शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

लिंगनूर शाखा कालव्यातून ‘म्हैसाळ’चे पाणी खळाळले

By admin | Updated: April 13, 2015 00:01 IST

शेतकऱ्यांची बैठक : आठवड्यात जानराववाडी, खटावला आवर्तन

प्रवीण जगताप - लिंगनूर -सुरुवातीला म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू झाल्यानंतर योजनेचे आवर्तन फक्त मुख्य कालव्यातून होईल, असे सांगण्यात येत होते. परंतु लिंगनूर येथील शेतकऱ्यांची पाण्याच्या मागणी अर्जातील सकारात्मकता पाहून शाखा कालव्यांतूनही पाणी सोडण्याबाबत रविवारी निर्णय घेण्यात आला. लिंगनूर परिसरातील शेतकऱ्यांनीही शाखा व उपकालव्यांतून पाणी सोडणार असाल तर अर्ज भरू, अशी भूमिका घेऊन या संबंधित कालव्यावरील ४०० हेक्टर क्षेत्राचे अर्ज भरल्याने आज सकाळनंतर म्हैसाळचे पाणी लिंगनूर शाखा कालव्यांतून सोडण्यात येत आहे. या मागणी अर्जाबाबत व वितरणाच्या नियोजनाबाबत आज लिंगनूरमध्ये कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी लिंगनूर, संतोषवाडी, खटाव, आरग, माळवाडी परिसरातील शेतकरी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.आज म्हैसाळ योजनेचे आवर्तन आरग, माळवाडी, गायकवाडवाडी, लिंगनूर शाखा कालवा, मन्सूरवाडी भागातील कालव्यांत पाणी सोडले आहे. तसेच लिंगनूर परिसरातील ४०० हेक्टर क्षेत्राचे मागणी अर्ज जमा करण्यात आले. आजच्या बैठकीत आवर्तनाचे वेळापत्रक व मागणी अर्जाबाबत सहकार्य करण्याचे शेतकऱ्यांनी ठरविले, तर पाण्याचे मागणी अर्ज न भरणाऱ्यांचे सोडलेल्या पाण्याबरोबरच मोजणी करणार असल्याचे अभियंता नलवडे यांनी या बैठकीत सांगितले, तर आठवडाभरात लिंगनूर शाखा कालव्यातून पाणी सोडून पुढे नंतर जानराववाडी, संतोषवाडी, खटाव येथील कालव्यांतून पाणी सोडण्यात येणार आहे. या बैठकीस लिंगनूरचे कॉँग्रेस नेते आर. आर. पाटील, पोलीसपाटील मल्लय्या स्वामी, देवगोंडा पाटील, माजी सभापती मारुती नलवडे, आरगचे सर्जेराव खटावे, मन्सूरवाडीचे सुभाष खोत, संतोषवाडीचे हणमंत गायकवाड, बाळू गायकवाड यांच्यासह परिसरातील लोकप्रतिनिधी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)तीन कालव्यांतून प्रथमच पाणीलिंगनूर शाखा कालव्यावरील कोळी गेट, मगदूमवाडी रस्त्याला छेदणारा उपकालवा, खटाव येथील बेडगे यांच्या वस्तीवरून पुढे जाणारा कालवा यातून प्रथमच पाणी सोडण्यात येणार आहे. या तीन कालव्यांची कामे उशिराने पूर्ण झाल्याने आजपर्यंत यातून पाणी वाहिले नव्हते. पण या आवर्तनात या कलव्यांचा समावेश झाल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. लिंगनूर मुख्य तलावात पाणी सोडण्याबाबतही चर्चाशुक्रवार दिनांक १० एप्रिल रोजी ‘लिंगनूर तलावाने गाठला तळ’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’ने छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध करून तलावाची घटलेली पाणीपातळी व उन्हाच्या दाहकतेचे चित्र स्पष्ट केले होते. याबाबतही बैठकीत चर्चा झाली. मुख्य तलावात पाणी सोडण्याकरिता दशलक्ष घनफुटाकरिता सुमारे १७ हजार रुपये पाणीपट्टी आकारून पाणी सोडण्याबाबत लिंगनूर तलावावर काम करणाऱ्या काडदेव पाणी वापर संस्थेशी चर्चा करून याबाबत योग्य तो निर्णय लवकरच घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने नसेना का, परंतु काही प्रमाणात म्हैसाळच्या पाण्याने हा मुख्य तलाव भरून घेण्याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.