शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत अतिक्रमणे हटाव मोहीम बारगळली

By admin | Updated: January 25, 2016 01:08 IST

ईदगाह रस्ता रूंदीकरणानंतर कारवाई ठप्प : प्रमुख रस्त्यांच्या रूंदीकरणाची नागरिकांची मागणी

सदानंद औंधे ल्ल मिरज मिरजेतील अतिक्रमणांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर पवित्रा घेत ईदगाहनगर रस्त्याचे रूंदीकरण करून अनेक वर्षाचा प्रश्न निकालात काढला. मात्र महापालिका आयुक्तांनी पुन्हा कार्यभार स्वीकारल्यानंतर अतिक्रमण हटाव मोहीम थंडावली असून शहरातील अन्य प्रमुख रस्त्यांचे रूंदीकरण बारगळले आहे. किरकोळ अतिक्रमणे हटविण्याऐवजी महापालिकेने रखडलेल्या प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण करण्याची नागरिकांची मागणी आहे. मिरज शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी महापालिकेतील कारभाऱ्यांचा अडथळा, ही मिरजेतील प्रमुख समस्या आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेची सूत्रे तात्पुरती हाती घेतल्यानंतर मिरजेत अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली. ईदगाहनगर रस्त्याचे रूंदीकरण पार पडले. मात्र महापालिका आयुक्त परतल्यानंतर अतिक्रमण हटाव मोहीम बारगळण्याची चिन्हे आहेत. शहरातील छत्रपती शिवाजी मार्ग, चर्च रोड, गांधी चौक ते शिवाजी चौक, गणेश तलाव ते महाराणा प्रताप चौक, किसान चौक ते शास्त्री चौक, बसस्थानक ते दर्गा मार्गे बालगंधर्व नाट्यगृह, हिरा हॉटेल ते शहर पोलीस ठाण्यापर्यंतच्या अरूंद रस्त्यांचा वाहतुकीला अडथळा होत आहे. प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत लहान रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत. रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी आराखडा मंजूर आहे, मात्र निधी नाही, कारवाईस विरोध आहे, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, अशा विविध कारणांमुळे रस्ता रुंदीकरण रखडले आहे. प्रमुख रस्त्यांवर भरणारे आठवडा बाजारही वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मार्केट परिसरात फायरफायटर चौकात रस्त्यावरील हातगाड्यांचा वाहतुकीला अडथळा होत आहे. स्टेशन चौक ते शिवाजी रोड, गांधी चौक या रस्त्याच्या रुंदीकरणाची प्रक्रिया गेली दहा वर्षे सुरु आहे. रस्त्यावर खोकी हटविण्यात आली. मात्र गांधी चौकापर्यंत इमारतींचे जादा बांधकाम हटविण्यात आले नसल्याने विद्युत खांब रस्त्यावरच आहेत. विद्युत खांब रस्त्याकडेला हलविण्यासाठी महापालिकेने ३७ लाख रूपये महावितरणला दिले आहेत. मात्र रस्त्याकडेच्या इमारतींचे अतिक्रमण काढले नसल्याने विद्युत खांबांचा अडथळा कायम आहे. अवैध बांधकामे, अतिक्रमणे हटविण्याअभावी शिवाजी रस्त्याचे रूंदीकरण रखडले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मिरजेतील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिल्यानंतर केवळ रस्त्यावरील हातगाडे व विक्रेत्यांना हटविण्याची कारवाई करण्यात आली. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर पवित्रा घेत ईदगाहनगर येथील अतिक्रमणे हटवून रस्ता रुंदीकरण पूर्ण केले. अनेक वर्षानंतर सुरू झालेली मिरजेतील अतिक्रमण हटाव मोहीम आता थांबल्याची चिन्हे आहेत. अतिक्रमण विरोधातील कारवाई पुन्हा सुरु होणार का? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. मिरजेतील रस्त्यांची दुरवस्था व वाहतुकीच्या अडथळ्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.