शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
3
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास
4
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
5
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
6
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
7
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
8
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
9
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
10
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
11
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
12
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
13
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
14
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
15
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
16
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
17
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
18
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
19
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
20
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी मिरज ग्रामीण पोलिसांची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:51 IST

जिल्ह्यात सुमारे दीड लाख एकर क्षेत्रावर द्राक्षाची लागवड दरवर्षी होते. दर्जेदार द्राक्ष निर्मिती करण्यासाठी कष्ट घेणार्‍या शेतकऱ्यांची मात्र ...

जिल्ह्यात सुमारे दीड लाख एकर क्षेत्रावर द्राक्षाची लागवड दरवर्षी होते. दर्जेदार द्राक्ष निर्मिती करण्यासाठी कष्ट घेणार्‍या शेतकऱ्यांची मात्र व्यापाऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक होते. यास प्रतिबंधासाठी मिरज ग्रामीण पोलिसांनी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. शेतकऱ्यांनी द्राक्षे विक्री करण्यापूर्वी संबंधित व्यापाऱ्याची माहिती घेऊन ही माहिती पोलिसांनाही देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दरवर्षी हंगामात राज्यातील व परराज्यातील अनेक व्यापारी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये बुडवून गायब होतात. शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यावर संबंधित व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल होतात, मग त्या व्यापाऱ्यांचा शोध सुरू होतो. मात्र फसवणूक होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक थांबविण्यासाठी प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी मोहीम सुरू केली आहे.

द्राक्षे विक्रीचा व्यवहार करण्यापूर्वी व्यापाऱ्यांचे आधारकार्ड, पॅनकार्डसह अन्य माहिती घ्यावी व लेखी व्यवहार करावेत, संबंधित व्यापाऱ्यांची पोलीस ठाण्यात माहिती देऊन खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी शेतकऱ्यांना केले.

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी पोलिसांकडून जनजागृती मोहीम राबवली जात आहे. दरवर्षी सुमारे ३० ते ५० कोटी रुपयांची फसवणूक होत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. व्यापाऱ्यांची रीतसर नोंदणी व्हावी, अशी अनेक वर्षांची मागणी केली जात होती. त्या मागणीला आता यश आले आहे. पोलिसांनी सुरू केलेल्या जनजागृती मोहिमेचे शेतकऱ्यांनी स्वागत केले असून यामुळे शेतकऱ्यांच्या फसवणुकीस आळा बसणार आहे.