शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

म्हैसाळ योजनेचे दहा लाख भरले

By admin | Updated: March 17, 2016 00:18 IST

जत तालुक्यातील शेतकरी सरसावले : पाणी तात्काळ सोडण्याची मागणी

-जत : तालुक्याच्या उत्तर भागाला वरदार ठरणारी म्हैसाळ योजना चालू करण्यासाठी शेगाव, कुंभारी, गुळवंची, वाळेखिंडी, कोसारी, रेवनाळ, बनाळी येथील शेतकऱ्यांनी थकबाकी भरण्यास सुरुवात केली आहे. या भागातील शेतकऱ्यांनी सुमारे १० लाख रुपयांची थकबाकी जमा केली आहे. शेगाव (ता. जत) येथील जय सहकार पाणी वापर संस्थेच्या शेतकऱ्यांनी ३ लाख २१ हजार रुपयांचा धनादेश आ. विलासराव जगताप यांच्याहस्ते व म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. जत तालुक्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीत म्हैसाळचे पाणी सोडावे, या मागणीने जोर धरला आहे. विविध संघटनांनी आंदोलनेही केली. मात्र शासनाने थकबाकी भरल्याशिवाय पाणी सोडणार नाही, ही भूमिका घेतली. आ. जगताप यांनी शासनाची भूमिका शेतकऱ्यांना समजण्यासाठी जत उत्तर भागात शेगाव येथे लाभक्षेत्रातील १८ गावांची बैठक घेतली. या बैठकीत थकबाकी भरण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार शेगाव येथील साठवण तलाव क्रमांक १ ची थकबाकी ३ लाख २३ हजारपैकी ३ लाख २१ हजारांची रक्कम शेतकऱ्यांनी जमा केली. ही रक्कम आ. जगताप यांच्याहस्ते म्हैसाळ योजनेचे उपविभागीय अभियंता शंकर शिंदे यांच्याकडे प्रदान केली. दरम्यान, कुंभारी येथील तलाव क्रमांक १ क्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांनी १ लाख ५७ हजारांची रक्कम, तर कोसारी तलावाच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी २ लाख रुपयांचा धनादेश काढून अधिकाऱ्यांकडे जमा केला आहे. दरम्यान, गुळवंची, वाळेखिंडी कार्यक्षेत्रातील थकबाकी भरण्यास शेतकरी पुढे येत असून, दोन लाखांपर्यंत रक्कम जमा होत आहे, तर शेगाव साठवण तलाव क्रमांक २ च्या लाभक्षेत्रातील शेगाव व बनाळी येथील शेतकऱ्यांनी ३ लाख रुपये जमा केले आहेत. एकूणच जत उत्तर भागातील शेतकऱ्यांनी म्हैसाळ योजनेच्या थकबाकीतील रक्कम भरण्यासाठी पुढाकार घेतल्याने या भागात म्हैसाळ योजनेचे पाणी येण्याची आशा निर्माण झाली आहे. थकबाकी भरण्यास शेतकऱ्यांची मानसिकता तयार होत असल्याने पाणी लवकरच मिळणार आहे. त्यामुळे भागात पाणी टंचाईची तीव्रता कमी होणार आहे. धनादेश देताना शेगाव साठवण तलाव क्रमांक १ चे पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी लक्ष्मण बोराडे, सचिन बोराडे, आर. डी. शिंदे, सुभाष पाटील, शहाजी गायकवाड, अशोक शिंदे यांच्यासह परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)