शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

‘म्हैसाळ’ची वीज पुन्हा तोडली

By admin | Updated: June 8, 2015 00:50 IST

वीज थकबाकी ९ कोटींवर : थकित पाणीपट्टी २0 कोटींच्या घरात

प्रवीण जगताप -लिंगनूर -म्हैसाळ योजना मागील पाच वर्षांपासून थकबाकीच्या ओझ्याने दबली - पिचली जात आहे. त्यामुळे थकित पाणीपट्टीमुळे योजनेचे वीजबिलही भरता येत नसल्याने तेही थकित राहत असून त्याचा आकडा वाढतच आहे. यंदाच्या एप्रिल, मे या दोन महिन्यांतील वीजबिल सुमारे दिवसाला आठ लाख रूपये याप्रमाणे वाढून आता एकूण थकित वीजबिलाचा आकडा ९.३२ कोटीवर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने श्निवारी रात्री आठ वाजता पुन्हा थकित वीजबिलामुळे वीज तोडली आहे.ज्या म्हैसाळ योजनेमुळे लाभक्षेत्रातील २३ हजार हेक्टर क्षेत्रात उन्हाळ्यात व रब्बी आवर्तनावेळी शिवार गार होते. पण या शिवार गार करणाऱ्या योजनेच्या पाण्याची पट्टीच थकित राहून त्याचा एकूण आकडा १९.५ कोटीवर पोहोचल्याने, ही योजनाच गार होण्याची भीती निर्माण झाली आहे. याला सर्वांनी मिळून उत्तर शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. यंदाच्या उन्हाळ्यात उशिरा का होईना, म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू झाले. क्रमश: मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव लाभक्षेत्राला कमी-अधिक प्रमाणात लाभ झाला आहे. लाभक्षेत्र जास्त असल्याने मिरज तालुक्याला अधिक लाभ झाला आहे. आता जून महिना सुरू झाला असून मान्सून केरळात दाखल झाला आहे. येत्या आठवड्यात तो सांगलीत दाखल होण्याची आशा आहे. शेतकऱ्यांच्या नशिबाने मान्सूनच्या आगमनापर्यंत ‘म्हैसाळ’चे आवर्तन आणि मान्सूनपूर्व पावसाने वेळ मारून नेली आहे. परंतु येणाऱ्या हिवाळ्यातील रब्बी आवर्तनासाठी पुन्हा पावसाळा संपल्यानंतर ज्यावेळी पाण्याची गरज निर्माण होईल, तेव्हा पुन्हा थकबाकी व पाणीपट्टी वसुलीचा प्रश्न गंभीर होणार आहे. थकबाकीशी संबंधित आकडेवारी लक्षात घेता, भविष्यात पुन्हा आवर्तनातील अडचणी वाढू द्यायच्या नसतील आणि पर्यायाने योजनेचे भविष्य उज्ज्वल बनविण्याकरिता थकबाकी भरण्याशिवाय पर्याय राहणार नाही.लोकप्रतिनिधींचा रेटा गरजेचाचयंदाच्या उन्हाळ्याची झळ अगदी फेब्रुवारीपासून सुरू झाली. सुरूवातीला लोकांची मागणी होऊनही लोकप्रतिनिधी सत्ताधारी व विरोधक कोणीच पुढे होत नव्हते. अशात भाजप सरकारच्या कालावधित पाणी केव्हा मिळणार, याकडेही अनेकांचे लक्ष होते. परंतु प्रश्नाचे गांभीर्य ध्यानात घेऊन थकबाकी भरण्याच्या प्रबोधनासह सर्वपक्षीय हाक देऊन खासदार संजयकाका पाटील पुढे आले. अगदी सर्वपक्षीय बैठका घेऊन पाणी सोडण्याबाबत व थकित पाणीपट्टीबाबत शासनस्तरावर आग्रही भूमिका मांडल्याने यंदाचे आवर्तन सुकर झाले. विरोधक व अन्यपक्षीयांनीही प्रश्नाचे गांभीर्य ध्यानात घेऊन याचे राजकारण न करता त्यास सर्वपक्षीय पाठिंबाच दिला.शेतकऱ्यांना महत्प्रयासातून सुरू झालेल्या म्हैसाळ योजनेच्या आवर्तनाचा लाभ यंदा दोन महिने मिळाला असून, अगदी जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत त्याचा लाभ मिळाला. आता पुन्हा थकित वीजबिलाचा आकडा ९.३२ कोटीवर पोहोचल्याने महावितरण कंपनीने रात्री वीज तोडली आहे. त्यामुळे आता येणारा पावसाळा संपल्यानंतर पुन्हा रब्बी आवर्तन थकबाकीच्या मुख्य समस्येमुळे अडचणीत येणार आहे. यंदाचे उन्हाळी आवर्तन त्यामुळेच उशिरा सुरू झाले. येणारा रब्बी हंगाम सुखकर व्हावयाचा असल्यास आतापासूनच शेतकऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी त्याचेच नियोजन करून थकबाकी भरण्यात पुढाकार घेतला पाहिजे.- सूर्यकांत नलवडे, सहायक कार्यकारी अभियंतापाणीपट्टी वसुली केवळ २५ लाखयोजनेची पाणीपट्टी वसूल व्हावी, यासाठी पाटबंधारे विभागामार्फत हरतऱ्हेने प्रयत्न करण्यात आले. पाणीपट्टीची वसुली होत नसल्याने वीजबिल थकले. परिणामी योजनाच बंद. अशा स्थितीत शेतकऱ्यांकडून पाण्यासाठी मागणी अर्ज मिळाल्याशिवाय पाणी न सोडण्याचीही कठोर भूमिका घेण्यात आली. एवढे सारे करूनही पाणीपट्टी केवळ २५ लाख रूपये वसूल झाली आहे. आताही महावितरणची थकबाकी साडेनऊ कोटीपर्यंत पोहोचली आहे. अशीच स्थिती राहणार असेल, तर योजनेच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.