शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

मिरज तालुक्यातील ९ हजार ८५१ जणांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:24 IST

गतवेळचा अनुभव पाहता प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार डी. एस. कुंभार, गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांनी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या ...

गतवेळचा अनुभव पाहता प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार डी. एस. कुंभार, गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांनी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून महापूर परिस्थितीवर मात करण्याबाबत नियोजन केले. मिरज तालुक्यातील माळवाडी, ढवळी, पद्माळे, कर्नाळ, कसबे डिग्रज, हरिपूर, समडोळी, म्हैसाळ, जुनी धामणी, अंकली, इनाम धामणी, मौजे डिग्रज, सावळवाडी, कवठेपिरान, दुधगाव, तुंग, वड्डी, निलजी बामणी, नांद्रे या १९ गावांना महापुराचा फटका बसताे. कमी धोका असणारी तुंग, वड्डी, इनामधामणी ही तीन गावे वगळता १६ गावातील २ हजार ७५६ कुटुंबातील सुमारे ९ हजार ८५१ इतक्या लोकांना नातेवाईक, संस्था, जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरित केले आहे. कुटुंबाबरोबर ३ हजार ८५१ जनावरेही सुरक्षितस्थळी हलविण्यात आली आहेत. पूरपरिस्थिती वाढल्याने आणखी काही कुटुंबाचे स्थलांतर करावे लागले. तालुका प्रशासनाच्या स्थलांतराच्या नियोजनामुळे किरकोळ अपवाद वगळता ग्रामीण भागात पूरबाधित गावात बचाव मोहीम राबवावी लागली नसल्याचे गटविकास अधिकारी सरगर यांनी सांगितले.

चौकट

नियोजनासाठी अधिकाऱ्यांच्या नेमणुका

तालुक्यातील पूर ओसरल्यानंतर पूरबाधित गावात आरोग्यासह निर्माण होणाऱ्या इतर समस्या निवारणासाठी तसेच नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. यासाठी महसूल व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्याची माहिती सरगर यांनी दिली.