शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

मिरज : संधिवाताचे रुग्ण वाढत असताना उपचार पद्धतीने दिलासा : अद्ययावत उपचार पद्धतीचा जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 22:30 IST

मिरज : हृदयरोग, मधुमेह, पक्षाघात, कर्करोग आणि संधिवात या पाच आजारांपैकी संधिवात हा वेदना आणि अपंगत्व निर्माण करणारा रोग आहे. संधिवाताच्या रूग्णांची संख्या वाढत असली तरी,

ठळक मुद्देजागतिक संधिवात दिनतिशीनंतर १४ टक्के शहरीतर १८ टक्के ग्रामीण लोकांना संधिवाताच्या आजाराचा त्रास

सदानंद औंधे ।मिरज : हृदयरोग, मधुमेह, पक्षाघात, कर्करोग आणि संधिवात या पाच आजारांपैकी संधिवात हा वेदना आणि अपंगत्व निर्माण करणारा रोग आहे. संधिवाताच्या रूग्णांची संख्या वाढत असली तरी, गेल्या काही वर्षात नवी औषधे, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, सांधेरोपण शस्त्रक्रिया यामुळे संधिवाताच्या उपचारांमध्ये क्रांती झाली आहे. लवकर निदान व योग्य उपचारामुळे संधिवाताचे नियंत्रण करणे शक्य असल्याचे अस्थिरोग तज्ज्ञांनी सांगितले.

शरीरातील सुमारे २०० सांध्यांपैकी अर्धेअधिक मणक्यात असतात. हालचाल हे सांध्याचे मुख्य कार्य आहे. सांधा दुखणे आणि हालचालीत बाधा येणे, याला संधिवात म्हणतात. तिशीनंतर १४ टक्के शहरी, तर १८ टक्के ग्रामीण लोकांचे सांधे दुखत असतात. काही सर्वेक्षणांमध्ये तर याहीपेक्षा हे प्रमाण जास्त आहे. हजारात एखाद्या मुलाचे सांधे दुखतात. संधिवाताचे प्रमाण स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळते. पुरुषांतील संधिवातामुळे मणक्याची झीज व कंबरदुखीचा त्रास होतो. संधिवात झालेल्या लहान मुलांची वाढ खुंटते. झिजेचे आणि सुजेचे असे संधिवाताचे दोन प्रकार आहेत.

वयोमान, मार लागणे, स्थूलता, सांध्यांचा अतिवापर, व्यायामाच्या अभावाने स्नायूंचा अशक्तपणा, अशी संधिवाताची वेगवेगळी कारणे आहेत. मानेचे, तसेच कमरेचे मणके आणि गुडघा, खांदा, घोट्याच्या सांध्यांची झीज होऊन हे सांधे दुखतात व हळूहळू अकार्यक्षम बनतात. काम केल्यानंतर, जिने चढताना गुडघे दुखणे, दिवसभर कॉम्प्युटरवर बसून सायंकाळी मान किंवा कंबर दुखणे, हे झिजेच्या संधिवाताचे मुख्य लक्षण आहे. हळूहळू दुखणे वाढून सांधा सतत, तसेच रात्रीही दुखत राहतो. कालांतराने सांधा निकामी होतो. अनेक आजारांत सांध्यांना सूज येते. हाता-पायांची बोटे, तसेच मनगट आणि घोट्याचे असे अनेक सांधे सुजतात व दुखतात. सुजेमुळे सांधे आतून खराब होतात आणि कधीही न भरून येणारी हानी होते. बोटे आणि इतर सांधे वेडेवाकडे होतात. वेदना आणि व्यंग यामुळे उदासीनता येते.

तिशीनंतर रक्तातल्या संधिवातामुळे त्रास सुरू होतो. गरजेपेक्षा जास्त आहारामुळे गुडघ्यावर ताण पडून गुडघ्याची झीज होऊन वेदना सुरू होतात. लवकर निदान झाले तर योग्य उपचारांनी सांधे पूर्ववत होऊ शकतात, व्यंग टाळता येते. संधिवाताचे लक्षण असणारे सुमारे शंभरएक आजार आहेत. त्यांच्या अचूक निदानाचे आणि औषधोपचाराचे ºहुमॅटॉलॉजी हे वैद्यकशास्त्र आहे. संधिवातावर उपचार उपलब्ध झाल्याने रूग्णांना जगणे सुसह्य झाले आहे.गैरसमजुती दूर होऊन जागरुकता वाढणे महत्त्वाचे : कुलकर्णीसंधिवाताविषयी गैरसमजुती जास्त असल्याने, आजार वाढून अपंगत्व येते. संधिवातावर वेगवेगळे उपचार उपलब्ध आहेत. सांधेरोपणासह वेडेवाकडे झालेले अवयव शस्त्रक्रियेने सरळ करता येतात. संधिवातावरील अद्ययावत उपचारांबाबत समाजात जागरुकता निर्माण होणे आवश्यक असल्याचे मिरजेतील अस्थिव्यंगतज्ज्ञ डॉ. हर्षल कुलकर्णी यांनी सांगितले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीय