शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
2
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
3
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
4
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
5
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
6
'त्याचं तोंड उघडत नाहीये'; पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध; भावाला चॅट सापडले अन् समोर आला हत्येचा कट
7
"सॉरी, मी आता जगू शकत नाही, त्यांनी मला..."; फेल करण्याची धमकी, विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल
8
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
9
OnePlus: वनप्लसच्या लेटेस्ट 5G फोनवर तगडी ऑफर, किंमत पाहून खूश व्हाल!
10
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
11
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
12
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
13
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
14
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
15
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
17
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
18
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
19
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
20
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलींचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले

जिल्ह्यात १ लाख व्यक्तींचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:23 IST

सांगली : जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे प्रशासनाने पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना तातडीने सुरक्षितस्थळी हलविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आतापर्यंत ...

सांगली : जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे प्रशासनाने पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना तातडीने सुरक्षितस्थळी हलविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आतापर्यंत २२ हजार ४६७ कुटुंबातील १ लाख ५ हजार ६८३ व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच लहान व मोठ्या २४ हजार १ जनावरांचेही स्थलांतर करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

जिल्हाधिकारी डॉ. चाैधरी यांनी सांगितले की, स्थलांतरित व्यक्तींमध्ये महानगरपालिका क्षेत्रातील १,२३७ कुटुंबामधील ५ हजार १६० व्यक्ती, मिरज ३०७ कुटुंबातील २ हजार २०७ व्यक्ती, अपर सांगली ग्रामीणमधील ४ हजार २७२ कुटुंबातील १७ हजार ३८५ व्यक्तींचे स्थलांतरण करण्यात आले.

वाळवा तालुक्यात ७ हजार ९१८ कुटुंबातील ३९ हजार ५९० व्यक्तींचे तर अपर आष्टामधील ७९३ कुटुंबातील ३ हजार ६३४ व्यक्तींचे, शिराळा तालुक्यातील १०८५ कुटुंबातील ४ हजार ६८६ व्यक्तींचे, पलूस तालुक्यात ६ हजार ८५५ कुटुंबातील ३३ हजार २१ व्यक्तींचे स्थलांतरण करण्यात आले आहे. कुटुंबासह २४ हजार जनावरांनाही सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.