शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
3
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
4
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
5
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
6
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
7
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
8
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
9
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
10
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
11
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा
12
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
13
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
14
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
15
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
16
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
17
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
18
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स
19
'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा
20
Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला

‘म्हैसाळ’ कायमस्वरूपी पूर्ववतचे आश्वासन

By admin | Updated: December 17, 2015 22:52 IST

मुंबई बैठक : सुमनतार्इंच्या आंदोलनास यश

कवठेमहांकाळ : हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर एका आठवड्यात म्हैसाळ उपसा सिंचन योजना कायमस्वरुपी सुरू करण्यासाठी निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाचे गटनेते आमदार अजित पवार, आमदार जयंत पाटील, आमदार सुमनताई पाटील यांनी दिली. त्यामुळे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर म्हैसाळ योजना सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे. सुमनताई पाटील यांच्या आंदोलनास यश आले आहे.नागपूर येथील विधानभवनासमोर सुमनताई पाटील, गणपतराव देशमुख, जयंत पाटील यांच्यासह अन्य आमदारांनी उपोषण केले. दुष्काळी भागातील पाणी योजना सुरू करून येथील शेतकऱ्याला जीवनदान द्यावे, म्हैसाळ योजना सुरू करण्याच्या मागणीबरोबरच मटका बंद करण्याचा, डान्स बार बंदीचा नवा कायदा करा, या मागण्या करण्यात आल्या. या उपोषणाची दखल घेत विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दालनामध्ये मदत आणि पुनर्वसनमंत्री एकनाथ खडसे, मंत्री गिरीश बापट, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह आमदार अजित पवार, पतंगराव कदम, जयंत पाटील, सुमनताई पाटील, गणपतराव देशमुख, अनिल बाबर, सुरेश खाडे, शिवाजीराव नाईक आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. मात्र योजना सुरू करण्याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, असे सांगितले. अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करण्याचे आश्वासन दिले. रात्री उशिरा पवार यांनी चर्चा केली.सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागात दुष्काळाची स्थिती भीषण असल्यामुळे म्हैसाळ योजना सुरू करावी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव आणि मिरज पूर्व भाग, सांगोला तालुक्याला पाणी द्यावे, अशी मागणी केली. (वार्ताहर)आंदोलन स्थगितमुख्यमंत्र्यांनी अधिवेशनानंतर आठवड्यात म्हैसाळ योजना सुरू करण्याचे आश्वासन दिल्यामुळे, राष्ट्रवादीने जाहीर केलेले आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. शुक्रवारी कवठेमहांकाळ बंद केले जाणार नाही. सोमवारपासूनचे उपोषणही स्थगित केले.