शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
5
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
6
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
8
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
9
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
10
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
11
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
12
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
13
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
14
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
15
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
16
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
17
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
18
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
19
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
20
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू

मंत्री, नेतेही भ्रूणहत्येला जबाबदार

By admin | Updated: March 9, 2017 23:46 IST

पृथ्वीराज पाटील : शासकीय समित्यांमधील हस्तक्षेपामुळे हत्याकांडाला बळ

सांगली : प्रसुतीपूर्व निदान तंत्र कायदा जिल्हा सल्लागार समितीच्या कारभारात हस्तक्षेप करणारे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि याप्रकरणी हस्तक्षेप करणारे संबंधित भाजप नेते हेच स्त्रीभ्रूण हत्याकांडास जबाबदार आहेत. त्यामुळे या सर्वांची सखोल चौकशी करून त्यांनाही सहआरोपी करावे, अशी मागणी गुरुवारी काँगे्रसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.ते म्हणाले की, खिद्रापुरेच्या कारनाम्याबद्दल २९ एप्रिल २0१६ रोजी निनावी फोनद्वारे तक्रार करण्यात आली होती. त्यावेळी सत्ताधारी गटातीलच एका नेत्याच्या सांगण्यावरून खिद्रापुरेस क्लीन चिट देण्यात आली. यापूर्वी गर्भधारणापूर्व आणि प्रसुतीपूर्व निदान तंत्र कायदा सल्लागार समिती अस्तित्वात होती. अ‍ॅड. अर्चना उबाळे यांचा या समितीत समावेश होता. त्यांनी अत्यंत धडाडीने अनेक ठिकाणी छापे टाकून पंधरा गुन्हे उघडकीस आणले होते. डॉ. राम कुलकर्णी आणि डॉ. राम लाड यांचाही या गुन्हा दाखल झालेल्या लोकांमध्ये समावेश होता. तरीही त्यांना क्लीन चिट देण्यात आली. त्यांना कोणत्या आधारावर व कोणाच्या सांगण्यावरून अभय देण्यात आले, याची चौकशी करायला हवी. चौकशी अहवालात रुग्णालयामधील सापडलेल्या नोंदी, हत्यारे, संशयास्पद साहित्य यांचा उल्लेख होता. तरीही क्लीन चिट देण्यात आली. खिद्रापुरे व त्याच्या सहकाऱ्यांनाही अशाचप्रकारे दोषमुक्त केले जाऊ शकते, अशी शंका नागरिकांमध्ये आहे. अ‍ॅड. उबाळे यांचे काम चांगले असतानाही तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका पत्राद्वारे त्यांना कार्यमुक्त केले. आजअखेर या समितीवर त्यांची जागा भरण्यात आलेली नाही. त्यामुळे सरकार स्त्रीभ्रूण हत्येच्या विषयावर किती गंभीर आहे, याची कल्पना येते. एकूणच काळीमा फासणाऱ्या या घटनेला सरकारही तितकेच जबाबदार आहे. सरकारने पारदर्शीपणाचा डांगोरा पिटण्यापेक्षा या घटनेतील दोषी असणाऱ्या संबंधित मंत्र्यांचीही चौकशी लावण्याचे धाडस दाखवावे, असे आवाहनही त्यांनी केले. (प्रतिनिधी)