शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

मिरज : संधिवाताचे रुग्ण वाढत असताना उपचार पद्धतीने दिलासा : अद्ययावत उपचार पद्धतीचा जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 22:30 IST

मिरज : हृदयरोग, मधुमेह, पक्षाघात, कर्करोग आणि संधिवात या पाच आजारांपैकी संधिवात हा वेदना आणि अपंगत्व निर्माण करणारा रोग आहे. संधिवाताच्या रूग्णांची संख्या वाढत असली तरी,

ठळक मुद्देजागतिक संधिवात दिनतिशीनंतर १४ टक्के शहरीतर १८ टक्के ग्रामीण लोकांना संधिवाताच्या आजाराचा त्रास

सदानंद औंधे ।मिरज : हृदयरोग, मधुमेह, पक्षाघात, कर्करोग आणि संधिवात या पाच आजारांपैकी संधिवात हा वेदना आणि अपंगत्व निर्माण करणारा रोग आहे. संधिवाताच्या रूग्णांची संख्या वाढत असली तरी, गेल्या काही वर्षात नवी औषधे, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, सांधेरोपण शस्त्रक्रिया यामुळे संधिवाताच्या उपचारांमध्ये क्रांती झाली आहे. लवकर निदान व योग्य उपचारामुळे संधिवाताचे नियंत्रण करणे शक्य असल्याचे अस्थिरोग तज्ज्ञांनी सांगितले.

शरीरातील सुमारे २०० सांध्यांपैकी अर्धेअधिक मणक्यात असतात. हालचाल हे सांध्याचे मुख्य कार्य आहे. सांधा दुखणे आणि हालचालीत बाधा येणे, याला संधिवात म्हणतात. तिशीनंतर १४ टक्के शहरी, तर १८ टक्के ग्रामीण लोकांचे सांधे दुखत असतात. काही सर्वेक्षणांमध्ये तर याहीपेक्षा हे प्रमाण जास्त आहे. हजारात एखाद्या मुलाचे सांधे दुखतात. संधिवाताचे प्रमाण स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळते. पुरुषांतील संधिवातामुळे मणक्याची झीज व कंबरदुखीचा त्रास होतो. संधिवात झालेल्या लहान मुलांची वाढ खुंटते. झिजेचे आणि सुजेचे असे संधिवाताचे दोन प्रकार आहेत.

वयोमान, मार लागणे, स्थूलता, सांध्यांचा अतिवापर, व्यायामाच्या अभावाने स्नायूंचा अशक्तपणा, अशी संधिवाताची वेगवेगळी कारणे आहेत. मानेचे, तसेच कमरेचे मणके आणि गुडघा, खांदा, घोट्याच्या सांध्यांची झीज होऊन हे सांधे दुखतात व हळूहळू अकार्यक्षम बनतात. काम केल्यानंतर, जिने चढताना गुडघे दुखणे, दिवसभर कॉम्प्युटरवर बसून सायंकाळी मान किंवा कंबर दुखणे, हे झिजेच्या संधिवाताचे मुख्य लक्षण आहे. हळूहळू दुखणे वाढून सांधा सतत, तसेच रात्रीही दुखत राहतो. कालांतराने सांधा निकामी होतो. अनेक आजारांत सांध्यांना सूज येते. हाता-पायांची बोटे, तसेच मनगट आणि घोट्याचे असे अनेक सांधे सुजतात व दुखतात. सुजेमुळे सांधे आतून खराब होतात आणि कधीही न भरून येणारी हानी होते. बोटे आणि इतर सांधे वेडेवाकडे होतात. वेदना आणि व्यंग यामुळे उदासीनता येते.

तिशीनंतर रक्तातल्या संधिवातामुळे त्रास सुरू होतो. गरजेपेक्षा जास्त आहारामुळे गुडघ्यावर ताण पडून गुडघ्याची झीज होऊन वेदना सुरू होतात. लवकर निदान झाले तर योग्य उपचारांनी सांधे पूर्ववत होऊ शकतात, व्यंग टाळता येते. संधिवाताचे लक्षण असणारे सुमारे शंभरएक आजार आहेत. त्यांच्या अचूक निदानाचे आणि औषधोपचाराचे ºहुमॅटॉलॉजी हे वैद्यकशास्त्र आहे. संधिवातावर उपचार उपलब्ध झाल्याने रूग्णांना जगणे सुसह्य झाले आहे.गैरसमजुती दूर होऊन जागरुकता वाढणे महत्त्वाचे : कुलकर्णीसंधिवाताविषयी गैरसमजुती जास्त असल्याने, आजार वाढून अपंगत्व येते. संधिवातावर वेगवेगळे उपचार उपलब्ध आहेत. सांधेरोपणासह वेडेवाकडे झालेले अवयव शस्त्रक्रियेने सरळ करता येतात. संधिवातावरील अद्ययावत उपचारांबाबत समाजात जागरुकता निर्माण होणे आवश्यक असल्याचे मिरजेतील अस्थिव्यंगतज्ज्ञ डॉ. हर्षल कुलकर्णी यांनी सांगितले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीय