शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

जिल्ह्यात १ लाख व्यक्तींचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:23 IST

सांगली : जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे प्रशासनाने पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना तातडीने सुरक्षितस्थळी हलविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आतापर्यंत ...

सांगली : जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे प्रशासनाने पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना तातडीने सुरक्षितस्थळी हलविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आतापर्यंत २२ हजार ४६७ कुटुंबातील १ लाख ५ हजार ६८३ व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच लहान व मोठ्या २४ हजार १ जनावरांचेही स्थलांतर करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

जिल्हाधिकारी डॉ. चाैधरी यांनी सांगितले की, स्थलांतरित व्यक्तींमध्ये महानगरपालिका क्षेत्रातील १,२३७ कुटुंबामधील ५ हजार १६० व्यक्ती, मिरज ३०७ कुटुंबातील २ हजार २०७ व्यक्ती, अपर सांगली ग्रामीणमधील ४ हजार २७२ कुटुंबातील १७ हजार ३८५ व्यक्तींचे स्थलांतरण करण्यात आले.

वाळवा तालुक्यात ७ हजार ९१८ कुटुंबातील ३९ हजार ५९० व्यक्तींचे तर अपर आष्टामधील ७९३ कुटुंबातील ३ हजार ६३४ व्यक्तींचे, शिराळा तालुक्यातील १०८५ कुटुंबातील ४ हजार ६८६ व्यक्तींचे, पलूस तालुक्यात ६ हजार ८५५ कुटुंबातील ३३ हजार २१ व्यक्तींचे स्थलांतरण करण्यात आले आहे. कुटुंबासह २४ हजार जनावरांनाही सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.