शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

लग्नपत्रिकेतून ‘स्वच्छ भारत मिशन’ अन् ‘बेटी बचाओ’चा संदेश

By admin | Updated: May 17, 2017 23:15 IST

लग्नपत्रिकेतून ‘स्वच्छ भारत मिशन’ अन् ‘बेटी बचाओ’चा संदेश

लोकमत न्यूज नेटवर्कवाठार स्टेशन : पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करणाऱ्या समाजाला योग्य दिशा देण्यासाठी व्यसनमुक्त चळवळीचे सर्वेसर्वा बंडातात्या कराडकर यांच्या संकल्पनेतून २७ मे रोजी फलटण तालुक्यातील पिंप्रद या ठिकाणी एक आगळा वेगळा विवाह सोहळा होत आहे. याला कारणही तसेच आहे. या सोहळ्याच्या लग्नपत्रिकेतून ‘स्वच्छ भारत मिशन’सह ‘बेटी बचाओ’चा संदेश देण्यात आला आहे. समाजात जनजागृती करणारी ही लग्नपत्रिका सर्वांच्याच कुतूहलाची विषय ठरली आहे.कोरेगाव तालुक्यातील सोळशी गावचे महादेव यादव यांचे चिरंजीव मिलिंद व हिंगणी, (ता. माण) येथील विठ्ठल शेलार यांची कन्या राधिका यांचा विवाह २७ मे रोजी पिंप्रद येथे बंडातात्या कराडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यसनमुक्त युवा शिबिरात होत आहे. आत्ता पर्यंतच्या अनेक लग्नसोहळ्याला फाटा देत होत असलेला हा विवाह अनेकांना प्रेरणादायी ठरणार आहे. या विवाहाची निमंत्रण पत्रिकाच मुळात अनेक प्रकारच्या संदेशांनी बहरली आहे. ‘स्वच्छ भारत मिशन’ पासून या पत्रिकेत बेटी बचाओ देश बचाओ’, ‘सर्व शिक्षा अभियान’, ‘डिजिटल साक्षरता अभियान’, ‘झाडे लावा झाडे जगवा’, ‘मेक इन इंडिया’ अशा गोष्टींना प्राधान्य देवून शासनाच्या धोरणांची जनजागृती करण्यात आली आहे.लग्न सोहळ्यात लाखो रुपयांचा खर्चाला फाटा देत शासकीय धोरण योजनांचा संदेश आपल्या मुलाच्या लग्नपत्रिकेतून देण्याचे काम बंडातात्या कराडकर यांच्या सोबत काम करणाऱ्या महादेव यादव यांनी दिला आहे. विशेष म्हणजे त्यांची सोयरीकही त्यांच्याच विचारांच्या कार्यकर्त्याची असल्यामुळे या कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आले आहे. या शिवाय ‘जात पातीचे बंधन तोडा, भारत जोडा असा संदेशही या पत्रिकेच्या माध्यमातून देण्यात आला आहे. ही अनोखी पत्रिका सर्वांच्या कुतूहलाची विषय ठरली आहे.