शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

मिरज-पुणे दुहेरीकरणाचे काम सप्टेंबरपासून

By admin | Updated: June 30, 2016 23:32 IST

निविदा प्रक्रिया पूर्ण : निधीचीही तरतूद; साडेतीन हजार कोटींच्या खर्चाला मान्यता

मिरज : मिरज-पुणे रेल्वेमार्ग दुहेरीकरणाच्या कामास सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. लोंढा-मिरज-पुणे या ४६७ किलोमीटर मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामासाठी ३ हजार ६२७ कोटी रुपये खर्चाला मान्यता मिळाल्याने, मिरज-पुणे दुहेरीकरणासाठी निविदा प्रक्रिया पार पडली आहे. तीन महिन्यात प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे. लोंढा-मिरज दुहेरीकरणाच्या कामास प्रारंभ झाला आहे. मिरज-पुणे मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्या तिपटीने वाढल्याने लोंढा-मिरज-पुणे या मार्गाच्या दुहेरीकरणाच्या मागणीची पूर्तता होणार आहे. यावर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामासाठी आर्थिक तरतुदीस मान्यता मिळाल्याने कामास गती मिळाली आहे. पुणे ते मिरजदरम्यान दुहेरीकरणाच्या कामाची मध्य रेल्वेने तीन टप्प्यात निविदा प्रक्रिया पूर्ण केली असून, पाच वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. लोंढा ते मिरज या १९० किलोमीटर लांबीच्या दुहेरीकरणाच्या कामाची निविदा दक्षिण-पश्चिम रेल्वेने यापूर्वीच काढून कामास सुरुवात झाली आहे. सप्टेंबरपासून पुणे येथून दुहेरीकरणाच्या कामास सुरुवात होण्याची शक्यता आहे. लोंढा-मिरज-पुणे या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी ३ हजार ६२७ कोटी रूपये खर्चास मान्यता मिळाली आहे. मिरज-पुणे मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण झाल्यानंतर गाड्यांच्या संख्येत वाढ होणार आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असतानाही, गेल्या चाळीस वर्षांत महालक्ष्मी, सह्याद्री व कोयना या तीनच एक्स्प्रेस उपलब्ध आहेत. कोल्हापूर-मिरज-मुंबई मार्गावर नवीन सुपरफास्ट धावणार आहेत. मिरज ते पुणे मार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणानंतर पुणे, मुंबई प्रवास जलद होणार आहे. मिरज-पुणे प्रवास केवळ चार तासांत होणार आहे. दुहेरीकरणानंतर विद्युतीकरण सुरू करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.सातारा येथे स्वतंत्र कार्यालयपुणे-मिरज रेल्वे मार्ग दुहेरीकरणाच्या कामासाठी सातारा येथे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात येणार असून, सुमारे २८० किलोमीटर लांबीच्या दुहेरीकरणाच्या कामाचे नियंत्रण सातारा येथील कार्यालयातून होणार आहे. दुहेरीकरणासाठी आवश्यकता असलेल्या ठिकाणी भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दुहेरीकरणासाठी रेल्वे उड्डाण पूल, भुयारी पूल, नदी, ओढे, नाल्यांवरील पुलांचे बांधकाम करावे लागणार आहे.