शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

‘म्हैसाळ’ची वीज तोडली

By admin | Updated: November 2, 2014 00:40 IST

महावितरणची कारवाई : रब्बी आवर्तन बंद पाडले

मिरज : रब्बी हंगामासाठी म्हैसाळ योजनेचे सुरू करण्यात आलेले चार पंप विद्युत बिलाच्या थकबाकीमुळे बंद करण्यात आले. आज दुपारी लगेचच म्हैसाळ योजनेचे पंप सुरू होताच १ कोटी ६७ लाख रुपये वीज बिलाच्या थकबाकीपोटी महावितरणने विद्युतपुरवठा खंडित केला. वीज बिलाच्या थकबाकीमुळे म्हैसाळ योजनेचे रब्बी आवर्तन धोक्यात आले आहे.म्हैसाळ प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी १५ आॅक्टोबर ते २८ फेबु्रवारीपर्यंत रब्बी आवर्तनाचे नियोजन केले होते. शेतकऱ्यांनी मागणी नोंदविली नसली तरी, मुख्य कालव्यात पाणी सोडण्यासाठी पहिल्या टप्प्यातील चार पंप सुरू करण्यात आल्याची माहिती मिळताच दोन तासातच महावितरणचे अधिकारी तेथे दाखल झाले. टंचाई काळात म्हैसाळचे पाणी सोडण्यासाठी वापरण्यात आलेल्या विजेच्या बिलाची १ कोटी ६७ लाख थकबाकी भरण्यात आली नसल्याने म्हैसाळ पंपगृहाचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. विजेचे थकित बिल भरण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी वसूल करण्याचे शासनाचे आदेश असल्याने शेतकऱ्यांकडून थकित वीज बिलाची रक्कम वसूल करूनच विद्युतपुरवठा सुरू करावा लागणार असल्याचे कार्यकारी अभियंता महादेव घुळे यांनी सांगितले. खंडित विद्युत पुरवठ्यामुळे रब्बी हंगामात म्हैसाळचे पाणी बंद राहिल्यास मिरज पूर्व भागातील गावांसह जत, कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. पाण्यासाठी पाटबंधारे विभागाने रब्बीची दोन आवर्तने त्यानंतर उन्हाळी हंगामात दोन टप्प्यात पाणी सोडण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार शेतकऱ्यांना पाण्याची मागणी नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र थकबाकीमुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याने योजनेतून पाणी सुटणार की नाही, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. आर. आर. पाटील यांच्या भूमिकेकडे लक्षमाजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी यापूर्वी वारंवार टंचाई निधीतून वीज बिलाची व्यवस्था करून म्हैसाळ कालव्यात पाणी सोडण्यास भाग पाडले होते. विधानसभा निवडणुकीनंतर आर. आर. पाटील यांनी म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्याची मागणी केली. मात्र म्हैसाळचे पंप सुरू झाल्यानंतर लगेचच बंद करण्यात आल्याने आर. आर. कोणती भूमिका घेतात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.(वार्ताहर)