शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोकरुड परिसरात ठेकेदाराकडून लाखो लिटर पाण्याचा उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोकरुड : विनापरवाना पाणी उपसा केल्याच्या कारणावरुन शेतकऱ्यांवर शासन दंडात्मक कारवाई करत आहे. मात्र रस्ता कामासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोकरुड : विनापरवाना पाणी उपसा केल्याच्या कारणावरुन शेतकऱ्यांवर शासन दंडात्मक कारवाई करत आहे. मात्र रस्ता कामासाठी दररोज लाखो लिटर उपसा करणाऱ्या ठेकेदारावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याबद्दल शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे.

गावातील ओढयात वाहणारे पाणी जर शेतकऱ्याने अडवून आपल्या शेतीला दिले असल्याची माहिती मिळाल्यास त्याच्यावर शासन पातळीवर दंडात्मक कारवाई करून त्यास पैसे भरुन पाणी परवाना घेण्यास सक्ती केली जाते. मात्र सध्या कऱ्हाड-कोकरुड राज्य मार्गाचे रुंदीकरण सुरू असल्याने या कामासाठी दररोज एक लाख लिटरपेक्षा जास्त पाणी लागत आहे. गेल्या एक महिन्यांपासून दररोज मुख्य ओढयातील लाखो लिटर पाणी उपसा होत असताना, याकडे शासनाचे लक्ष आहे ना ग्रामपंचायतीचे. शेतकऱ्यांनी कधी तरी शेतीसाठी पाणी घेतले, तर कारवाई करणारे शासन याकडे लक्ष देणार का? अशी विचारणा शेतकरी वर्गातून होत आहे.