शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

लिंगनूर शाखा कालव्यातून ‘म्हैसाळ’चे पाणी खळाळले

By admin | Updated: April 13, 2015 00:01 IST

शेतकऱ्यांची बैठक : आठवड्यात जानराववाडी, खटावला आवर्तन

प्रवीण जगताप - लिंगनूर -सुरुवातीला म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू झाल्यानंतर योजनेचे आवर्तन फक्त मुख्य कालव्यातून होईल, असे सांगण्यात येत होते. परंतु लिंगनूर येथील शेतकऱ्यांची पाण्याच्या मागणी अर्जातील सकारात्मकता पाहून शाखा कालव्यांतूनही पाणी सोडण्याबाबत रविवारी निर्णय घेण्यात आला. लिंगनूर परिसरातील शेतकऱ्यांनीही शाखा व उपकालव्यांतून पाणी सोडणार असाल तर अर्ज भरू, अशी भूमिका घेऊन या संबंधित कालव्यावरील ४०० हेक्टर क्षेत्राचे अर्ज भरल्याने आज सकाळनंतर म्हैसाळचे पाणी लिंगनूर शाखा कालव्यांतून सोडण्यात येत आहे. या मागणी अर्जाबाबत व वितरणाच्या नियोजनाबाबत आज लिंगनूरमध्ये कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी लिंगनूर, संतोषवाडी, खटाव, आरग, माळवाडी परिसरातील शेतकरी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.आज म्हैसाळ योजनेचे आवर्तन आरग, माळवाडी, गायकवाडवाडी, लिंगनूर शाखा कालवा, मन्सूरवाडी भागातील कालव्यांत पाणी सोडले आहे. तसेच लिंगनूर परिसरातील ४०० हेक्टर क्षेत्राचे मागणी अर्ज जमा करण्यात आले. आजच्या बैठकीत आवर्तनाचे वेळापत्रक व मागणी अर्जाबाबत सहकार्य करण्याचे शेतकऱ्यांनी ठरविले, तर पाण्याचे मागणी अर्ज न भरणाऱ्यांचे सोडलेल्या पाण्याबरोबरच मोजणी करणार असल्याचे अभियंता नलवडे यांनी या बैठकीत सांगितले, तर आठवडाभरात लिंगनूर शाखा कालव्यातून पाणी सोडून पुढे नंतर जानराववाडी, संतोषवाडी, खटाव येथील कालव्यांतून पाणी सोडण्यात येणार आहे. या बैठकीस लिंगनूरचे कॉँग्रेस नेते आर. आर. पाटील, पोलीसपाटील मल्लय्या स्वामी, देवगोंडा पाटील, माजी सभापती मारुती नलवडे, आरगचे सर्जेराव खटावे, मन्सूरवाडीचे सुभाष खोत, संतोषवाडीचे हणमंत गायकवाड, बाळू गायकवाड यांच्यासह परिसरातील लोकप्रतिनिधी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)तीन कालव्यांतून प्रथमच पाणीलिंगनूर शाखा कालव्यावरील कोळी गेट, मगदूमवाडी रस्त्याला छेदणारा उपकालवा, खटाव येथील बेडगे यांच्या वस्तीवरून पुढे जाणारा कालवा यातून प्रथमच पाणी सोडण्यात येणार आहे. या तीन कालव्यांची कामे उशिराने पूर्ण झाल्याने आजपर्यंत यातून पाणी वाहिले नव्हते. पण या आवर्तनात या कलव्यांचा समावेश झाल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. लिंगनूर मुख्य तलावात पाणी सोडण्याबाबतही चर्चाशुक्रवार दिनांक १० एप्रिल रोजी ‘लिंगनूर तलावाने गाठला तळ’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’ने छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध करून तलावाची घटलेली पाणीपातळी व उन्हाच्या दाहकतेचे चित्र स्पष्ट केले होते. याबाबतही बैठकीत चर्चा झाली. मुख्य तलावात पाणी सोडण्याकरिता दशलक्ष घनफुटाकरिता सुमारे १७ हजार रुपये पाणीपट्टी आकारून पाणी सोडण्याबाबत लिंगनूर तलावावर काम करणाऱ्या काडदेव पाणी वापर संस्थेशी चर्चा करून याबाबत योग्य तो निर्णय लवकरच घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने नसेना का, परंतु काही प्रमाणात म्हैसाळच्या पाण्याने हा मुख्य तलाव भरून घेण्याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.