शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

एमआयडीसी कार्यालय स्थलांतर रोखणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककुपवाड : औद्योगिक विकास महामंडळाचे सांगलीतील विभागीय कार्यालय सोलापूरला हलविण्याबरोबरच हा जिल्हा कोल्हापूरला जोडण्यासाठी बुधवारी मंत्रालयात बैठक बोलाविली आहे. या निर्णयाविरोधात सांगली, मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, कृष्णा व्हॅली चेंबर आॅफ कॉमर्स, वसंतदादा औद्योगिक वसाहत आणि गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहत या संघटनांनी संतप्त भूमिका घेतली आहे. त्यांनी मुख्यमंत्री व उद्योग ...

लोकमत न्यूज नेटवर्ककुपवाड : औद्योगिक विकास महामंडळाचे सांगलीतील विभागीय कार्यालय सोलापूरला हलविण्याबरोबरच हा जिल्हा कोल्हापूरला जोडण्यासाठी बुधवारी मंत्रालयात बैठक बोलाविली आहे. या निर्णयाविरोधात सांगली, मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, कृष्णा व्हॅली चेंबर आॅफ कॉमर्स, वसंतदादा औद्योगिक वसाहत आणि गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहत या संघटनांनी संतप्त भूमिका घेतली आहे. त्यांनी मुख्यमंत्री व उद्योग मंत्र्यांना हा निर्णय रद्द करण्यासाठी साकडे घातले आहे. तसेच उद्योग विकास आघाडी या संघटनेने या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे तीव्र पडसाद जिल्हा उद्योग मित्रच्या बैठकीवरही पडणार आहेत.जिल्ह्यात औद्योगिक महामंडळाच्या क्षेत्राची स्थापना १९७३ च्या दरम्यान झाली. त्यावेळेपासून या जिल्ह्यातील उद्योजकांना कोल्हापूर विभागीय कार्यालयात कामासाठी हेलपाटे घालावे लागत होते. त्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी तत्कालिन उद्योगमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी २००० मध्ये सांगलीतील विश्रामबागमध्ये या जिल्ह्याबरोबरच सोलापूरसाठी नव्याने विभागीय कार्यालय सुरू केले. ते आजतागायत सुरू आहे. याठिकाणी येण्यासाठी सोलापूरच्या उद्योजकांना नाहक त्रास होत असल्याच्या कारणावरून पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी हे कार्यालय सोलापूरला हलविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी मुंबईत मंत्रालयात बुधवारी, १३ सप्टेंबर रोजी ११ वाजता बैठक बोलाविली आहे.याप्रकरणी सर्वप्रथम ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर उद्योजकांतून या निर्णयाबद्दल संतप्त पडसाद उमटले. या निर्णयाविरोधात उद्योग विकास आघाडी या उद्योजक संघटनेने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मुख्यमंत्री, उद्योगमंत्री आणि पालकमंत्री यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती उद्योग आघाडीचे अध्यक्ष डी. के. चौगुले, मनोज भोसले, जफर खान आदी उद्योजकांनी दिला आहे. तसेच सांगली, मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन व कृष्णा व्हॅली चेंबर आॅफ कॉमर्स या दोन्ही संघटनांनी संतप्त भूमिका घेतली आहे. हा निर्णय रद्द करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री व उद्योग मंत्र्यांसह, खासदार, आमदार, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना साकडे घातले आहे, अशी माहिती मिरज असोसिएशनचे अध्यक्ष संजय अराणके, उपाध्यक्ष विनोद पाटील, संचालक हेमंत महाबळ, माधव कुलकर्णी आणि कृष्णा व्हॅली चेंबरचे कुटुंबप्रमुख शिवाजी पाटील, अध्यक्ष सतीश मालू, उपाध्यक्ष रमेश आरवाडे व पांडुरंग रूपनर यांनी दिली आहे.याबरोबरच याप्रकरणी वसंतदादा औद्योगिक वसाहत, गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहत आणि लघु उद्योग भारती या संघटनांनी तीव्र आंदोलनाची तयारी दर्शविली आहे.या जिल्ह्यात सोलापूरपेक्षा अधिक औद्योगिक क्षेत्र आहे. तसेच भविष्यात होणाºया महामार्गामुळे उद्योगक्षेत्र वाढेल, असे उद्योजकांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे कार्यालय स्थलांतरित करू नये; तसेच कोल्हापूरलाही हे कार्यालय जोडू नये, अशी उद्योग संघटनांची मागणी आहे. याचे तीव्र पडसाद जिल्हा उद्योग मित्रच्या बैठकीवरही पडणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.‘लोकमत’चे अभिनंदन...सांगलीतील एमआयडीसीचे कार्यालय कोणत्याही परिस्थितीत स्थलांतरित करू देणार नाही. हा निर्णय झाल्यास प्रगतीपथावर असलेला जिल्हा बॅकफूटवर जाणार आहेत. उद्योग विकास आघाडी याप्रश्नी रस्त्यावर उतरणार आहे. हा निर्णय रद्द करण्यासाठी आघाडी जिवाचे रान करेल. प्रथम एमआयडीसीच्या कार्यालयासमोर निदर्शने करणार आहोत. त्यानंतर आंदोलनाची तीव्रता वाढविणार आहोत, असे उद्योग विकास आघाडीचे अध्यक्ष डी. के. चौगुले यांनी सांगितले. अन्यायाला वाचा फोडल्याबद्दल चौगुले यांच्यासह सर्वच उद्योजकांनी ‘लोकमत’चे अभिनंदन केले.