे पालन केल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. राणा यांनी रेल्वे यार्डातून दररोज पाणी घेऊन लातूरला जाणाऱ्या जलदूत एक्स्प्रेसची व हैदरखान विहिरीची पाहणी केली. ते म्हणाले, मिरजेतून रेल्वेने करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे लातूरच्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मिरजेत रेल्वे स्थानकात टँकरमध्ये पाणी भरण्याची व्यवस्था कायमस्वरूपी ठेवल्याने भविष्यातही त्याचा उपयोग होईल. लातूरला पाणी देणाऱ्या मिरजेचा सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे. माणुसकीच्या धर्माचे आणि भारतीय संस्कृती अत्यंत चांगल्या पद्धतीने जोपासण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांनी रेल्वे स्थानकास भेट देऊन पाणी भरण्याच्या नियोजनाच्या व्यवस्थेची पाहणी केली. टँकरमध्ये पाणी भरण्याची, शुध्दीकरणाची व्यवस्था, हैदरखान विहिरीत करण्यात येणारा पाणीसाठा, लातूरला दोन महिन्यात किती कोटी लिटर पाणी पाठविण्यात आले, याची माहिती घेतली. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भोसले, ठेकेदार शशांक जाधव यांनी त्यांना माहिती दिली. सर्वत्र पाण्यासाठी ओरड सुरू असल्याने नद्यांचे पुनरूज्जीवन आवश्यक आहे, असे मत राणा यांनी व्यक्त केले. मिरज डेव्हलपमेंट फोरमतर्फे लोकसहभागातून केलेल्या मिरज ओढा सफाईची राणा यांनी पाहणी करून वृक्षारोपण केले. यावेळी मकरंद देशपांडे, गजेंद्र कुळ्ळोळी, पांडुरंग कोरे, पृथ्वीराज पवार, सुकुमार पाटील, राजा देसाई, मनीर मुल्ला, नंदू पवार, जलबिरादाराचे सुनील जोशी, नरेंद्र चूघ, डॉ. रवींद्र व्होरा उपस्थित होते. (वार्ताहर) प्रशासनाचा अडथळा येऊ नये... मिरजेत लोकसहभागातून सुमारे अडीच किलोमीटर ओढापात्राची सफाई करण्यात आली असताना, तहसीलदारांनी मुरूम खुदाईचा ठपका ठेवून चार कोटी रूपये दंडाची नोटीस दिली आहे. प्रशासनाच्या नोटिसीमुळे ओढापात्र सफाई व पाणीसाठ्यासाठी तलावाची खुदाई बंद करण्यात आल्याची माहिती किशोर पटवर्धन यांनी दिली. त्यावर, लोकसहभागातून चांगले काम चालू असताना यात शासकीय यंत्रणेने अडथळा आणू नये. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत मध्यस्थी करून काम सुरू करावे, अशी सूचना राणा यांनी केली.